शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची क्वारंटाईन आणि कोरोना चाचणीपासून सुटका होणार?, तज्ज्ञांची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 21:46 IST

कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना नागरिकांना लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता आहे.

कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना नागरिकांना लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही डोस पूर्ण केलेल्या नागरिकांना प्रवासादरम्यान क्वारंटाईन करणं किंवा त्यांची कोरोना चाचणी देखील केली जाऊ नये अशी शिफारस तज्ज्ञांनी केली आहे. कोरोना लसीसाठी तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय तज्ज्ञांच्या समितीनं आणि लसीकरणासाठी निर्धारित करण्यात आलेल्या तांत्रिक अॅडवायझरी ग्रूपनं आरोग्य मंत्रालयासोबत झालेल्या बैठकीत याबाबतची शिफारस केली आहे. 

कोविड-१९ वर्किंग ग्रूपचे चेअरमन डॉ.एनके अरोडा देखील या बैठकीत सहभागी होती. तज्ज्ञांनी केलेली शिफारस देशाबाहेर प्रवास करणाऱ्या नागरिकांसंदर्भातील असल्याचं त्यांनी सांगितलं. यासोबतच ज्यांनी कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत आणि त्यांना याआधी कोरोनाची लागण होऊन गेली आहे अशा नागरिकांनाही देशांतर्गत प्रवासादरम्यान क्वारंटाइन, कोरोना चाचणीपासून सवलत द्यावी, असाही प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या बैठकीत झालेल्या चर्चेचे सविस्तर मुद्दे राज्यांना देखील पाठविण्यात आले आहेत जेणेकरुन याबाबत संबंधित राज्य सरकारांना पुढील निर्णय घेता येईल. 

लसीकरण पूर्ण झालेले व्यक्ती कोण?कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेऊन कमीत कमी दोन आठवड्यांचा कालावधी पूर्ण केलेला आहे, अशाच नागरिकांना लसीकरण पूर्ण झालेले नागरिक म्हणता येईल. तज्ज्ञांच्या बैठकीत चर्चा झालेले मुद्दे सार्वजनिक करण्यात आलेले असले तरी अजूनही काही राज्यांमध्ये लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांकडेही आरटीपीसीआर चाचणीची मागणी केली जात आहे. विविध राज्यांच्या विविध नियमांमुळे नागरिक आणि ट्रॅव्हल कंपन्यांना देखील मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. 

"तज्ज्ञांच्या शिफारसी केलेल्या असूनही अनेक राज्यांमध्ये अजूनही प्रतिबंध कायम आहेत. त्यामुळे यात केंद्रानं लक्ष घालून एक सर्वसमावेशक आदेश जारी करण्याची गरज आहे", असं ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षा ज्योती मायल यांनी सांगितलं. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या