शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

बाहेरून आल्यावर कोमट पाण्याने नाक धुतले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 10:42 IST

शहरात होणारी बांधकामे, वाढलेली वाहने, लहान मोठे कारखान्यातून सोडण्यात येणारा धूर आदींमुळे वायू प्रदूषणात वाढ झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क । मुंबईराज्यात जवळपास सर्वच शहरांत वायू प्रदूषण वाढले आहे. नागरिकांनी आरोग्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागणार असून बाहेरून आल्यानंतर प्रत्येकाने कोमट पाण्याने नाक धुणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. रस्ते वाहतूक, वाहने, कारखान्यातून सोडण्यात येणारे धूर, कोळसा, लाकूड, वाळलेले गवत यांचे जाळणे, बांधकामे व धुलिकणात वाढ आदींमुळे वायू प्रदूषणात वाढ झाली आहे. वायू प्रदूषणाचा परिणाम आरोग्यावर झाला असून ॲलर्जी सारख्या प्रकारात वाढ होऊन सर्दी व खोकल्याच्या रुग्णांत वाढ झाली आहे. 

शहरात वायू प्रदूषण वाढलेशहरात होणारी बांधकामे, वाढलेली वाहने, लहान मोठे कारखान्यातून सोडण्यात येणारा धूर आदींमुळे वायू प्रदूषणात वाढ झाली. गेल्या महिन्यात प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठल्यावर, न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने बांधकामावर निर्बंध घालून त्यांना नोटिसा दिल्या आहेत. तसेच धुलिकणात वाढ झाल्याने, पाणी शिंपडण्याचे काम करण्यात आले.

भरपूर पाणी पिणे आवश्यक वायू प्रदूषणामुळे ॲलर्जी, सर्दी-खोकला, दमा आदीच्या रुग्णांत वाढ होते. त्यापासून बचाव होण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. 

काय काळजी घ्याल?  मास्क वापरा : वायू प्रदूषणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडल्यावर मास्क वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.  पाण्याने नाक स्वच्छ करा : बाहेरून आल्यावर कोमट पाण्याने नाक स्वच्छ केल्यास, संसर्ग व  सर्दी पासून बचाव होतो. नाकात गेलेले धूलीकण धुवून निघतात.

मुंबई आणि परिसरातील प्रदूषणात वाढ झाली आहे. बांधकामे वाढली असून विविध विकास कामे सुरू झाल्याने धुलिकणात प्रचंड वाढ झाली. गेल्या काही दिवसांपासून थंडीमध्ये देखील वाढ झाली आहे. थंडीमुळे अनेकदा नाक जाम होते. वायू प्रदूषणात वाढ झाल्याने, नागरिकांनी कोमट पाण्याने नाक स्वच्छ करणे, मास्क वापरणे, गरज असेल तरच घराबाहेर पडणे आवश्यक आहे. अस्थमा असणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.     - डॉ. श्रीनिवास चव्हाण, कान-नाक-घसा विभाग प्रमुख, जे.जे. रुग्णालय

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषण