शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

देशाचं आरोग्य सुधारेल नवतंत्रज्ञान; प्रगतीसाठी ठरेल वरदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 17:05 IST

देश किती सुदृढ आहे ते त्या देशातल्या नागरिकांच्या आरोग्यावरून ठरतं.

- शहान सूदसगळी माणसं एकाच ठिकाणी राहू शकतात, असं जग आपण तयार करत आहोत का, की आपलं भविष्य असमान असणार आहे? भारतानं आर्थिक क्षेत्रात प्रगती केली असली, तरीही आरोग्य क्षेत्रातील परिस्थितीवरुन हा प्रश्न उपस्थित होतो. देश किती सुदृढ आहे ते त्या देशातल्या नागरिकांच्या आरोग्यावरून ठरतं. आरोग्य आणि पोषणमूल्यांच्या बाबतीतल्या मीलेनियम डेव्हलपमेंट गोल्समध्ये (एमडीजी) भारताची कामगिरी सुधारली असली, तरीही देशातल्या नागरिकांच्या आरोग्यात अपेक्षित सुधारणा झालेली नाही.

आरोग्य विषयक कारणांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात ९ टक्के तरतूद करण्यात आली आहे. आरोग्यसंबंधीच्या सुविधांसाठी करण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वाधिक तरतूद आहे. वातावरणातील बदलांमुळे आजारांचं स्वरुपदेखील बदललं आहे. मोबाईलप्रमाणेच आजारदेखील अपडेट होत आहेत. मानसिक आजारांचं प्रमाण वाढत असल्यानं त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण देशातील एक पंचमांश व्यक्ती ताणतणावांचा सामना करत आहेत. 

भारतीयांची क्रयशक्ती वाढली आहे. मात्र जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे आजारांचं स्वरुप बदललं आहे. ताणतणाव, मधुमेह, अस्थमा, श्वसन, हृदयाशी संबंधित आजार आणि कर्करोगांचं प्रमाण वाढलं आहे. आरोग्याशी संबंधित उद्योग आणि त्यात होणारा डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर या माध्यमातून यावर तोडगा काढता येऊ शकतो. याशिवाय सामाजिक उद्योजकतेसह सार्वजनिक-खासगी भागिदारीतूनदेखील मार्ग निघू शकतो, असा मला विश्वास वाटतो. 

सार्वजनिक आरोग्याचा विचार केल्यास भारतानं पाणी आणि स्वच्छतेकडे लक्ष द्यायला असं मला वाटतं. यामुळे केवळ देशातल्या नागरिकांचं आरोग्य सुधारणार नाही, तर अनेक रोजगारदेखील निर्माण होतील. यासाठी देशातील नागरिकांच्या स्मार्टफोनचा आणि त्यातील माहितीचा (डेटाचा) वापर करतील. नागरिकांच्या स्मार्टफोनमधील माहिती घेऊन त्यांना वैद्यकीय सुविधा घरापर्यंत देता येऊ शकतात. मात्र त्यासाठी अशा सेवा देणाऱ्या स्टार्टअप्सची संख्या वाढायला हवी. 

लोकांना वैद्यकीय सेवा त्यांच्या घरापर्यंत पोहोचवणारी यंत्रणा तयार करण्यासाठी स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक व्हायला हवी. हे साध्य करण्यासाठी घोषणा नव्हे, तर कृती योजना गरजेची आहे. केंद्र सरकार, सामाजिक संस्था आणि कॉर्पोरेट कंपन्या यांनी एकत्रितपणे काम करायला हवं. त्यासाठी डेमोग्राफिक्स, डिमांड आणि डिजिटल डिसरप्शन या 3D ची गरज आहे. यामुळे देशातील नागरिकांचं आरोग्य नक्की सुधारेल. ही सेवा आधारशी जोडून तिची अंमलबजावणी प्रभावीपणे करता येईल. पुढील पाच वर्षात याचे परिणाम दिसू शकतात. 

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे पुढील काही वर्षात तंत्रज्ञानाच्या जोरावर आरोग्य क्षेत्रात अनेक सुधारणा होतील. आरोग्य आणि कुपोषणाच्या समस्या लक्षात घेऊन, त्यासंबंधीची माहिती गोळा करून त्यानुसार आरोग्यसेवा क्षेत्राचा डीएनडए बदलता येऊ शकतो. आरोग्य क्षेत्रात हे बदल झाल्यास नवा भारत ५ ट्रिलियन अमेरिकन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचं ध्येय गाठू शकेल.(लेखक गुंतवणूक बँकिंग व्यावसायिक आहेत)

टॅग्स :medicineऔषधंHealthआरोग्य