शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

आॅफिसमध्ये ‘असं’ वागता? मग लक्षात ठेवा, चूक तुमचीच!

By admin | Updated: June 9, 2017 19:19 IST

आपल्याही नकळत आॅफिसमध्ये आपण अशा काही चूका करतो, ज्या आपल्यालाच छळतात.

-नितांत महाजनआपण तसे चांगलेच असतो. आपण सगळ्यांशी चांगलेच वागतो, लोकच आपल्याला त्रास देतात असं आपल्याला वाटतं. तसं होतंही. मात्र आपल्याही नकळत आपण आॅफिसमध्ये अशा काही चूका करत असतो की त्या आपल्याला छळतात. आपले पाय ओढतात. आपल्या प्रगतीच्या मार्गात अडथळा ठरतात. आणि आपल्याला ते कळतही नाही, जाणवतही नाही. लक्षात येत नाही. आणि आलंच तर आपण ते मान्यही करत नाही. मात्र तपासून पहा, आपण या चूका करतो का? करत असू तर मान्य करू की चूक आपलीच, आपण जरा आपलं तंत्र सुधारलं पाहिजे.१) आपण गप्प-घुमे?आपल्याला वाटतं आपण भलं, आपलं काम भलं. आपण बोलतो कमीच. गप्प राहतो. पण इतरांना वाटतं आपण घुमे आहोत, किंवा स्वत:ला शहाणं समजतो. जास्त फटकून राहतो. इतरांना कमी लेखतो. कामास काम बोलतो कारण आपण त्यांना मोजत नाही. मग लोक आपल्याला अकारण लेबल लावतात आणि सायडिंगला लावतात. टीममध्ये घेत नाहीत.२) काहीही हो, तुम्ही अतीच रिअ‍ॅक्ट करता?गोष्टी सोपी असते, साधं तुमचं टेबल पुसलेलं नसतं, किंवा तुमचं काम कुणी ऐकत नाही, किंवा फोन उचलत नाही असं काहीही बारीक सारीक मात्र तुम्ही असे काही चिडता, रिअ‍ॅक्ट करता की विचारू नका. आॅफिस डोक्यावर घेता,बडबडता, तोंड सोडता. आणि त्याचा परिणाम असा होतो की चिडके, अती शहाणे अशी लेबलं लागतात आणि लोक तुम्हाला टाळू लागतात.३) नाही, मी बिझी आहे?तुम्हाला कुणी जेवायला बोलावतं, पार्टीला बोलावतं, घरगुती कार्यक्रमाला बोलावतं किंवा सहकारी म्हणतात चल रे जरा चहा प्यायला, तुमचं एकच पालूपद, नाही, मी बिझी आहे. तुम्ही कुणाकडच्या कार्यक्रमाला जात नाही. कुणासोबत चहा पीत नाही. कुणाचं सुखदु:ख शेअर करत नाही. कदाचित तुम्ही खरंच कामात असाल पण त्यानं लोकांना काय वाटतं की, आपल्याला हा कमी लेखतो. गैरसमज होतात. आणि तुमचा स्ट्रेस वाढतो कारण लोक त्यानंतर तुम्हाला त्यांच्यात घेतच नाही.४) गॉसिप करता?तुम्हाला गॉसिप करायची फार सवय आहे. याचं त्याचं करता, सहज सांगता, बोलून जाता, लोकांच्या भानगडीत नाक खुपसता? मग तुमचं आॅफिसात नाव बदनाम झालंच समजा.५) सतत कटकट करता?काही लोक आॅफिसात आले की कटकट करायला लागतात. सतत भूणभूण. सतत चिडचिड. कशावरुनही कटकट. पगारवाढ, बॉस ते हवामान ते स्वच्छता ते इतर लोक ते काम कारणच लागत नाही. सतत कटकट, सतत निगेटिव्ह मोड. अशा सहकाऱ्यांना लोक कंटाळतात. ते आॅफिसचं वातावरण गढूळ करतात. त्यामुळे त्यांच्याकडे चांगली कामंही येत नाहीत.६) मतं मांडताना बेभान होता?आॅफिस म्हटलं की चर्चा होणारच. राजकीय, सामाजिक चर्चा होतात. गप्पा रंगतात. सगळ्यांना सगळ्यांची मतं पटत नाहीतच. मात्र ते वाद तेवढ्यापुरते न ठेवता तुम्ही हमरीतुमरीवर येता? तावातावानं मतं मांडता? भांडता? आवाज चढवता? आणि त्यात तुम्हाला काही गैर वाटत नाही. पण इतरांना मात्र वाटतं की तुम्ही आक्रमक आहात, लोकांना डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करता, ऐकून घेत नाही. दुसऱ्याच्या मतांची कदर करत नाहीत. तुम्ही अकारण मग भांडकुदळ ठरवले जाता.