शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
2
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
3
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
4
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
5
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
6
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत
7
श्रावणात ४ गुरुवार: ४ कामे करा, विश्वास ठेवा; अशक्य शक्य होईल, स्वामी सोबत असतील, भिऊ नकोस…
8
पावसाचे तांडव! घरांमध्ये शिरले पाणी आणि चिखल, गाड्या दबल्या गाळात; थरकाप उडवणारी दृश्ये
9
J&K: ४८ तास, ४ कारवाया अन् ५ दहशतवादी ठार; सुरक्षा दलांना मिळाले मोठे यश
10
पहिला श्रावण गुरुवार: ८ राशींना चौफेर लाभ, भाग्याची साथ; भरघोस भरभराट, स्वामींची अपार कृपा!
11
नवरा-बायकोचा घटस्फोट, नंतर दोघांनाही आवडली एकच मुलगी, एकत्र राहू लागले अन् मग...
12
भारत-सीरिया राजकीय संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात, भारताचा फायदा काय? समजून घ्या
13
वाढदिवसाला बारीक होण्याचा अट्टाहास ठरला जीवघेणा; १६ वर्षांच्या मुलीने 'असं' डाएट केलं अन्...
14
भर रस्त्यात कारचं पार्किंग, स्टेअरिंगवर चक्क कुत्रा! अंधेरीच्या लोखंडवालामध्ये अजब प्रकार; व्हिडिओ व्हायरल...
15
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
16
ज्योतिबा डोंगरावर चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा सुरू; पहा आईचे विलोभनीय रूप!
17
Kamchatka Tsunami : जगाचा छोटासा कोपरा बनला भूकंपाचा अड्डा, एका झटक्यात 'या' १२ देशांना हादरवलं! त्सुनामीचा अलर्ट जारी
18
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
19
महिलेचा कारनामा, एकाच वेळी २० युवकांना लावला चुना; प्रेमात फसवून प्रत्येकाकडून iPhone घेतले, मग...
20
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?

जेनेरिक की ब्रँडेड? काेणते औषध खाल्ल्याने आजार बरा हाेईल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2023 11:30 IST

भारताच्या जेनेरिक व ब्रँडेड औषध व्यवसायाचे भवितव्य नक्कीच उज्ज्वल आहे, पण...

- डॉ. सुरेश सरवडेकर, माजी आरोग्य उपसंचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग

केंद्र सरकारने औषधांच्या किमती १० टक्क्यांपर्यंत वाढविण्यास परवानगी दिल्याने ३०० पेक्षा अधिक औषधे महाग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जेनेरिक की ब्रँडेड औषधे घ्यावीत? औषधांची किंमत कशी ठरते? औषधांचा दर्जा कसा निश्चित करतात? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. एखादे औषध नव्यानेच शोधून काढल्यास त्याला ‘पेटंट औषध’ असे म्हणतात. औषध शोधणाऱ्या कंपनीला हे पेटंट मक्तेदारी म्हणून १५ ते २० वर्षे मिळते व ते त्यांना हवे त्या किमतीला विकू शकतात. पण, पेटंट संपल्यानंतर सदर औषध दुसरे उत्पादकही बनवू शकतात, त्यांना जेनेरिक औषधे असे म्हणतात. तेच जेनेरिक औषध काही कंपन्या स्वतः च्या नावाने विकतात. सर्व औषधांचा शोध प्रामुख्याने पुढारलेल्या देशांमध्येच  होत असल्याने भारतात निर्माण केलेली सर्व औषधे फक्त जेनेरिकच असतात.

