शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात नारळ पाणी पिणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या एक्सपर्ट काय सांगतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 10:16 IST

Coconut Water In Monsoon: अनेकांना असं वाटतं की, या दिवसात नारळाचं पाणी प्यायल्याने पोट खराब होऊ शकतं. पण यात किती तथ्य आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत.

Coconut Water In Monsoon: उन्हाळ्यात जास्तीत जास्त लोक नारळाचं पाणी पितात. कारण त्याने शरीराला थंड वाटतं आणि पाण्याची कमतरता भरून निघते. त्यासोबतच त्यातील पोषक तत्वही शरीराला मिळतात. उन्हाळा संपला की, अनेकांना प्रश्न पडतो की पावसाळ्यात नारळाचं पाणी प्यायचं की नाही? अनेकांना असं वाटतं की, या दिवसात नारळाचं पाणी प्यायल्याने पोट खराब होऊ शकतं. पण यात किती तथ्य आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत.

एक्सपर्ट सांगतात की, पावसाच्या दिवसातही नारळाचं पाणी पिऊ शकता. यात भरपूर मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स असतात. जे शरीराला खूप फायदे देतात. पावसाळ्यात तुम्ही कमी प्रमाणात पिऊ शकता. 

पावसाळ्यात इम्यूनिटी आणि डायजेशन कमजोर होत असतं. ज्यामुळे वेगवेगळे आजार आणि पोटासंबंधी समस्या होत असतात. अशात नारळ पाण्याने पचनासंबंधी समस्या दूर होतात. पावसाळ्यात बॅक्टेरिया पोटात जातात. ज्यामुळे पोट खराब होतं. त्यामुळे नारळाचं पाणी तुमची मदत करू शकतं. ताजं नारळाचं पाणी पिऊन तुम्ही पोट चांगलं ठेवू शकता. 

पावसाळ्यात नारळाचं पाणी जास्त प्याल तर तुमचं आरोग्य बिघडू शकतं. कारण नारळाच्या पाण्यात भरपूर सोडिअम असतं आणि त्यामुळे पावसाळ्यात जर तुम्ही नारळ पाण्याचं जास्त सेवन कराल तर तुम्हाला ब्लोटिंग आणि हायपरटेंशनची समस्या होऊ शकते. अशात नारळ पाणी कमी प्रमाणात प्यावं. काही लोकांना नारळ पाण्याची एलर्जी असते. जर त्यांनी पावसाळ्यात नारळ प्यायलं तर त्यांना सूज, पित्त, खाज अशा समस्याही होऊ शकतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य