शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

अन्नपदार्थांना द्या मुलांचं प्रेम..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 16:53 IST

तीही तुमचं आयुष्य समृद्ध करतील..

ठळक मुद्देअन्नपदार्थांबरोबर तुम्हीही जगा. त्या त्या पदार्थाची चव, रंग, स्पर्श, आकार या सगळ्या गोष्टी मनापासून अनुभवा.जे लोक अशा पद्धतीनं अन्नपदार्थांचा आस्वाद घेतात, त्यांचं आयुष्यही तुलनेनं सुखी असतं.तुलनेनं ही मंडळी उत्साही, तत्पर आणि कोणत्याही आव्हानांना सहजपणे सामोरी जाणारी, त्यांना भिडणारी असतात..

- मयूर पठाडेरोज आपण जेवण करतो. अगदी रोज. उपासतापासाच्या दिवशीचं जाऊ द्या, पण दिवसांतून किमान दोनदा आपण जेवण करतो. त्याशिवाय बºयाचदा नाश्ता किंवा इतर वेळीही आपण काही ना काही तोंडात टाकत असतो.आपल्या लक्षात येते किंवा लक्षात राहाते ती केवळ त्या त्या पदार्थाची चव. पण हा पदार्थ आपण कधी जगला आहे?तुम्ही म्हणाल, पदार्थ जगायचा म्हणजे काय करायचं?काही नाही, लहान मूल, त्यातही ते तान्हं मूल असेल, तर त्याकडे आपण किती बारकाईनं लक्ष देतो. त्याला काय हवं, नको, त्याला काही होतंय काए त्याची खाण्यापिण्याची वेळ, त्याला वेळच्या वेळी द्यायच्या लस, त्याची वाढ व्यवस्थित होते आहे की नाही, वेळच्या वेळी सारे नैसर्गिक विधि त्याला होताहेत की नाही, योग्य वेळी ते पालथं पडतंय का, रांगतंय का?.. एक ना अनेक अशा हजार गोष्टी.. मुलाबरोबरचे ते सारे क्षण आपण जगत असतो. आपल्या आनंदाचा आणि आयुष्याचा तो एक भाग असतो..आपल्या जेवणाच्या बाबतीतही तेच आहे. म्हणजे जे पदार्थ आपण खातो, ते किती आवडीनं खातो. त्या पदार्थाचं रंग, रुप, ठेवण, त्याचा स्पर्श.. यातलं आपण काय काय अनुभवतो? खरं तर काहीच नाही. अनेकदा तर आपण समरसून त्याची चवही घेत नाही.. खाल्लंच पाहिजे म्हणून आपण अनेक गोष्टी पोटात ढकलत असतो. त्याची सवय झाली म्हणूनही अनेकदा आपण तोंडात काहीही ना काही सरकवत असतो.. पण अभ्यासकांचं म्हणणं आहे, त्या अन्नपदार्थांबरोबर तुम्हीही जगा. त्या त्या पदार्थाची चव, रंग, स्पर्श, आकार या सगळ्या गोष्टी मनापासून अनुभवा. हा अनुभव तुमचं केवळ पोषणच करणार नाही, तर एक अपूर्व असा आनंद तुम्हाला देऊन जाईल..जे लोक अशा पद्धतीनं अन्नपदार्थांचा आस्वाद घेतात, त्यांचं आयुष्यही तुलनेनं सुखी असतं, ताणतणावांपासून अशा व्यक्ती बºयाच दूर असतात. म्हणजे त्यांना काहीच टेन्शन्स नसतात, असं नाही, पण ही अन्नदेवता त्यांची ही सारी टेन्शन्स आपोआप कमी करते. तुलनेनं ही मंडळी उत्साही, तत्पर आणि कोणत्याही आव्हानांना सहजपणे सामोरी जाणारी आणि त्यांना भिडणारी असतात, असं निरीक्षण आहे.खरंतर आपल्या पूर्वजांनी आणि वाडवडिलांनी हेच सांगून ठेवलं आहे. आजीबाईच्या बटव्यातीलच ही गोष्ट. ती पुन्हा अनुभवायला काय हरकत आहे?