शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

'हे' आहेत रात्री उशिरा जेवण्याचे साइड इफेक्ट्स; लगेच बदला सवय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 16:32 IST

काही लोक रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहात असतात. तर काही मोबाइलवर व्यस्त असतात. अशा लोकांना जेवण्यासाठीही वेळ नसतो. अनेकदा तर या व्यक्तींच्या जेवण करणं लक्षातच राहत नाही.

(Image Credit : Naturally Savvy)

काही लोक रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहात असतात. तर काही मोबाइलवर व्यस्त असतात. अशा लोकांना जेवण्यासाठीही वेळ नसतो. अनेकदा तर या व्यक्तींच्या जेवण करणं लक्षातच राहत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का? रात्री उशीरा जेवलं तर सकाळी तुमचा मूड फ्रेश राहत नाही. ऑफिसचं काम करतानाही तुम्ही एनर्जेटिक नसता. अशातच गरजेचं आहे की, रात्री भरपूर झोप घेण्याइतकचं शांत झोप घेणंही आवश्यक असतं. जर तुम्ही दररोज रात्री उशीरा जेवत असाल तर तुम्हाला शरीराच्या अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

(Image Credit : Men's Health India)

रात्री योग्य वेळी न जेवल्याने होणारा त्रास :

शांत झोप न लागणं 

पूर्ण दिवस थकल्यानंतर जर तुम्हाला शांत झोप पाहिजे असेल तर रात्री लवकर झोपण्याची सवय लावा. जर तुम्हाला ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबून काम करायचं असेल तर तिथेच हेल्दी डिनर करू शकता. त्यासाठी घरूनच जेवण घेऊन जा. जर तुम्ही लवकर जेवलात तर रात्री लवकर झोपू शकता. यामुळे तुम्हाला सकाळी फ्रेश वाटतं. 

हृदयाचे आरोग्य बिघडतं

ज्या व्यक्ती रात्री उशिरा जेवतात. त्यांना हृदयाच्या समस्या होण्याचा धोका अधिक असतो. हृदय हेल्दी ठेवण्यासाठी आवश्यक आहे लवकर जेवण करणं. यामुळे जेवण व्यवस्थित पचण्यास मदत होते. फॅट आणि कोलेस्ट्रॉलचा धोका वाढतो आणि हृदयाचे आरोग्य उत्तम राहते. 

वजन वाढू शकतं

ज्या व्यक्तींचं वजन जास्त आहे, अशा व्यक्ती जर रात्री उशिरा जेवत असतील तर त्यांचं वजन आणखी वाढतं. यामुळे शरीराच्या इतरही समस्या होऊ शकतात. जर तुम्हाला वजन कमी करण्याची इच्छा असेल तर रात्री उशिरा जेवण्याची सवय बदला. रात्री जवल्यानंतर थोडा वेळ वॉक नक्की करा. यामुळे जेवण व्यवस्थित पचण्यास मदत होते आणि शरीरामध्ये फॅट्स जमा होत नाहीत. 

छातीमध्ये जळजळ होणं

उशीरा जेवणं किंवा जेवल्यानंतर लगेच झोपणं या सवयींमुळे गॅसची समस्या वाढते. गॅसमुळ पोटात आणि छातीमध्ये जळजळ होते आणि अस्वस्थ वाटतं. यामुळे तुम्हाला शांत झोपही लागणार नाही. 

पोटाच्या समस्यांचा सामना करणं

ज्या व्यक्ती रात्री उशिरा जेवतात, त्यांना नेहमी पोटदुखी, अपचन यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. जेवलेलं अन्न व्यवस्थित न पचल्यामुळे या सर्व समस्या उद्भवतात. पोटदुखी, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही रात्रीचं जेवण वेळेत करणं गरजेचं असतं. 

थकवा येणं

रात्री उशिरा जेवल्यामुळे शरीरावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. कोणत्याही समस्यांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक आहे की, तुम्ही 8 ते 9 वाजेपर्यंत जेवण करावं. वेळेवर झोपणं आणि जेवणं यांमुळे सकाळई उठल्यावर तुम्ही फ्रेश असाल. तसेच कामही तितक्याच उत्साहात कराल. 

पोट राहिल हलकं

जर तुम्ही वेळेवर जेवण करत असाल तर जेवण पचण्यास पूर्ण वेळ मिळतो. जेवल्यानंतर फिरायला गेल्याने जेवणं पचण्यास मदत होते आणि पोट हलकं राहतं. तसेच अॅसिडीटी आणि अपचन यांसारख्या समस्या होत नाहीत. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHeart Diseaseहृदयरोग