शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Health Tips: पुढचे १५ दिवस तब्येतीची विशेष काळजी घ्या, कारण...;वैद्यांनी दिला मोलाचा सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 15:33 IST

Health Tips: पावसाचा वाढता मुक्काम आणि संसर्गजन्य आजारांचे वाढते प्रमाण, अशात आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत वाचा वैद्यांनी दिला बहुमूल्य सल्ला!

प्रत्येक ऋतूचा शेवटचा आठवडा आणि पुढल्या ऋतूचा पहिला आठवडा हा पंधरवडा ‘ऋतुसंधी’ या नावाने ओळखला जातो. ‘ऋतुसंधी’त वातावरणात बरेच बदल घडत असतात. शरद ऋतू सुरू होत आहे. त्यात पावसाळा संपायचे नाव घेत नाहीये. अशात विविध आजारांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी ते जाणून घेऊ. 

पावसाळा जितका आल्हाददायक वाटतो, तेवढाच कडक असतो ऑक्टोबर महिन्यातला उन्हाळा! त्यालाच आपण ऑक्टोबर हिट असेही म्हणतो. मात्र सद्यस्थिती पाहता आगामी पंधरा दिवसात उन्हाळा असेल की पावसाळा की हिवाळा? याबद्दल निश्चित माहिती देता येणार नाही. परंतु वातावरणातील हे बदल मानवी शरीराला त्रासदायक ठरू शकतील. ऋतुसंधीचा हा काळ आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. याबाबत वैद्य परीक्षित शेवडे यांनी समाज माध्यमावर माहितीपर एक पोस्ट केली व त्यात पुढचे पंधरा दिवस सावध राहा असा इशाराही दिला आहे. 

आरोग्याची काळजी: ते लिहितात, 'वर्षा ऋतूमधून शरद ऋतूत वाटचाल होण्याचा काळ म्हणजे ऋतुसंधी. या काळात, म्हणजेच पुढच्या पंधरा दिवसांत दमा, सांधेदुखी, आमवात, अम्लपित्त, शीतपित्त, पचनाचे ज्ञात त्रास बळावू शकतात. तसंच, कोणतीही साथ असल्यास संसर्ग होण्याची अधिक शक्यता आहे.'

उपाय : हे दुखणी टाळण्यासाठी नियमित आणि पुरेसे जेवण, झोप. आहारात बेसन, मैदा, हिरवी मिरची, विरुद्ध आहार (उदा : दूध आणि आंबट पदार्थ पाठोपाठ खाणे), मांसाहार, मसालेदार पदार्थ शक्य तितके टाळले पाहिजेत. आवश्यकता भासल्यास वेळ न दवडता लगेच आपल्या वैद्यांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. '

शरद ऋतूची सुरुवात आणि नवरात्रारंभ एकाच दिवशी येत असल्याने आपल्या पूर्वजांनी पहिल्या नऊ दिवसांत अनेक प्रकारचे पथ्य पाणी सांगितले आहे. ही व्यवस्था केवळ आध्यात्मिक दृष्ट्या नाही तर आरोग्याच्या दृष्टीनेही किती महत्त्वाची आहे, हे यावरून लक्षात येते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स