शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बापरे! कोरोनानंतर Diabetes रुग्णांच्या मृत्यूदरात वाढ; महिला, तरुणांना सर्वाधिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 16:51 IST

कोरोना महामारीनंतर डायबेटिस रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे.

कोरोना महामारीच्या काळात डायबेटीसच्या रुग्णांच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात होती. आता एका नवीन संशोधनात ही चिंता खरी ठरत आहे. 'द लॅन्सेट डायबेटीस अँड एंडोक्रिनोलॉजी' या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, कोरोना महामारीनंतर डायबेटीस रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे.

सर्वाधिक फटका महिला आणि तरुणांना बसत असल्याचंही संशोधनात आढळून आलं आहे. संशोधनानुसार, हे मृत्यू डायबेटीस संबंधित समस्यांमुळे आणि साथीच्या आजारादरम्यान उपचारात अडथळा आल्याने झाले असावेत. डब्ल्यूएचओच्या शास्त्रज्ञांसह संशोधकांच्या टीमने जगभरातील 138 रिसर्चचे पुनरावलोकन केले आहे. 

रुग्णांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागलं?

संशोधकांचा असा विश्वास आहे की, रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी आणि साथीच्या काळात लॉकडाऊनमुळे डायबेटीसच्या रुग्णांना नियमित तपासणी, औषधे आणि काळजी घेणं शक्य झालं नाही. याशिवाय, कोरोना संसर्गाचा धोका डायबेटीसच्या रुग्णांना रुग्णालयात जाण्यापासून रोखू शकतो.

मुलांमध्ये वाढल्या समस्या 

संशोधकांना असं आढळून आलं की, कोरोनानंतर मुलं आणि तरुणांमध्ये डायबेटीसचे प्रमाण वाढले आहे. जगभरातील आयसीयूमध्ये येणाऱ्या डायबेटीस असलेल्या लहान मुलांची संख्या धक्कादायक आहे. लहान मुलं आणि तरुण डायबेटीस केटोएसिडोसिस (डीकेए) च्या प्रकरणांमध्ये देखील वाढ झाली आहे. 

DKA ही डायबेटीसशी संबंधित एक गंभीर जीवघेणी समस्या आहे. उलट्या, पोटदुखी, श्वास घेण्यास त्रास होणं आणि वारंवार लघवी होणं ही त्याची लक्षणं आहेत. या संशोधनाचे निष्कर्ष खूपच चिंताजनक आहेत आणि कोरोना महामारीच्या काळात आणि नंतर डायबेटीसच्या रुग्णांवर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं अधोरेखित केलं आहे.

टॅग्स :diabetesमधुमेहHealthआरोग्य