शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 12:58 IST

मीठ नसलेलं अन्न चविष्ट लागत नाही. यामध्ये असलेले सोडियम शरीरासाठी आवश्यक असते, मात्र त्याचे प्रमाण जास्त झाल्यास त्याचे घातक दुष्परिणाम होऊ शकतात. आरोग्य तज्ञ जास्त मीठ न खाण्याचा सल्ला देतात.

मीठ नसलेलं अन्न चविष्ट लागत नाही. यामध्ये असलेले सोडियम शरीरासाठी आवश्यक असते, मात्र त्याचे प्रमाण जास्त झाल्यास त्याचे घातक दुष्परिणाम होऊ शकतात. आरोग्य तज्ञ जास्त मीठ न खाण्याचा सल्ला देतात. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील चवीनुसार मीठ खाण्याचा सल्ला दिला आहे. डब्ल्यूएचओच्या मते, दरवर्षी 18 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू हा सोडियमच्या अतिसेवनामुळे होतो. मिठात सोडियम भरपूर असल्याने जास्त मीठ खाणे टाळावे. दिवसात ठराविक प्रमाणातच मीठ खावे. सोडियममुळे मृत्यू कसा होतो?

शरीरात जास्त प्रमाणात सोडियममुळे ब्ल़ड प्रेशर हाय होऊ शकतं. त्यामुळे हृदयविकार, गॅस्ट्रिक कॅन्सर, लठ्ठपणा, ऑस्टिओपोरोसिस, मेनिएर डिसीज आणि किडनीचे आजार होण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत जास्त मीठ खाणं शक्यतो टाळावं.

 दररोज किती मीठ खावं?

तज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्हाला स्नायूंमध्ये दीर्घकाळ अशक्तपणा जाणवत असेल तर ते शरीरात जास्त सोडियमचं लक्षण असू शकतं. याशिवाय वारंवार तहान लागणे, हलकी डोकेदुखी, वारंवार लघवी होणं, शरीरात सूज येणं ही शरीरात सोडियमची पातळी वाढण्याची लक्षणं आहेत. डब्ल्यूएचओच्या मते, प्रौढांनी दररोज किमान 2,000 मिलीग्राम किंवा 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ खावं. 2 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना त्यांच्या उर्जेनुसार मीठ देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मीठ कमी खाण्यासाठी काय करावं?

1. फक्त ताजे आणि कमी प्रक्रिया केलेले पदार्थ खा.2. कमी-सोडियम उत्पादनं निवडा, ज्यात 120mg/100g पेक्षा कमी सोडियम असतं.3. कमी मीठ घालून अन्न शिजवा.4. अन्नाला चवीनुसार मीठाला पर्याय म्हणून औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा वापर करा.5. पॅकेज केलेले सॉस, ड्रेसिंग आणि इन्स्टंट पदार्थ खाणं टाळा. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स