शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यांचे आरोग्यही महत्त्वाचे - पद्मश्री डॉ. एस. नटराजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 00:54 IST

आपल्या हृदयाप्रमाणेच डोळ्यांच्या आरोग्यविषयक समस्याही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. मात्र, या समस्यांकडे आपण कायमच दुर्लक्ष करतो. त्यामुळे उशिरा निदान झाल्यामुळे ...

आपल्या हृदयाप्रमाणेच डोळ्यांच्या आरोग्यविषयक समस्याही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. मात्र, या समस्यांकडे आपण कायमच दुर्लक्ष करतो. त्यामुळे उशिरा निदान झाल्यामुळे त्यावर उपचार करणे कठीण होते. बरेचदा नेत्रतज्ज्ञांकडे येणाऱ्या ८५ टक्के रुग्णांमध्ये डोळ्यांच्या समस्यांचे उशिराने निदान होते. हे चुकीचे असून, रुग्णांनी कोरोनाच्या काळातही योग्य ती खबरदारी घेऊन उपचार घेतले पाहिजेत, असा महत्त्वाचा सल्ला ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ आणि आदित्य ज्योत आय हॉस्पिटलचे सीएमडी पद्मश्री डॉ. एस. नटराजन यांनी दिला आहे.

हल्ली वेळेच्या आत जन्माला येणारी बालके, जन्माच्या वेळी जेमतेम १,००० ग्रामपेक्षा कमी वजन असलेली बालके प्रगत वैद्यकीय तंत्राचा आधार घेऊन वाचविता येऊ शकतात, असे नमूद करीत डॉ.नटराजन म्हणाले, मुळात गर्भातल्या बाळाची वाढ ही तिसऱ्या महिन्यापासूनच सुरू होते. गर्भात गरोदरपणातल्या टप्प्यावर एकेक अवयवही विकसित होत असतात. वेळेच्या आत जन्माला येणाऱ्या बालकांमध्ये रेटिना विकसित होण्यात अडसर येतो. शिवाय अतिप्रकाशामुळे अशा बालकांच्या डोळ्यातील आतल्या पडद्यावरही परिणाम होण्याची जोखीम असते. रेटिनाला वाहिन्यांद्वारे योग्य प्राणवायू पोहोचत नाही. त्यामुळे शरीर पर्यायी रक्तवाहिन्या विकसित करते. हे दृष्टीसाठी धोक्याचे ठरते. हे टाळण्यासाठी लेझर ट्रिटमेंट उपलब्ध आहे. प्रदीर्घ काळातल्या मधुमेहातही रेटिना खराब होण्याची जोखीम असते.

अनेकदा डोळ्यांना जखमा झाल्याने रुग्ण उपचाराला येतात. विशेषत: अपघाती रुग्ण आणि खेळाडूंमध्ये हे प्रमाण अधिक आहे. जराशी काळजी घेतली, तर शरीराचा हा अत्यंत महत्त्वाचा आणि दृष्टी देणारा हा अवयव वाचविला जाऊ शकतो, याकडे डॉ.नटराजन यांनी लक्ष वेधले.प्रगत झालेल्या वैद्यकशास्त्रामुळे सरासरी आयुष्यमानात वाढ झाली आहे. दुर्धर व्याधीही आटोक्यात येऊ शकतात. गरोदरपणातल्या जोखिमा ओळखताही येतात. मात्र, अनेक जोखिमा टाळता येत नाहीत. गर्भातल्या बाळाची शारीरिक व मानसिकदृष्ट्या पूर्णपणे वाढ होण्यासाठी किमान ३६ आठवड्यांचा कालावधी लागतो. मात्र, अनेकदा ही नैसर्गिक साखळी खंडित होते. त्यामुळे मुदतपूर्व बाळंतपणे होतात. अशा वेळी रेटिना विकसित न झाल्याने या बालकांना अंधत्वाचे धोके असतात, असे डॉ. नटराजन म्हणाले.

देशात नेत्रविकार असलेले असंख्य रुग्ण आहेत. अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सर्वच लोकांना परवडत नाही. त्यामुळे भारतीय नेत्रतज्ज्ञांनी संशोधन, नवीनता, तसेच तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रभावी कामगिरी करावी व आपल्या संशोधनाचा लाभ सर्वसामान्य गरजूंना करून द्यायला हवा. आपल्या देशात सुश्रुताने हजारो वर्षांपूर्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली होती. अलीकडच्या काळात नेत्रविकार चिकित्सेवर देशात चांगले संशोधन झाले आहे. नेत्रदान चळवळ, नेत्रविकार, तसेच मधुमेहामुळे होणारे नेत्रविकार यांबद्दल समाजात अधिक जनजागृती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. भावी पिढीला नेत्रविकारांबाबत जागरूक करण्यासाठी नेत्रविकार तज्ज्ञांच्या संघटनेने पुढाकार घेऊन, या क्षेत्रात अधिक परिणामकारक संशोधनाचे कार्य हाती घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.     (शब्दांकन : स्नेहा मोरे)

 

टॅग्स :Healthआरोग्य