शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

HEALTH : ​मुलांना कांजण्या झाल्यात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2017 15:30 IST

कांजण्या हा संसर्गजन्य आजार असून सहसा शाळकरी म्हणजे ५ ते १० वर्षांच्या मुला-मुलींमध्ये जास्त प्रमाणात आढळतो.

कांजण्या हा संसर्गजन्य आजार असून सहसा शाळकरी म्हणजे ५ ते १० वर्षांच्या मुला-मुलींमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. आधीच्या काळी गोवरचे प्रमाण इतके होते की अजूनही अंगावर लाल चट्टे दिसले की, तो आजार गोवरच वाटतो. पण गोवर आणि कांजण्यांच्या अंगांवर येणाऱ्या चट्टयामध्ये एक मूलभूत फरक असतो. गोवरामध्ये अंगावर रंगाचा डब्बा ओतल्यावर तो जसा अंगावरून खाली जाईल, तसे अंगावरील पुरळ खाली सरकत जाते आणि कांजण्यांमध्ये सूर्य उगवतो तसे छातीच्या मध्यावरून पुरळ उगवते. काय काळजी घ्याल?कांजण्या हा मुदतीचा आजार असून कुठल्याही विषाणूजन्य आजारासारखा तो आपोआप बरा होतो. यादरम्यान जेवण थोडे कमी जात असेल तरी हरकत नाही, पण भरपूर पाणी प्यावे. या आजाराच्या काळात पचनशक्ती मंदावते म्हणून भूक कमी होते. यासाठी फळे-फळांचा रस देऊ शकता. सुरुवातीच्या चार-पाच दिवस अंगावरचे हे फोड वाढत जातात. फोड वाढले म्हणून घाबरण्याची गरज नसते. ते कमी  आपोआप कमी होतात. त्यांना खाज येते म्हणून तुर्तास खाज कमी होण्याची औषधे घेता येतील. या दरम्यान मुलाच्या बोटांची नखे कापून घ्यावीत. कारण फोडांना खाजवल्यामुळेच जंतुसंसर्ग होतो.या फोडांमुळे चेहऱ्यावर व्रण पडतील अशी भीती असते मात्र सहसा संसर्ग झाला नाही तर व्रण पडत नाहीत. पडले तरी काही आठवड्यात जातात. विशेष म्हणजे एकदा कांजण्या झाल्या की तेच लसीकरण ठरते आणि परत कांजण्या होत नाहीत. मात्र लहानपणीच कांजण्या होण्याअगोदर लसीकरण करुन घेणे योग्य असते.