शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हीही रात्री उशिरा जेवण करता का ? रात्रीचा 'हा' आहार शरीराचे नुकसान करेल वेळीच काळजी घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2022 11:06 IST

संध्याकाळी ७ वाजताच जेवण करावे असा सल्ला दिला जातो. जेवणाच्याही वेळा असतात. कधी आणि काय खावे याचे नियम आहेत त्यांचे जर पालन केले तर पोटाच्या विकारांपासून दूर राहाल.

अनेकांना सवय असते रात्री भरपेट जेवून झोपण्याची. दिवसभर थकून आल्यावर रात्री जास्त आहार घेतला जातो. खूप कमी लोक असतील जे रात्री जेवल्यानंतर काही वेळ चालायला जात असतील. जेवल्या जेवल्या झोपण्याच्या सवयीमुळे अपचन होते. सतत पोटात जळजळ होते त्यामुळे नीट झोपही लागत नाही. यामुळेच कोणत्या वेळी काय खाल्ले पाहिजे हे आयुर्वेदात सांगितले आहे. चुकीच्या वेळी चुकीचा आहार घेतल्याने अपचनाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. आता बघुया रात्री कोणते पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

१. प्रोसेस्ड किंवा स्नॅक्स 

रात्री अबरचबर खाण्याची अनेकांना सवय असते. स्नॅक्स सारख्या गोष्टी जर रात्री खात असाल तर आधी ही सवय थांबवा. कारण अशा पदार्थांमध्ये काही त्तव असतात जे अपचनाला कारणीभूत ठरतात. भविष्यात याचे गंभीर परिणामही होऊ शकतात.

२. तळलेले पदार्थ 

तळलेले पदार्थ दिवसा खाल्ले तर ते पचतात मात्र रात्री या पदार्थांना पचनासाठी वेळ लागतो. यामुळे पोटात टॉक्सिंस होतात म्हणजे गॅस, उलटी यासारख्या समस्या उद्भवतात. तर असे पदार्थ शक्यतो रात्री खाणे टाळावे.

३. फळं

फळं ही शरिरासाठी उत्तम आहेतच मात्र फळं खाण्याचीही एक वेळ असते. फळं ही थंड असतात यामुळे ती रात्री खाल्ली तर सर्दी, ताप अशा समस्या येऊ शकतात. अॅलर्जी देखील होऊ शकते. फळं खाल्ल्यानंतर लगेच जेवण करु नये आणि जेवणानंतर लगेच फळांचे सेवन करु नये यामध्ये एक ते दिड तासांचे अंतर असावे असे आयुर्वेदात सांगितले आहे.

४. रेड मीट

जे मांसाहार करतात त्यांना हिवाळ्यात रेड मीट खायला आवडते. शरिरात ऊर्जा आणि गरमी यावी म्हणून रेड मीट खाल्ले जाते. मात्र याचे साईड इफेक्ट होतात. रेड मीट पचायला जास्त वेळ लागतो. झोपल्यानंतर याचे परिणाम दिसू लागतात.

५. दही

आयुर्वेदात रात्री दही खाणे वर्ज्य आहे. रात्री दही खाल्ल्याने शरिराच्या तापमानात फरक पडतो. असंतुलनामुळे इतर विकार होण्याची शक्यता असते. म्हणून रात्री शक्यतो दही न खाल्लेले बरे.

जेवल्यानंतर किती वेळाने झोपावे

पोटाचे विकार होऊ नये म्हणून रात्रीच्या जेवणाच्या वेळांवर लक्ष द्या. अनेकदा आपल्याला सांगितले जाते की संध्याकाळी ७ वाजताच जेवावे. कारण जेवल्यानंतर किमान ३ तासांनी झोपण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे पचनक्रिया सुरळित होते. जे याचे पालन करतात ते पोटाच्या विकारांपासून दूर राहतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न