शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

आॅफिसमध्ये ‘असं’ वागता? मग लक्षात ठेवा, चूक तुमचीच!

By admin | Updated: June 9, 2017 19:19 IST

आपल्याही नकळत आॅफिसमध्ये आपण अशा काही चूका करतो, ज्या आपल्यालाच छळतात.

-नितांत महाजनआपण तसे चांगलेच असतो. आपण सगळ्यांशी चांगलेच वागतो, लोकच आपल्याला त्रास देतात असं आपल्याला वाटतं. तसं होतंही. मात्र आपल्याही नकळत आपण आॅफिसमध्ये अशा काही चूका करत असतो की त्या आपल्याला छळतात. आपले पाय ओढतात. आपल्या प्रगतीच्या मार्गात अडथळा ठरतात. आणि आपल्याला ते कळतही नाही, जाणवतही नाही. लक्षात येत नाही. आणि आलंच तर आपण ते मान्यही करत नाही. मात्र तपासून पहा, आपण या चूका करतो का? करत असू तर मान्य करू की चूक आपलीच, आपण जरा आपलं तंत्र सुधारलं पाहिजे.१) आपण गप्प-घुमे?आपल्याला वाटतं आपण भलं, आपलं काम भलं. आपण बोलतो कमीच. गप्प राहतो. पण इतरांना वाटतं आपण घुमे आहोत, किंवा स्वत:ला शहाणं समजतो. जास्त फटकून राहतो. इतरांना कमी लेखतो. कामास काम बोलतो कारण आपण त्यांना मोजत नाही. मग लोक आपल्याला अकारण लेबल लावतात आणि सायडिंगला लावतात. टीममध्ये घेत नाहीत.२) काहीही हो, तुम्ही अतीच रिअ‍ॅक्ट करता?गोष्टी सोपी असते, साधं तुमचं टेबल पुसलेलं नसतं, किंवा तुमचं काम कुणी ऐकत नाही, किंवा फोन उचलत नाही असं काहीही बारीक सारीक मात्र तुम्ही असे काही चिडता, रिअ‍ॅक्ट करता की विचारू नका. आॅफिस डोक्यावर घेता,बडबडता, तोंड सोडता. आणि त्याचा परिणाम असा होतो की चिडके, अती शहाणे अशी लेबलं लागतात आणि लोक तुम्हाला टाळू लागतात.३) नाही, मी बिझी आहे?तुम्हाला कुणी जेवायला बोलावतं, पार्टीला बोलावतं, घरगुती कार्यक्रमाला बोलावतं किंवा सहकारी म्हणतात चल रे जरा चहा प्यायला, तुमचं एकच पालूपद, नाही, मी बिझी आहे. तुम्ही कुणाकडच्या कार्यक्रमाला जात नाही. कुणासोबत चहा पीत नाही. कुणाचं सुखदु:ख शेअर करत नाही. कदाचित तुम्ही खरंच कामात असाल पण त्यानं लोकांना काय वाटतं की, आपल्याला हा कमी लेखतो. गैरसमज होतात. आणि तुमचा स्ट्रेस वाढतो कारण लोक त्यानंतर तुम्हाला त्यांच्यात घेतच नाही.४) गॉसिप करता?तुम्हाला गॉसिप करायची फार सवय आहे. याचं त्याचं करता, सहज सांगता, बोलून जाता, लोकांच्या भानगडीत नाक खुपसता? मग तुमचं आॅफिसात नाव बदनाम झालंच समजा.५) सतत कटकट करता?काही लोक आॅफिसात आले की कटकट करायला लागतात. सतत भूणभूण. सतत चिडचिड. कशावरुनही कटकट. पगारवाढ, बॉस ते हवामान ते स्वच्छता ते इतर लोक ते काम कारणच लागत नाही. सतत कटकट, सतत निगेटिव्ह मोड. अशा सहकाऱ्यांना लोक कंटाळतात. ते आॅफिसचं वातावरण गढूळ करतात. त्यामुळे त्यांच्याकडे चांगली कामंही येत नाहीत.६) मतं मांडताना बेभान होता?आॅफिस म्हटलं की चर्चा होणारच. राजकीय, सामाजिक चर्चा होतात. गप्पा रंगतात. सगळ्यांना सगळ्यांची मतं पटत नाहीतच. मात्र ते वाद तेवढ्यापुरते न ठेवता तुम्ही हमरीतुमरीवर येता? तावातावानं मतं मांडता? भांडता? आवाज चढवता? आणि त्यात तुम्हाला काही गैर वाटत नाही. पण इतरांना मात्र वाटतं की तुम्ही आक्रमक आहात, लोकांना डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करता, ऐकून घेत नाही. दुसऱ्याच्या मतांची कदर करत नाहीत. तुम्ही अकारण मग भांडकुदळ ठरवले जाता.