शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

'हे' आहेत रात्री उशिरा जेवण्याचे साइड इफेक्ट्स; लगेच बदला सवय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 16:32 IST

काही लोक रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहात असतात. तर काही मोबाइलवर व्यस्त असतात. अशा लोकांना जेवण्यासाठीही वेळ नसतो. अनेकदा तर या व्यक्तींच्या जेवण करणं लक्षातच राहत नाही.

(Image Credit : Naturally Savvy)

काही लोक रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहात असतात. तर काही मोबाइलवर व्यस्त असतात. अशा लोकांना जेवण्यासाठीही वेळ नसतो. अनेकदा तर या व्यक्तींच्या जेवण करणं लक्षातच राहत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का? रात्री उशीरा जेवलं तर सकाळी तुमचा मूड फ्रेश राहत नाही. ऑफिसचं काम करतानाही तुम्ही एनर्जेटिक नसता. अशातच गरजेचं आहे की, रात्री भरपूर झोप घेण्याइतकचं शांत झोप घेणंही आवश्यक असतं. जर तुम्ही दररोज रात्री उशीरा जेवत असाल तर तुम्हाला शरीराच्या अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

(Image Credit : Men's Health India)

रात्री योग्य वेळी न जेवल्याने होणारा त्रास :

शांत झोप न लागणं 

पूर्ण दिवस थकल्यानंतर जर तुम्हाला शांत झोप पाहिजे असेल तर रात्री लवकर झोपण्याची सवय लावा. जर तुम्हाला ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबून काम करायचं असेल तर तिथेच हेल्दी डिनर करू शकता. त्यासाठी घरूनच जेवण घेऊन जा. जर तुम्ही लवकर जेवलात तर रात्री लवकर झोपू शकता. यामुळे तुम्हाला सकाळी फ्रेश वाटतं. 

हृदयाचे आरोग्य बिघडतं

ज्या व्यक्ती रात्री उशिरा जेवतात. त्यांना हृदयाच्या समस्या होण्याचा धोका अधिक असतो. हृदय हेल्दी ठेवण्यासाठी आवश्यक आहे लवकर जेवण करणं. यामुळे जेवण व्यवस्थित पचण्यास मदत होते. फॅट आणि कोलेस्ट्रॉलचा धोका वाढतो आणि हृदयाचे आरोग्य उत्तम राहते. 

वजन वाढू शकतं

ज्या व्यक्तींचं वजन जास्त आहे, अशा व्यक्ती जर रात्री उशिरा जेवत असतील तर त्यांचं वजन आणखी वाढतं. यामुळे शरीराच्या इतरही समस्या होऊ शकतात. जर तुम्हाला वजन कमी करण्याची इच्छा असेल तर रात्री उशिरा जेवण्याची सवय बदला. रात्री जवल्यानंतर थोडा वेळ वॉक नक्की करा. यामुळे जेवण व्यवस्थित पचण्यास मदत होते आणि शरीरामध्ये फॅट्स जमा होत नाहीत. 

छातीमध्ये जळजळ होणं

उशीरा जेवणं किंवा जेवल्यानंतर लगेच झोपणं या सवयींमुळे गॅसची समस्या वाढते. गॅसमुळ पोटात आणि छातीमध्ये जळजळ होते आणि अस्वस्थ वाटतं. यामुळे तुम्हाला शांत झोपही लागणार नाही. 

पोटाच्या समस्यांचा सामना करणं

ज्या व्यक्ती रात्री उशिरा जेवतात, त्यांना नेहमी पोटदुखी, अपचन यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. जेवलेलं अन्न व्यवस्थित न पचल्यामुळे या सर्व समस्या उद्भवतात. पोटदुखी, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही रात्रीचं जेवण वेळेत करणं गरजेचं असतं. 

थकवा येणं

रात्री उशिरा जेवल्यामुळे शरीरावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. कोणत्याही समस्यांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक आहे की, तुम्ही 8 ते 9 वाजेपर्यंत जेवण करावं. वेळेवर झोपणं आणि जेवणं यांमुळे सकाळई उठल्यावर तुम्ही फ्रेश असाल. तसेच कामही तितक्याच उत्साहात कराल. 

पोट राहिल हलकं

जर तुम्ही वेळेवर जेवण करत असाल तर जेवण पचण्यास पूर्ण वेळ मिळतो. जेवल्यानंतर फिरायला गेल्याने जेवणं पचण्यास मदत होते आणि पोट हलकं राहतं. तसेच अॅसिडीटी आणि अपचन यांसारख्या समस्या होत नाहीत. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHeart Diseaseहृदयरोग