शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
6
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
7
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
8
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
9
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
10
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
11
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
12
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
13
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
14
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
15
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
16
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
17
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
18
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
19
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर

उन्हाळ्यात टरबूज खाणे असे ठरते फायदेशीर, तर रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासही होते मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 10:39 AM

पचनतंत्र व्यवस्थित ठेवण्यासाठी टरबूज उपयोगी फळ आहे.तसेच वाढत्या वजनावरही टरबूज खाल्याने नियंत्रण मिळवू शकतो.

उन्हाळ्यात अतिउष्णतेमुळे खूप थकवा जाणवतो. बाहेरून फिरून आल्यावर लगेच घसा कोरडा पडणे आणि अशक्तपणा वाटणे अशा गोष्टी होत असतात. सतत घाम येत असल्यामुळे शरिरातील पाणी त्याद्वारे बाहेर पडत असते. परिणामी थकवा अशक्तपणा वाटतो. अशावेळी स्वतःची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे योग्य डाएट घेणे आणि जास्त पाणी पिणे जेणेकरून आपले शरिर हायड्रेड ठेवण्यास मदत होते.

 उन्हाळ्यात पौष्टिक आहार घेणे जास्त गरजेचे आहे. अशावेळी रसदार फळांचाही समावेश करणे फायदेशीर ठरते. रसदार फळं खाल्ल्याने शरिर थंड ठेवण्यास मदत होते. म्हणून उन्हाळ्यात टरबूजची मागणी अधिक वाढते. विशेष म्हणजे टरबूज हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीरही ठरते. नियमित सेवन केल्यास वजन नियंत्रणात राहते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवल्यास कोणत्याही प्रकारचा व्हायरची लागण होण्यासही बचाव होतो. ज्या लोकांना कामाचा किंवा इतर गोष्टींचा जास्त ताण आहे अशा लोकांनी टरबूजचे सेवन केल्यास डोकं शांत आणि मन प्रसन्न राहते. टरबूज हे अतिशय गुणकारी असे फळ आहे. 

टरबूजमध्ये भरपूर व्व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात  'ए' आणि 'सी' व्हिटॅमिन यांत अधिक असल्यामुळे याचा आपल्या शरिराला अधिक फायदा होतो. व्हिटॅमिन 'सी' रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जास्त फायदेशीर ठरते. इतकेच नाही तर टरबूजमध्ये ९० टक्के इतके पाण्याचे प्रमाण असते. टरबूजचे नियमित सेवन केल्यास आपल्या शरिरातील पाण्याचे प्रमाण वाढवण्यासही मदत होते. पचनतंत्र व्यवस्थित ठेवण्यासाठी टरबूज उपयोगी फळ आहे.तसेच वाढत्या वजनावरही टरबूज खाल्याने नियंत्रण मिळवू शकतो.