शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

डार्विनच्या सिद्धांताला पुन्हा छेद; म्हणे धावपळ करणाऱ्यांपेक्षा आळशीच दीर्घायुषी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 21:02 IST

जास्त उर्जा खर्च करणारे जीव अल्पायुषी

लंडन : जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विनच्या सिद्धांताला आणखी एका छेद देण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र, हा प्रयत्न कोणी राजकीय व्यक्तीने केला नसून शास्त्रज्ञांनीच संशोधनाअंती केला आहे. काही समुद्री जीव त्यांच्या रोजच्या आयुष्यात जास्त उर्जा खर्च करतात, ते समांतर प्रजातीच्या कमी उर्जा खर्च करणाऱ्या जीवांपेक्षा कमी जगत असल्याचा शोध संशोधकांनी लावला आहे. म्हणजेच धावपळ करणाऱ्यांपेक्षा आळशीच दीर्घायुषी असतात असा याचा अर्थ होतो. संशोधकांनी 299 समुद्री जिवांचा अभ्यास केला. 

जादा उर्जा खर्च केल्याने या जिवांमध्ये चयापचय क्रिया वेगाने झाली. तर कमी उर्जा खर्च करणाऱ्या जिवांमध्ये चयापचय कमी होते. कन्सास विद्यापीठाचे बायोलॉजीचे प्राध्यापक ब्रूस लिबरमॅन यांनी सांगितले की, चयापचय क्रिया जेवढी हळू असेल तेवढे आयुष्य जास्त असते. कमी उर्जा खर्च करणाऱ्या जिवांना अन्नद्वारे कमी उर्जा लागते. यामुळे हे जीव कठीन वेळीही आरामात जगू शकतात. अशात जास्त उर्जा खर्च करणाऱ्या जिवांना जर तेवढी उर्जा मिळाली नाही तर ते कमजोर होऊन लवकर मरण्याची शक्यता असते. 

जगभरात अनेक प्रजाती नष्ट झाल्या किंवा होण्याच्या मार्गावर आहेत. या संशोधनामुळे प्रजातींच्या नष्ट होण्याच्या कारणांचा शोध लागणार आहे. जगभरामध्ये अन्नसाखळी कमी झाल्याने अनेक जीव संपण्याच्या मार्गावर आहेत. यात जास्त उर्जा खर्च करणाऱ्या जिवांना मोठा धोका आहे. या संशोधनामुळे जमिनीवर राहणाऱ्या मानव आणि प्राण्यांबाबतही हेच सुत्र लागू होते का यावरही संशोधन करण्यास मदत मिळणार आहे. याचा अर्थ असा नाही की आळशी व्यक्ती जास्त स्वस्थ असतात, असेही या संशोधकांनी सांगितले. 

टॅग्स :scienceविज्ञानHealthआरोग्य