शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

अन्नपदार्थांना द्या मुलांचं प्रेम..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 16:53 IST

तीही तुमचं आयुष्य समृद्ध करतील..

ठळक मुद्देअन्नपदार्थांबरोबर तुम्हीही जगा. त्या त्या पदार्थाची चव, रंग, स्पर्श, आकार या सगळ्या गोष्टी मनापासून अनुभवा.जे लोक अशा पद्धतीनं अन्नपदार्थांचा आस्वाद घेतात, त्यांचं आयुष्यही तुलनेनं सुखी असतं.तुलनेनं ही मंडळी उत्साही, तत्पर आणि कोणत्याही आव्हानांना सहजपणे सामोरी जाणारी, त्यांना भिडणारी असतात..

- मयूर पठाडेरोज आपण जेवण करतो. अगदी रोज. उपासतापासाच्या दिवशीचं जाऊ द्या, पण दिवसांतून किमान दोनदा आपण जेवण करतो. त्याशिवाय बºयाचदा नाश्ता किंवा इतर वेळीही आपण काही ना काही तोंडात टाकत असतो.आपल्या लक्षात येते किंवा लक्षात राहाते ती केवळ त्या त्या पदार्थाची चव. पण हा पदार्थ आपण कधी जगला आहे?तुम्ही म्हणाल, पदार्थ जगायचा म्हणजे काय करायचं?काही नाही, लहान मूल, त्यातही ते तान्हं मूल असेल, तर त्याकडे आपण किती बारकाईनं लक्ष देतो. त्याला काय हवं, नको, त्याला काही होतंय काए त्याची खाण्यापिण्याची वेळ, त्याला वेळच्या वेळी द्यायच्या लस, त्याची वाढ व्यवस्थित होते आहे की नाही, वेळच्या वेळी सारे नैसर्गिक विधि त्याला होताहेत की नाही, योग्य वेळी ते पालथं पडतंय का, रांगतंय का?.. एक ना अनेक अशा हजार गोष्टी.. मुलाबरोबरचे ते सारे क्षण आपण जगत असतो. आपल्या आनंदाचा आणि आयुष्याचा तो एक भाग असतो..आपल्या जेवणाच्या बाबतीतही तेच आहे. म्हणजे जे पदार्थ आपण खातो, ते किती आवडीनं खातो. त्या पदार्थाचं रंग, रुप, ठेवण, त्याचा स्पर्श.. यातलं आपण काय काय अनुभवतो? खरं तर काहीच नाही. अनेकदा तर आपण समरसून त्याची चवही घेत नाही.. खाल्लंच पाहिजे म्हणून आपण अनेक गोष्टी पोटात ढकलत असतो. त्याची सवय झाली म्हणूनही अनेकदा आपण तोंडात काहीही ना काही सरकवत असतो.. पण अभ्यासकांचं म्हणणं आहे, त्या अन्नपदार्थांबरोबर तुम्हीही जगा. त्या त्या पदार्थाची चव, रंग, स्पर्श, आकार या सगळ्या गोष्टी मनापासून अनुभवा. हा अनुभव तुमचं केवळ पोषणच करणार नाही, तर एक अपूर्व असा आनंद तुम्हाला देऊन जाईल..जे लोक अशा पद्धतीनं अन्नपदार्थांचा आस्वाद घेतात, त्यांचं आयुष्यही तुलनेनं सुखी असतं, ताणतणावांपासून अशा व्यक्ती बºयाच दूर असतात. म्हणजे त्यांना काहीच टेन्शन्स नसतात, असं नाही, पण ही अन्नदेवता त्यांची ही सारी टेन्शन्स आपोआप कमी करते. तुलनेनं ही मंडळी उत्साही, तत्पर आणि कोणत्याही आव्हानांना सहजपणे सामोरी जाणारी आणि त्यांना भिडणारी असतात, असं निरीक्षण आहे.खरंतर आपल्या पूर्वजांनी आणि वाडवडिलांनी हेच सांगून ठेवलं आहे. आजीबाईच्या बटव्यातीलच ही गोष्ट. ती पुन्हा अनुभवायला काय हरकत आहे?