शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

अन्नपदार्थांना द्या मुलांचं प्रेम..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 16:53 IST

तीही तुमचं आयुष्य समृद्ध करतील..

ठळक मुद्देअन्नपदार्थांबरोबर तुम्हीही जगा. त्या त्या पदार्थाची चव, रंग, स्पर्श, आकार या सगळ्या गोष्टी मनापासून अनुभवा.जे लोक अशा पद्धतीनं अन्नपदार्थांचा आस्वाद घेतात, त्यांचं आयुष्यही तुलनेनं सुखी असतं.तुलनेनं ही मंडळी उत्साही, तत्पर आणि कोणत्याही आव्हानांना सहजपणे सामोरी जाणारी, त्यांना भिडणारी असतात..

- मयूर पठाडेरोज आपण जेवण करतो. अगदी रोज. उपासतापासाच्या दिवशीचं जाऊ द्या, पण दिवसांतून किमान दोनदा आपण जेवण करतो. त्याशिवाय बºयाचदा नाश्ता किंवा इतर वेळीही आपण काही ना काही तोंडात टाकत असतो.आपल्या लक्षात येते किंवा लक्षात राहाते ती केवळ त्या त्या पदार्थाची चव. पण हा पदार्थ आपण कधी जगला आहे?तुम्ही म्हणाल, पदार्थ जगायचा म्हणजे काय करायचं?काही नाही, लहान मूल, त्यातही ते तान्हं मूल असेल, तर त्याकडे आपण किती बारकाईनं लक्ष देतो. त्याला काय हवं, नको, त्याला काही होतंय काए त्याची खाण्यापिण्याची वेळ, त्याला वेळच्या वेळी द्यायच्या लस, त्याची वाढ व्यवस्थित होते आहे की नाही, वेळच्या वेळी सारे नैसर्गिक विधि त्याला होताहेत की नाही, योग्य वेळी ते पालथं पडतंय का, रांगतंय का?.. एक ना अनेक अशा हजार गोष्टी.. मुलाबरोबरचे ते सारे क्षण आपण जगत असतो. आपल्या आनंदाचा आणि आयुष्याचा तो एक भाग असतो..आपल्या जेवणाच्या बाबतीतही तेच आहे. म्हणजे जे पदार्थ आपण खातो, ते किती आवडीनं खातो. त्या पदार्थाचं रंग, रुप, ठेवण, त्याचा स्पर्श.. यातलं आपण काय काय अनुभवतो? खरं तर काहीच नाही. अनेकदा तर आपण समरसून त्याची चवही घेत नाही.. खाल्लंच पाहिजे म्हणून आपण अनेक गोष्टी पोटात ढकलत असतो. त्याची सवय झाली म्हणूनही अनेकदा आपण तोंडात काहीही ना काही सरकवत असतो.. पण अभ्यासकांचं म्हणणं आहे, त्या अन्नपदार्थांबरोबर तुम्हीही जगा. त्या त्या पदार्थाची चव, रंग, स्पर्श, आकार या सगळ्या गोष्टी मनापासून अनुभवा. हा अनुभव तुमचं केवळ पोषणच करणार नाही, तर एक अपूर्व असा आनंद तुम्हाला देऊन जाईल..जे लोक अशा पद्धतीनं अन्नपदार्थांचा आस्वाद घेतात, त्यांचं आयुष्यही तुलनेनं सुखी असतं, ताणतणावांपासून अशा व्यक्ती बºयाच दूर असतात. म्हणजे त्यांना काहीच टेन्शन्स नसतात, असं नाही, पण ही अन्नदेवता त्यांची ही सारी टेन्शन्स आपोआप कमी करते. तुलनेनं ही मंडळी उत्साही, तत्पर आणि कोणत्याही आव्हानांना सहजपणे सामोरी जाणारी आणि त्यांना भिडणारी असतात, असं निरीक्षण आहे.खरंतर आपल्या पूर्वजांनी आणि वाडवडिलांनी हेच सांगून ठेवलं आहे. आजीबाईच्या बटव्यातीलच ही गोष्ट. ती पुन्हा अनुभवायला काय हरकत आहे?