शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

जेवल्यानंतर तुम्ही या 6 गोष्टी करता का? मग त्या आधी थांबवा!

By admin | Updated: May 5, 2017 16:50 IST

जेवणानंतर आपण काय करतो हे जरा तपासून पाहा. कारण जेवणानंतरच्या सहा अशा सवयी ज्या आनंद देतात पण आरोग्याच्या दृष्टीनं त्या अतिशय घातक असतात.

 

आपण रोज अशा अनेक गोष्टी करत असतो ज्या आपल्या रोजच्या सवयीचा भाग असतात. आणि सवय म्हटली की ती जशी चांगली असते तशी वाईटही. अनेक सवयींमधून आपल्याला एक प्रकारचा आनंद मिळत असतो पण आनंद मिळतो म्हणून या सवयी चांगल्याच असतात असं नाही. उलट काही सवयी नुसत्या वाईट असतात असं नाही तर धोकादायकच असतात. जेवणानंतर आपण काय करतो हे जरा तपासून पाहा. कारण जेवणानंतरच्या सहा अशा सवयी ज्या आनंद देतात पण आरोग्याच्या दृष्टीनं त्या अतिशय घातक असतात. तेव्हा आरोग्यदायी जगायचं असेल तर जेवणानंतरच्या या पाच गोष्टी तातडीनं थांबवायला हव्यात.

1. जेवणानंतर चहा कॉफीचे कप

अनेकांना सकाळ दुपारच्या जेवणानंतर लगेच चहा कॉफी प्यायची सवय असते. यामुळे अनेकांना विशेषत; दुपारच्या वेळेस ऊर्जा मिळाल्यासारखं वाटतं. पण ही सवय अत्यंत घातक आहे. मुळातच चहा कॉफीमध्ये टॉक्सिन्स असतात. आणि जेवल्यानंतर लगेच चहा कॉफी प्यायलानं हे टॉक्सिन्स अन्नातील घटकांना शरीरापर्यंत पोहोचूच देत नाही. विशेषत: लोह आणि प्रथिनं या अन्नघटकांना शरीरापर्यंत पोहोचण्यास चहामुळे अडथळा निर्माण होतो. ज्या व्यक्तींच्या शरीरात लोहाची कमतरता असते त्यांनी तर ही सवय लगेच मोडावी. जेवणानंतर साधारणत: तासाभरानं चहा प्यायला तर चालतो.

 

   

2. भराभर चालणं.

जेवणानंतर चालायला जाण्याची सवय अनेकांना असते. खरंतर ही सवय चांगलीही आहे. पण जेवणानंतर लगेच चालण्याचे मात्र अनेक तोटेच आहेत. जेवल्यानंतर जर खास पचनासाठी आपण लगेच चालायला सुरूवात केली तर अन्न पचायलाच त्रास होतो. कारण पोटात एकवटलेले सर्व अन्नरस जेवणानंतर लगेचच्या चालण्याने वाहून जातात. आणि त्यामुळे अन्न पचायलाही अवघड जातं. अन्नरस वाहून गेल्यानं पोटात आम्ल म्हणजे अ‍ॅसिड तयार होतात ज्याचा परिणाम म्हणून अपचन होतं. आणि म्हणूनच जेवल्यानंतर साधारणत: अधर््या तासानं फिरायला जावं. आणि हे फिरणं दहा मीनिटांपेक्षा अधिक असू नये.

 

3. फळं खाणं.

फळं खाण्यासंबधी अनेक समज आणि गैरसमज आहे. अनेकजण म्हणतात की फळं नीट पचत नाही म्हणून ती रिकाम्या पोटी खावू नये म्हणून. तर कोणी म्हणतं रात्री फळं खाऊ खाऊ नये म्हणून. पण सत्य हे आहे की फळामध्ये जी साखर असते ती सहज पचण्यासारखी असते त्यामुळे दिवसातल्या कोणत्याही वेळी फळं खावं. अपवाद फक्त जेवल्यानंतर लगेचचा. जेवल्यानंतर लगेच फळ खाण्याचा फायदा होण्यापेक्षा तोटाच खूप होतो. कारण जेवल्यानंतर फळ खाल्लं तर त्याचं पचन होण्यासाठी पुढे सरकू शकत नाही. कारण पोटात जेवल्यामुळे अन्न असतं. त्यामुळे फळ फोटात तसंच पडून राहतं. आणि पोटात हे पचनाविना पडून राहिलेलं फळ धोकादायक असतं.जेवल्यानंतर साधारणत: एखाद्या तासानं फळ खाणं फायदेशीर ठरतं.

 

4. छोटीशी डुलकी

जेवल्यानंतर डुलकी घ्यायची म्हणून लगेच झोपणं ही धोकादायक सवय आहे. अन्न पचनासाठी गुरूत्वाकर्षण ही संकल्पना खूप काम करते. जेवल्यानंतर झोपण्यासाठी म्हणून लगेच आडवे पडलो तर पोटातील अन्नरस पोटातून बाहेर पडतात , ते पोटात थांबत नाही. त्यामुळे आतड्यात जळजळ अ‍ॅसिडिटी यासारखे त्रास होतात. त्यामुळे जेवल्यानंतर झोपलं तर आराम मिळण्याऐवजी उलटा अ‍ॅसिडिटीचा त्रासच आपण ओढावून घेतो.

 

 

 

5. आंघोळ करणं.

जेवल्यानंतर लगेचच्या आंघोळीमुळे थेट पचनसंस्थेच्या कामात अडथळा निर्माण होतो. आंघोळ करताना शरीराचं तापमान वाढतं. ते कमी करण्यासाठी मग रक्तप्रवाह आणि ऊर्जा त्वचेकडे सरकते. जेवल्यानंतर रक्तप्रवाहाची आणि ऊर्जेची गरज पोटात असते कार्ण त्यातूनच अन्नाचं पचन होणार असतं. पण आंघोळीमुळे ही सर्व प्रक्रिया उलट दिशेने होवून अन्न पचायला ऊर्जाच शिल्लक राहात नाही. परिणामी पचनाच्या संबंधीचे आजार सतत ये-जा करत राहतात.

 

6. सिगारेट ओढणं.

जेवल्यानंतर लगेच सिगारेट ओढणं ही सवय अनेकांना (विशेषत: पुरूषांना) असते. या सवयीमुळे कॅन्सरची , श्वसनासंबंधीच्या विकारांची शक्यता बळावते. जेवल्यानंतर लगेच सिगारेट ओढल्यानं अल्सर होतो.