शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

ही फळं एकत्र खाणे आरोग्यासाठी ठरू शकतं घातक, वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 12:28 IST

Health Tips : काही फळांबाबत असं असतं की, ते एकत्र खाता येत नाहीत किंवा ते एकत्र खाल्यास शरीरासाठी घातक ठरु शकतात. इतकेच नाहीतर काही गंभीर आजारांचाही सामना करावा लागू शकतो. चला जाणून घेऊया कोणती फळं एकत्र खाऊ नये आणि का खाऊ नये.....

Health Tips : आपण सर्वांना हे चांगलंच माहीत आहे की, शरीराला हेल्दी ठेवण्यासाठी फळं आणि भाज्यांचं सेवन केलं पाहिजे. पण जेव्हा तुम्ही दोन वेगवेगळी फळं एकत्र खात असाल तर ते एकत्र खावे कि नाही हे जाणून घेणं गरजेचं ठरतं. काही फळांबाबत असं असतं की, ते एकत्र खाता येत नाहीत किंवा ते एकत्र खाल्यास शरीरासाठी घातक ठरु शकतात. इतकेच नाहीतर काही गंभीर आजारांचाही सामना करावा लागू शकतो. चला जाणून घेऊया कोणती फळं एकत्र खाऊ नये आणि का खाऊ नये.....

संत्री आणि गाजर

संत्री आणि गाजर ही दोन फळं कधीही एकत्र खाऊ नये. ही फळं एकत्र खाल्याने छातीत जळजळ होण्याची शक्यता असते. सोबतच किडनीचीही समस्या होऊ शकते. 

पपई आणि लिंबू

पपई आणि लिंबूचं एकत्र खाल्याने अनीमिया(रक्त कमी होणे) होण्याची शक्यता असते. त्यासोबतच शरीराचा हिमोग्लोबिनही असंतुलित होतो. लहान मुलांवर याचा जास्त परिणाम बघायला मिळतो. 

पेरू आणि केळी

पेरू आणि केळी दोन्ही फळं आरोग्यासाठी फार लाभदायक आहेत. पण जर ही दोन्ही फळं एकत्र खाल्लं तर वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात. ही दोन्ही फळं एकत्र खाल्यास आम्ल-पित्त, मळमळ होणे, गॅसची समस्या आणि डोकेदुखीसारखी समस्या होते. 

संत्री आणि दूध

दूध आणि संत्री एकत्र खाल्यास पचनक्रियेवर प्रभाव पडतो. यामुळे खाल्लेले पदार्थ पचन होण्यास अडचण होते. सोबतच आरोग्याशी निगडीत वेगवेगळ्या समस्या होतात. जर तुम्ही दूध किंवा दुधाच्या पदार्थांमध्ये संत्री टाकत असाल तर याने अपचनाचा त्रास होतो. 

अननस आणि दूध

अननसामध्ये असलेलं ब्रोमेलेन जेव्हा दुधात मिश्रित होतं तेव्हा गॅस, मळमळ होणे, इन्फेक्शन, डोकेदुखी आणि पोटदुखीसारख्या समस्या होतात. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य