शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

Dengue Outbreak: देशातील 9 राज्यांत डेंग्यूचा उद्रेक; आरोग्य मंत्रालयानं पाठवली खास पथकं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 11:55 IST

Dengue outbreak: डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) 9 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तज्ज्ञांची केंद्रीय पथके  पाठवली आहेत.

नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसचा (Corona Virus)प्रादुर्भाव कमी होताना दिसून येत आहे. मात्र, कोरोनानंतर नवीन संकट येण्याची शक्यता आहे. कारण, देशातील काही राज्यांमध्ये डेंग्यूचा (Dengue) उद्रेक सातत्याने वाढत आहे. दरम्यान, डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) 9 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तज्ज्ञांची केंद्रीय पथके  पाठवली आहेत. डेंग्यूच्या प्रादुर्भावाशी निगडित सार्वजनिक आरोग्य उपायांसह तांत्रिक मार्गदर्शन देण्यासाठी ही पथके काम करतील. 

हरियाणा, पंजाब, केरळ, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाकडून तज्ज्ञांची केंद्रीय पथके पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पथकांमध्ये राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि मच्छर-जनित रोग नियंत्रण कार्यक्रमाचे अधिकारी यांचा समावेश आहे. 9 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सेवा महासंचालक आणि प्रधान सचिवांना (आरोग्य) पत्र पाठवण्यात आले आहे.

डेंग्यूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य उपायांसह तांत्रिक मार्गदर्शन देऊन राज्य सरकारांना मदत करण्यासाठी केंद्रीय पथके तैनात करण्याचा निर्णय सक्षम प्राधिकरणाने घेतला आहे, असे पत्रात म्हटले आहे. आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी सोमवारी केंद्रीय आरोग्य सचिवांना डेंग्यूचे जास्त रुग्ण असलेल्या राज्यांची ओळख पटवून तज्ज्ञांचे पथक पाठवण्याचे निर्देश दिले होते. आरोग्यमंत्र्यांनी या आजारावर नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी दिल्लीतील डेंग्यू परिस्थितीचा आढावा घेतला. या वर्षी आतापर्यंत दिल्लीत डेंग्यूचे 1,530 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ऑक्टोबरमध्ये सुमारे 1,200 प्रकरणे नोंदवली गेली. जी गेल्या चार वर्षांतील या महिन्यातील सर्वाधिक संख्या आहे.

दिल्लीत डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढमागील काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्याचबरोबर मृतांचा आकडाही वाढल्याने चिंता आणखीनच वाढली आहे. गेल्या आठवड्यात डेंग्यूमुळे 5 मृत्यूची नोंद झाली आहे, त्यामुळे आता दिल्लीतील मृतांची संख्या एक वरून 6 झाली आहे. गेल्या आठवडाभरात डेंग्यूच्या नव्या रुग्णांची संख्याही 531 झाली. त्यानंतर आता एकूण रुग्णसंख्या 1537 वर गेली आहे. डेंग्यू आणि मलेरियासह चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्येही वाढ होताना दिसत आहे.

डेंग्यू म्हणजे काय?डेंग्यू हा डासांच्या माध्यमातून पसरणारा विषाणूजन्य रोग (Viral Disease) असून, उष्णकटिबंधीय आणि अर्ध-उष्णकटिबंधीय वातावरण (Tropical & Sub-tropical Environment) असलेल्या जगभरातल्या सर्व ठिकाणी तो आढळतो. खासकरून शहरी आणि निमशहरी भागांत हा रोग मोठ्या प्रमाणावर पसरतो. हा रोग पसरवण्यासाठी कारणीभूत असलेल्या विषाणूला डेंग्यू व्हायरस (DENV) असं म्हणतात. डेंग्यू व्हायरसच्या संसर्गामुळे बहुतांशी वेळा सौम्य आजारपण येते. याची लक्षणे फ्लूसारखी असतात. काही वेळा मात्र यातून गुंतागुंत तयार होऊन मृत्यूही होऊ शकतो. त्याला सीव्हिअर डेंग्यू असे म्हणतात. 

टॅग्स :dengueडेंग्यूHealthआरोग्य