शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
3
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
4
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
5
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
6
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
7
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
8
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
9
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
10
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
11
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
12
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
13
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
14
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
15
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
16
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
17
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
18
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
19
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
20
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न

उष्णतेचा कहर! वाढत्या तापमानासमोर कोरोनाचा वेग मंदावला, पण 'या' आजारांचा धोका वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 15:10 IST

कोरोना असो वा इन्फ्लूएंझा किंवा H1N1, सर्व प्रकारचे व्हायरस या उष्णतेचा सामना करू शकत नाहीत.

वाढत्या उष्णतेसमोर आता कोरोना व्हायरसचा वेग मंदावला आहे. मात्र आता डायरिया आणि डिहाइड्रेशन धोका वाढला आहे. व्हायरस कमकुवत झाल्यामुळे शहरातील सर्व प्रकारच्या तापाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने घट झाली आहे. कोरोना असो वा इन्फ्लूएंझा किंवा H1N1, सर्व प्रकारचे व्हायरस या उष्णतेचा सामना करू शकत नाहीत. त्याचा सकारात्मक परिणाम असा झाला की दिल्लीतील लोक अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या तापाने त्रस्त होते, आता त्यांची यातून सुटका झाली आहे. व्हायरसचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी काही आजाराचा धोका वाढला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

उन्हाळ्यात डायरिया आणि डिहायड्रेशनची समस्या वाढते. विशेषत: जे रोज घराबाहेर पडतात, बाहेरचे अन्न-पाणी पितात, उन्हात काम करतात, त्यांच्यासाठी हे घातक ठरत आहे. एलएनजेपीचे वैद्यकीय संचालक डॉ सुरेश कुमार म्हणाले की, गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाचा एकही रुग्ण नाही. उष्णतेचा प्रभाव जसजसा वाढला आहे, तसतसे कोरोना संसर्गाचे प्रमाणही कमी झाले आहे. ते म्हणाले की व्हायरस उष्णता सहन करू शकत नाही, विषाणू मरतो. त्यामुळेच सर्व प्रकारच्या व्हायरल इन्फेक्शनच्या घटनांमध्ये घट झाली आहे. बीएलके सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर संदीप नय्यर म्हणाले की, सर्व प्रकारच्या तापाचे रुग्ण कमी झाले आहेत. इन्फ्लूएंझा प्रकरणे जवळजवळ संपली आहेत. कोविड रुग्ण कधीकधी एकटे येतात.

थंड हवामान व्हायरस वाढण्यास मदत करत होते. पूर्वी इन्फ्लूएन्झा पसरत होता, त्यासोबत H1N1 चे केसेस आले. नंतर जेव्हा कोविडचे नवीन रूप आले तेव्हा त्याचा प्रसारही झपाट्याने होऊ लागला. वारंवार हवामानातील बदलांमुळे संसर्ग पसरण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होत होते. अनेक महिन्यांपासून दिल्लीकरांना ताप आणि खोकल्याचा त्रास होत होता. डॉ.अनिल बन्सल यांनी सांगितले की, आता तापाचा धोका कमी झाला आहे, उष्णतेमुळे डिहायड्रेशन, उलट्या होण्याचा धोका जास्त असतो. 

डॉक्टरांनी सांगितले की, उष्णता वाढली की, लोकांना इच्छा नसतानाही थंड पाणी प्यावे लागते. दिल्लीत विकल्या जाणाऱ्या थंड पाण्यात वापरल्या जाणाऱ्या बर्फाचा दर्जा चांगला नाही. बर्फ तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या पाण्याची गुणवत्ता खूपच कमी आहे. या बर्फाचा उसाचा रस, लस्सी बनवणे इत्यादीसाठी वापर केला जातो. जे लोक कामानिमित्त उन्हात बाहेर पडतात, त्यांना थेट उन्हाचा तडाखा बसतो. कडक उन्हात घाम जास्त येतो, शरीरातील पाणी कमी होते आणि चालताना पाणी पिणे शक्य होत नाही, त्यामुळे डिहायड्रेशन होते. हे टाळण्याची गरज आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य