शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
3
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
4
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
5
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
7
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
8
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
9
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
10
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
11
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
12
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
13
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
14
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
15
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
17
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
18
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
19
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
20
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?

प्रवासात तब्बेत जपण्याचे सोपे उपाय

By admin | Updated: April 27, 2017 17:32 IST

प्रवास करताना थोडी खाण्यापिण्याची आणि व्यायामाचीही काळजी घेतली तर आपल्यासोबत सगळ्यांचीच सहल आनंददायी होते.

 

-अमृता कदम

तुम्ही जेव्हा प्रवासाला निघता तेव्हा वेगळ्या ठिकाणी गेल्यावर हवामानात होणारा बदल, खाण्या-पिण्यातले बदल, धावपळ याचा परिणाम तुमच्या तब्येतीवर होऊ शकतो. सर्दी-पडशासारख्या काही किरकोळ तक्रारींबरोबरच कदाचित काही गंभीर त्रासही होऊ शकतात. त्यामुळे तुमचा आणि तुमच्या सोबत प्रवास करणाऱ्यांचाही रसभंग होतो. म्हणूनच प्रवास करताना थोडीशी काळजी घेतली तर तुमचा प्रवास आनंददायी आणि आरोग्यदायीही होईल. 

 

 

                                              

जर्नी हॅपी होण्यासाठी 

* प्रवास म्हणजे मौजमजा असली तरी तुमच्या रोजच्या व्यायामाला अजिबात फाटा देऊ नका. अगदी नेहमीसारखा नाही पण किमान अर्ध्या तासाचा व्यायाम चुकवू नका. तुमची राहण्याची व्यवस्था ज्या हॉटेलमध्ये आहे, तिथे जिम असेल तर तुमचं व्यायामाचं रूटिन मोडणार नाही. स्वीमिंग पूल सारखी सोय असेल तर मग पोहण्याचा आनंद आणि व्यायाम केल्याचं समाधान दोन्हीही पदरात पडेल. आणि अगदी काहीच नसेल तर सकाळी लवकर उठून मस्तपैकी जॉगिंगला तर तुम्ही नक्कीच जाऊ शकता. सकाळी अगदी स्वत:साठी काढलेला हा अर्धा तास तुम्हाला दिवसभराच्या प्रवासात एकदम ताजतवानं ठेवेल.

* प्रवासामध्ये भरपूर पाणी पित राहणंही अत्यंत गरजेचं आहे. फिरण्याच्या, वेगवेगळी ठिकाणं पाहण्याच्या गडबडीत पाणी पिलं जातंच असं नाही. पाण्याची बाटली वागवण्यापेक्षा अनेकजण लिमलेटच्या गोळ्या सोबत ठेवायला किंवा चटकन कोल्ड्रिंक विकत घेऊन प्यायला प्राधान्य देतात. या गोष्टींनी तात्पुरतं बरं वाटत असलं तरी पाण्याला कोणताही पर्याय नाही. विशेषत: तुम्ही जर उष्ण हवामानाच्या प्रदेशात गेला असाल तर योग्य प्रमाणात पाणी न प्यायल्यास डिहायड्रेशनही होऊ शकतं. त्यामुळे प्रवासात फिट राहण्यासाठी पाणी मस्ट आहे.

* प्रवासामध्ये गाडी हाताशी असल्यानं बरेचजण चालायचं टाळतात. पण तुम्हाला जितकं शक्य असेल तितकं त्या शहरामध्ये चालत फिरा. शहरातली ठिकाण, अगदी गल्ली-बोळ, तिथल्या बाजारपेठा पायी चालून पाहा. सहलीत अशी पायपीट बसून बसून जडावलेल्या शरीराला आणि प्रवासानं शिणलेल्या मनाला विरंगुळा देते.

 

* प्रवासामध्ये सतत काही ना काही खाणं (बऱ्याचदा ते अरबट-चरबट सदरात मोडणारंच असतं) सुरूच असतं. त्यामुळे खाणं झालंय ना असं म्हणत किंवा खूपदा भटकण्याच्या नादात जेवायंच राहून जातं. असं अजिबात करु नका. नाश्ता आणि दुपारचं जेवण शक्यतो टाळू नका. संध्याकाळी मग थोडंस हलकं काहीतरी खाल्लं तरी चालेल. प्रवासातलं खाण हे स्वच्छ आणि आरोग्यदायी असावं. प्रत्येकवेळी आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या मनासारखं खायला मिळेलच असं नाही. त्यामुळे घरून निघताना थोडा कोरडा खाऊ सोबत ठेवावा. तसंच शक्य तेव्हा फळंही खावीत.

* प्रवासातली खाण्यापिण्यातली जी काही कमतरता असेल ती दूर करण्यासाठी आणि स्वत:ला उत्साही, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फ्रेश ठेवण्यासाठी तुम्ही मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्याही घेऊ शकता. या गोळ्यांचे काही साइड-इफेक्टस नसतात. पण तरीही एकदा डॉक्टरांचा सल्लाही घेतलेला चांगला.

* भरपूर फिरताना योग्य ती काळजी घेतली नाही तर सगळ्यात जास्त नुकसान होतं ते तुमच्या त्वचेचं. शिवाय आजकाल वातावरणातले विविध घटक, खाद्यपदार्थ यांसरख्या गोष्टींची अ‍ॅलर्जी ही देखील खूप कॉमन गोष्ट झाली आहे. त्यामुळेच प्रवासात बाहेर जाताना सनस्क्रीन लावायला आणि गॉगल्स घालायला विसरु नका. त्याचबरोबर कोरड्या हवेच्या ठिकाणी फिरायला गेला असाल तर तुमच्या त्वचेला योग्य प्रकारे मॉश्चराईजही करा. नाहीतर अशा ठिकाणी त्वचा कोरडी पडते. प्रवासाहून परत येताना सोबत घेऊन यायचे असतात ते आनंदाचे क्षण आणि मजेशीर आठवणी. आजारपण किंवा दुखणी नाही. म्हणूनच प्रवास करताना काही पथ्यं आवर्जून पाळली तर खऱ्या अर्थानं आपला प्रवास ‘हॅपी जर्नी’ होतो.