शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

Health Tips: पुढचे १५ दिवस तब्येतीची विशेष काळजी घ्या, कारण...;वैद्यांनी दिला मोलाचा सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 15:33 IST

Health Tips: पावसाचा वाढता मुक्काम आणि संसर्गजन्य आजारांचे वाढते प्रमाण, अशात आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत वाचा वैद्यांनी दिला बहुमूल्य सल्ला!

प्रत्येक ऋतूचा शेवटचा आठवडा आणि पुढल्या ऋतूचा पहिला आठवडा हा पंधरवडा ‘ऋतुसंधी’ या नावाने ओळखला जातो. ‘ऋतुसंधी’त वातावरणात बरेच बदल घडत असतात. शरद ऋतू सुरू होत आहे. त्यात पावसाळा संपायचे नाव घेत नाहीये. अशात विविध आजारांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी ते जाणून घेऊ. 

पावसाळा जितका आल्हाददायक वाटतो, तेवढाच कडक असतो ऑक्टोबर महिन्यातला उन्हाळा! त्यालाच आपण ऑक्टोबर हिट असेही म्हणतो. मात्र सद्यस्थिती पाहता आगामी पंधरा दिवसात उन्हाळा असेल की पावसाळा की हिवाळा? याबद्दल निश्चित माहिती देता येणार नाही. परंतु वातावरणातील हे बदल मानवी शरीराला त्रासदायक ठरू शकतील. ऋतुसंधीचा हा काळ आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. याबाबत वैद्य परीक्षित शेवडे यांनी समाज माध्यमावर माहितीपर एक पोस्ट केली व त्यात पुढचे पंधरा दिवस सावध राहा असा इशाराही दिला आहे. 

आरोग्याची काळजी: ते लिहितात, 'वर्षा ऋतूमधून शरद ऋतूत वाटचाल होण्याचा काळ म्हणजे ऋतुसंधी. या काळात, म्हणजेच पुढच्या पंधरा दिवसांत दमा, सांधेदुखी, आमवात, अम्लपित्त, शीतपित्त, पचनाचे ज्ञात त्रास बळावू शकतात. तसंच, कोणतीही साथ असल्यास संसर्ग होण्याची अधिक शक्यता आहे.'

उपाय : हे दुखणी टाळण्यासाठी नियमित आणि पुरेसे जेवण, झोप. आहारात बेसन, मैदा, हिरवी मिरची, विरुद्ध आहार (उदा : दूध आणि आंबट पदार्थ पाठोपाठ खाणे), मांसाहार, मसालेदार पदार्थ शक्य तितके टाळले पाहिजेत. आवश्यकता भासल्यास वेळ न दवडता लगेच आपल्या वैद्यांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. '

शरद ऋतूची सुरुवात आणि नवरात्रारंभ एकाच दिवशी येत असल्याने आपल्या पूर्वजांनी पहिल्या नऊ दिवसांत अनेक प्रकारचे पथ्य पाणी सांगितले आहे. ही व्यवस्था केवळ आध्यात्मिक दृष्ट्या नाही तर आरोग्याच्या दृष्टीनेही किती महत्त्वाची आहे, हे यावरून लक्षात येते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स