शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

दान - पैशाचे नव्हे, तुमच्या अवयवांचे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 05:26 IST

अवयवदानाचा प्रचार, प्रसार आणि प्रबोधन करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांना नेहमीच एक प्रश्न विचारला जातो- अवयवदान कोण, कधी व कसे करू शकतो? - कोणीही निरोगी व्यक्ती तीन टप्प्यांत अवयवदान करू शकते.  

- आशा कुलकर्णी, antidowry498a@gmail.comअसे म्हणतात, मरावे परी कीर्तिरूपे उरावे! - हे फारच थोड्यांना साध्य होते. पण, ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ हे मात्र अति सामान्यांना, गरीब-श्रीमंत सर्वांनाच शक्य होण्यासारखे आहे. अवयवदानाचा प्रचार, प्रसार आणि प्रबोधन करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांना नेहमीच एक प्रश्न विचारला जातो- अवयवदान कोण, कधी व कसे करू शकतो? - कोणीही निरोगी व्यक्ती तीन टप्प्यांत अवयवदान करू शकते.  (१) जिवंतपणी - बोन मॅरो (सत्त्व चरबी), एक मूत्रपिंड, यकृत - फुप्फुस - स्वादुपिंड या तीन अवयवांचा काही भाग दान करता येतो.  हे फक्त रक्ताच्या व जवळच्या नातेवाइकांमध्येच होऊ शकते. सुदृढ व निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकते. (२) अपघातात मेंदू मृत घोषित झाल्यास - अशा प्रसंगी हृदय, मूत्रपिंड, यकृत, फुप्फुस, स्वादुपिंड, छोटे व मोठे आतडे, स्वरयंत्र, कंठनाळ, गर्भाशय, कानाचा मध्यभाग, त्वचा, हाडे, रक्त धमन्या, रक्त वाहिन्या, मज्जातंतूची शीर, बीजकोष किंवा अंडाशय, हातापायाची बोटे असे अनेक अवयव दान करता येतात. (३) नैसर्गिक मृत्यू आल्यास -  डोळे, त्वचा, हृदयाच्या झडपा, रक्त धमन्या, रक्त वाहिन्या, मृदू अस्थींचे वेस्टन इत्यादी अवयव दान करता येतात. नैसर्गिक मृत्यू जर एखाद्या अद्ययावत आधुनिक रुग्णालयात झाला तरच हे अवयव दान शक्य होते. मृत्यू घरीच झाला तर डोळे आणि त्वचा हे दोन अवयव सहजरीत्या दान करता येतात. नेत्रदानाची प्रक्रिया मृत्यूनंतर ३ ते ४ तासांच्या आत करावी लागते. त्वचादानाची प्रक्रिया ८ ते १० तासांच्या आत करावी लागते. यानंतर मृत शरीर विद्रूप होत नाही. तसेच नेत्र व त्वचा दानानंतर देहदानही करता येते. देहदानाचा वैद्यकीय शिक्षणासाठी आणि संशोधनासाठी बहुमूल्य उपयोग होतो. अवयवदानातील गैरप्रकार टाळता यावे किंवा मानवी अवयवांचा व्यापार होऊ नये यासाठी १९९४ मध्ये आपल्याकडे ‘मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा’ पारित करण्यात आला. मस्तिष्क स्तंभ मृत्यू झाल्याचे निश्चित करून तसे प्रमाणित करणे आणि अशा मेंदूमृत रुग्णाचे कोणते अवयव प्रत्यारोपणासाठी योग्य आहेत ते ठरवणे, हे या कायद्याचे मुख्य उद्देश.  या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी झोनल ऑर्गन ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटरची स्थापना झाली.या सेंटरच्या  चार जबाबदाऱ्या असतात. (१) अवयवदानाचा प्रचार- प्रसार करणे. (२) अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णाची प्रतीक्षा यादी तयार करणे आणि यादीचे संरक्षण करणे. (३) दानात प्राप्त झालेल्या अवयवांचे योग्य प्रकारे वितरण करणे. (४) अवयवदान व प्रत्यारोपण प्रक्रियेत गैरव्यवहार होऊ नये याची खबरदारी घेणे.या सेंटरसाठी अवयवदान समन्वयक  विविध रुग्णालयांत कार्य करतात. एखादा रुग्ण मेंदू मृत घोषित झाल्यास त्या रुग्णाचे अवयव दान करण्यासाठी नातेवाइकांना  प्रवृत्त करण्याचे अत्यंत कठीण काम  समन्वयक पार पाडत असतो तसेच कायदेशीर कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी मदत करतो. शरीरातील चेतना व श्वासोच्छ्वास या दोन्हींचे केंद्र मेंदूत ज्या भागात असते त्या भागाला कायमस्वरूपी इजा झाल्यास व्यक्ती ‘ब्रेन डेड’ होते. अशा रुग्णाचे हृदय कृत्रिमरीत्या काही काळ क्रियाशील ठेवता येते. या काळात मेंदू सोडून सर्व अवयव सुरक्षित व कार्यरत असतात; कारण सर्व अवयवांना त्या काळात कृत्रिमरीत्या प्राणवायू पुरवला जातो. या काळात अवयव दानाचा निर्णय घेता येतो. मस्तिष्क स्तंभ मृत्यू झाल्याचे निदान कायद्यानुसार चार डॉक्टरांची  टीम करते.  न्युरोलॉजिस्ट, फिजिशियन, भूलतज्ज्ञ आणि संबंधित रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर या टीममध्ये असतात. यासाठी करण्यात येणाऱ्या चाचण्या महाग असल्या तरी अवयव दान करण्यास नातेवाइकांची अनुमती असल्यास त्यात सवलत मिळू शकते.आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात जवान स्वतःच्या प्राणांचे बलिदान देऊन हुतात्मा होतात. आज आरोग्य विज्ञानातील संशोधनामुळे एखादा सामान्य नागरिकही जीवनदानासारखे सर्वोच्च दान देऊन मृत्यूनंतरही अवयव रूपात अमर होतो.. ही अवयव दानाची चळवळ जनसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी कार्यरत सर्व कार्यकर्ते प्रशंसेस पात्र आहेत.

टॅग्स :Organ donationअवयव दान