शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

ब्रेकफास्टपासून ते डिनरपर्यंत वजन कमी करण्याच्या सोप्या टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 11:22 IST

वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय तुम्हाला सांगितले जात असतील. कुणी सांगतं डाएट करा, कुणी सांगतं एक्सरसाइज करा, कुणी सांगतं अमका आहार घ्या, टमका आहार घ्या.

वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय तुम्हाला सांगितले जात असतील. कुणी सांगतं डाएट करा, कुणी सांगतं एक्सरसाइज करा, कुणी सांगतं अमका आहार घ्या, टमका आहार घ्या. पण काही केल्या वजन कमी होत नाही. तुम्हाला खरंच वजन कमी करायचं असेल तर तुमच्या लाइफस्टाइलमध्ये सुधारणे करणे गरजेचे आहे. कामाच्या व्यस्ततेमुळे हे  करणं कठिण आहे. पण तुम्ही कधी आणि काय खावं याची काळजी घ्या.

(Image Credit : Reader's Digest)

जास्तीत लोकांच्या जेवणाची वेळ कधी फिक्स नसते. इथेच सगळं चुकतं. तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की, तुम्हाला कधी आणि काय खायचं आहे. चला जाणून घेऊ ब्रेकफास्टपासून ते डिनरपर्यंत खाण्यादरम्यानच्या काही टिप्स, ज्यांच्या मदतीने तुम्ही वजन कमीही करू शकाल आणि नियंत्रणातही ठेवू शकाल. 

ब्रेकफास्ट 

ब्रेकफास्ट हा दिवसातील पहिला आहार असतो. त्यामुळे नाश्त्याला उशीर करू नये. कारण सकाळचा नाश्ता हा आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असतो. तुमचा नाश्ता हा संतुलित असावा. इडली, अंडी, मोड आलेले कडधान्य, चपाती इत्यादींचं नाश्त्यात सेवन करू शकता. पण नाश्त्यात भाज्यांचं सूप, फळांचा रस फार फायदेशीर ठरतो. याने तुम्हाला लवकर भूक लागणार नाही आणि पोट भरलेलं राहतं. फळं आणि सलादचा नाश्त्यात आवर्जून समावेश करा. तसेच नाश्त्यानंतर तुम्ही ग्रीन टी चं सेवन करू शकता. याने वजन कमी होण्यास मदत मिळेल. नाश्त्यामध्ये तुम्ही दही, छास, दलिया, तूपाची पोळी हेही खाऊ शकता.

लंच 

(Image Credit : Onlymyhealth)

लंच दरम्यान तुमच्यापैकी जास्तीत जास्त लोक हे ऑफिसमध्ये असू शकतात. लंच दरम्यान तुम्ही चपाती, भाजी किंवा भात सेवन करू शकता. जर तुम्ही डायटिंग करत असाल तर दलिया सुद्धा एक चांगला पर्याय आहे. दुपारच्या जेवणात तुम्ही दही, कांदा आणि छास घेऊ शकता. साखर आरोग्यासाठी अजिबात चांगली नाहीये. त्यामुळे गोड पदार्थ कमी खावेत. लंच प्रमाणापेक्षा जास्त करू नका, जेवढं लागतं तेवढंच खावं. सोबतच जेवण झाल्यावर एका तासाने एक ग्लास कोमट पाणी प्यावे. याने शरीरात चरबी तयार होणार नाही.

डिनर 

(Image Credit : The Times in Plain English)

सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिनर आणि झोपण्याच्या वेळेत तीन ते चार तासांचा गॅप असावा. सांयकाळनंतर आपली हालचाल कमी होते. रात्री उशीरा जेवण केल्याने तुमचं पचनक्रिया बिघडू शकते आणि शरीरात अनावश्यक चरबी जमा होते. त्यामुळे बरं होईल की, तुम्ही झोपण्याच्या तीन किंवा किमान दोन तास आधी जेवण करावं. रात्रीचं जेवण हे दुपारपेक्षा हलकं आणि कमी असावं. याने पचन होण्यास सोपं होईल.

महत्त्वाच्या गोष्टी

(Image Credit : Medical News Today)

काही गोष्टी इथे लक्षात ठेवणे आरोग्यासाठी फार महत्त्वाचे आहे. सकाळी उठून कोमट पाण्याचे सेवन करावे. लिंबू आणि मध मिश्रित करून पाणी प्यायल्यास शरीरातून टॉक्सिक तत्त्व बाहेर काढण्यास मदत मिळते. दिवसाच्या जेवणानंतर एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील चरबी कमी होते, ज्यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत मिळते. 

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स