सध्या देशात साधारणपणे २८७२  औषधे ४७ हजार ७४८ ब्रँड नावांनी विकली जातात. महिन्याला सरासरी २३५ नवीन ब्रँड बाजारात येतात. एकाच जेनेरिक औषधाचे जवळजवळ शंभर ते दोनशे ब्रँड सध्या उपलब्ध आहेत. पेटंट, जेनेरिक व ब्रँडेड औषधे यांच्या किमतीमध्ये खूप फरक असतो पण, दर्जामध्ये खरोखरच फरक असतो का ? जुलै २०२२ महिन्यामध्ये गांबिया व उझबेकिस्तानमध्ये भारतातून आयात केलेल्या खोकल्यावरील औषधांमुळे अनेक मुलांचा मृत्यू झाला. तसेच, ती औषधे निकृष्ट दर्जाची असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले व त्याच्या वापरावर प्रतिबंध आणला. तेव्हा भारतीय औषध नियंत्रण प्रशासन जागे झाले  व सदर औषध भारतात पुरवठा झालेले नाही, असे म्हणून हात वर करते झाले. 

किमतीपेक्षा दर्जा महत्त्वाचा

देशांतर्गत व सर्व जगभर एकाच सर्वोच्च दर्जाची औषधे उपलब्ध करणे,  उत्पादित करणे व आयात-निर्यात करणे औषध उत्पादकांना बंधनकारक करणे जरुरी आहे. जेनेरिक औषधांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाबद्दलच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयावर (२००३) जेव्हा औषध कंपनीकडून न्यायलयात खटला भरला, तेव्हा मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालिन न्यायमूर्ती आर. एम. लोढा यांनी ‘हेल्थ इज वेल्थ ॲण्ड पब्लिक हेल्थ  इज नॅशनल वेल्थ’  असे नोंदवून औषधांच्या किमतीपेक्षा दर्जा महत्त्वाचा आहे, असे नमूद करून शासनाच्या निर्णयास अनुमोदन दिले.

भारतातील औषध उत्पादनातील व्यापार नीती

मोठमोठ्या कंपन्या स्वतःचा उत्पादन खर्च कमी करायचा म्हणून तेच औषध छोट्या कंपन्यांकडून ‘आउट सोर्सिंग बेसिस’ वर स्वस्तात बनवून घेतात व स्वतः चे लेबल लावून ब्रँड नावाने महागात विकतात. हे असे करण्यास काहीच हरकत नाही. पण, ही ‘थर्ड पार्टी व्यवस्था’ कायद्यातून पळवाट म्हणून वापरली जाते, तेव्हा दर्जाचा नक्कीच घात  होतो.  औषधाचा दर्जा ही जीवनावश्यक बाब असली तरी जागतिकस्तरावर व देशांतर्गत विचार करताना शासनाच्या उद्योगधार्जिण्या धोरणामुळे केवळ व्यापारनीतीच वापरली जाते, हे लक्षात येते. त्यामुळे जेनेरिक औषधे केवळ स्वस्त आहेत व ब्रँडेड औषधे केवळ चांगल्या कंपनीची आहेत म्हणून त्यांचा दर्जाही उत्तमच असेल, असे म्हणता येत नाही. 

व्यवसायाचे भवितव्य उज्ज्वल

भारताच्या जेनेरिक व ब्रँडेड औषध व्यवसायाचे  भवितव्य  नक्कीच उज्ज्वल आहे. पण, त्यासाठी दर्जाबद्दलच्या ‘कचखाऊ’ व ‘जुगाड’ वृत्तीला वेळीच पायबंद घालणे अत्यंत  महत्त्वाचे आहे, तसेच केवळ किमती नियंत्रणात ठेवल्याने औषधाचा दर्जाही नियंत्रणात राहील, असे समजणे चुकीचे आहे, हे यावरून लक्षात यावे.

भारतात सर्व औषधे तीन दर्जाची बनविली जातात व निर्यात केली जातात

उच्च दर्जा : श्रीमंत देशांसाठी उत्पादित व निर्यात केली जातात. कनिष्ठ दर्जा : ही औषधे आर्थिकदृष्ट्या  विकसित देशांमध्ये  निर्यात केली जातात.कामचलाऊ : ही औषधे भारतात देशांतर्गत (डोमेस्टिक) मार्केटसाठी वापरली जातात व  तांत्रिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या कमकुवत देशांमध्ये (आफ्रिकन) निर्यात केली जातात. 

टॅग्स :medicinesऔषधंHealthआरोग्य