शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

जेनेरिक की ब्रँडेड? काेणते औषध खाल्ल्याने आजार बरा हाेईल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2023 11:30 IST

भारताच्या जेनेरिक व ब्रँडेड औषध व्यवसायाचे भवितव्य नक्कीच उज्ज्वल आहे, पण...

- डॉ. सुरेश सरवडेकर, माजी आरोग्य उपसंचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग

केंद्र सरकारने औषधांच्या किमती १० टक्क्यांपर्यंत वाढविण्यास परवानगी दिल्याने ३०० पेक्षा अधिक औषधे महाग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जेनेरिक की ब्रँडेड औषधे घ्यावीत? औषधांची किंमत कशी ठरते? औषधांचा दर्जा कसा निश्चित करतात? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. एखादे औषध नव्यानेच शोधून काढल्यास त्याला ‘पेटंट औषध’ असे म्हणतात. औषध शोधणाऱ्या कंपनीला हे पेटंट मक्तेदारी म्हणून १५ ते २० वर्षे मिळते व ते त्यांना हवे त्या किमतीला विकू शकतात. पण, पेटंट संपल्यानंतर सदर औषध दुसरे उत्पादकही बनवू शकतात, त्यांना जेनेरिक औषधे असे म्हणतात. तेच जेनेरिक औषध काही कंपन्या स्वतः च्या नावाने विकतात. सर्व औषधांचा शोध प्रामुख्याने पुढारलेल्या देशांमध्येच  होत असल्याने भारतात निर्माण केलेली सर्व औषधे फक्त जेनेरिकच असतात.

सध्या देशात साधारणपणे २८७२  औषधे ४७ हजार ७४८ ब्रँड नावांनी विकली जातात. महिन्याला सरासरी २३५ नवीन ब्रँड बाजारात येतात. एकाच जेनेरिक औषधाचे जवळजवळ शंभर ते दोनशे ब्रँड सध्या उपलब्ध आहेत. पेटंट, जेनेरिक व ब्रँडेड औषधे यांच्या किमतीमध्ये खूप फरक असतो पण, दर्जामध्ये खरोखरच फरक असतो का ? जुलै २०२२ महिन्यामध्ये गांबिया व उझबेकिस्तानमध्ये भारतातून आयात केलेल्या खोकल्यावरील औषधांमुळे अनेक मुलांचा मृत्यू झाला. तसेच, ती औषधे निकृष्ट दर्जाची असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले व त्याच्या वापरावर प्रतिबंध आणला. तेव्हा भारतीय औषध नियंत्रण प्रशासन जागे झाले  व सदर औषध भारतात पुरवठा झालेले नाही, असे म्हणून हात वर करते झाले. 

किमतीपेक्षा दर्जा महत्त्वाचा

देशांतर्गत व सर्व जगभर एकाच सर्वोच्च दर्जाची औषधे उपलब्ध करणे,  उत्पादित करणे व आयात-निर्यात करणे औषध उत्पादकांना बंधनकारक करणे जरुरी आहे. जेनेरिक औषधांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाबद्दलच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयावर (२००३) जेव्हा औषध कंपनीकडून न्यायलयात खटला भरला, तेव्हा मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालिन न्यायमूर्ती आर. एम. लोढा यांनी ‘हेल्थ इज वेल्थ ॲण्ड पब्लिक हेल्थ  इज नॅशनल वेल्थ’  असे नोंदवून औषधांच्या किमतीपेक्षा दर्जा महत्त्वाचा आहे, असे नमूद करून शासनाच्या निर्णयास अनुमोदन दिले.

भारतातील औषध उत्पादनातील व्यापार नीती

मोठमोठ्या कंपन्या स्वतःचा उत्पादन खर्च कमी करायचा म्हणून तेच औषध छोट्या कंपन्यांकडून ‘आउट सोर्सिंग बेसिस’ वर स्वस्तात बनवून घेतात व स्वतः चे लेबल लावून ब्रँड नावाने महागात विकतात. हे असे करण्यास काहीच हरकत नाही. पण, ही ‘थर्ड पार्टी व्यवस्था’ कायद्यातून पळवाट म्हणून वापरली जाते, तेव्हा दर्जाचा नक्कीच घात  होतो.  औषधाचा दर्जा ही जीवनावश्यक बाब असली तरी जागतिकस्तरावर व देशांतर्गत विचार करताना शासनाच्या उद्योगधार्जिण्या धोरणामुळे केवळ व्यापारनीतीच वापरली जाते, हे लक्षात येते. त्यामुळे जेनेरिक औषधे केवळ स्वस्त आहेत व ब्रँडेड औषधे केवळ चांगल्या कंपनीची आहेत म्हणून त्यांचा दर्जाही उत्तमच असेल, असे म्हणता येत नाही. 

व्यवसायाचे भवितव्य उज्ज्वल

भारताच्या जेनेरिक व ब्रँडेड औषध व्यवसायाचे  भवितव्य  नक्कीच उज्ज्वल आहे. पण, त्यासाठी दर्जाबद्दलच्या ‘कचखाऊ’ व ‘जुगाड’ वृत्तीला वेळीच पायबंद घालणे अत्यंत  महत्त्वाचे आहे, तसेच केवळ किमती नियंत्रणात ठेवल्याने औषधाचा दर्जाही नियंत्रणात राहील, असे समजणे चुकीचे आहे, हे यावरून लक्षात यावे.

भारतात सर्व औषधे तीन दर्जाची बनविली जातात व निर्यात केली जातात

उच्च दर्जा : श्रीमंत देशांसाठी उत्पादित व निर्यात केली जातात. कनिष्ठ दर्जा : ही औषधे आर्थिकदृष्ट्या  विकसित देशांमध्ये  निर्यात केली जातात.कामचलाऊ : ही औषधे भारतात देशांतर्गत (डोमेस्टिक) मार्केटसाठी वापरली जातात व  तांत्रिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या कमकुवत देशांमध्ये (आफ्रिकन) निर्यात केली जातात. 

टॅग्स :medicinesऔषधंHealthआरोग्य