शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
4
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
5
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
6
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
7
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
8
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
9
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
10
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
11
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
12
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
13
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
14
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
15
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
16
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
17
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
18
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
19
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण

​HEALTH : शिळा भात खाणे आरोग्यदायी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2017 15:07 IST

आपण आजारी पडू नये म्हणून बहुतांश शिळे अन्नपदार्थ खाणे टाळतो, मात्र एका संशोधनानुसार रात्र भर शिळा भात पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी खाल्ल्याने आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे समोर आले आहे.

आपण आजारी पडू नये म्हणून बहुतांश शिळे अन्नपदार्थ खाणे टाळतो, मात्र एका संशोधनानुसार रात्र भर शिळा भात पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी खाल्ल्याने आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे समोर आले आहे. शिळा भात खाल्ल्याने फॅट्स वाढण्याचा भितीने अनेकजण दुसऱ्या दिवशी भाताचे सेवन करीत नाही. मात्र आसामच्या अ‍ॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटीद्वारे करण्यात आलेल्या संशोधनानुसार फर्मेट केलेला भात आरोग्यासाठी उत्तम असल्याचे जाहिर केले आहे. भाताला फर्मेट कसे करावेरात्री उरलेला भात एका मातीच्या भांड्यात पाणी टाकून ठेवावा. याने भात फर्मेंट होईल. शिळा भात फर्मेंट केल्यास त्यातील लोहाचे प्रमाण सुमारे ७० टक्क्याने वाढते. शिवाय सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियमचे प्रमाणही वाढते. सकाळी या भाताला फोडणी टाकून किंवा दह्यासोबत ब्रेकफास्टमध्ये खाल्ल्याने शरीराला पौष्टिक घटक मिळतात. काय आहेत फायदे शिळ्या भाताची तासीर गार असल्याने अधिक उष्णता असलेल्या राज्यांमध्ये फर्मेट केलेला भात खाल्ला जातो. याने शरीराचे तापमान संतुलित राहते. तसेच यात ऊर्जा प्रदान करणारे तत्त्वदेखील आढळतात. ज्याने आपल्यात दिवसभर स्फूर्ती राहते. भातात भरपूर मात्रेत फायबर्स आढळतात ज्याने बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन यासारखे आजार तसेच अल्सरसंबंधी त्रासापासूनही मुक्ती मिळते.