शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींच्या रक्तात गुठळ्या होण्याचे प्रकार - डॉ. संजय ओक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 07:12 IST

आपण सगळे कोविडमध्ये गुंतून पडलो, पण त्यामुळे नंतर होणाऱ्या परिणामांकडे दुर्लक्ष झाले आहे. कोविड झालेल्या व्यक्तीची काळजी नंतरचे ४० दिवस ते ४ महिने घेणे आवश्यक आहे,

अतुल कुलकर्णी 

मुंबई : कोरोना होऊन गेलेल्या काही रुग्णांमध्ये रक्त गोठण्याची प्रक्रिया किंवा निरनिराळ्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ््या होण्याचे प्रकार दिसून आले आहेत. काही रुग्णांमध्ये हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये गुठळ्या दिसून आल्या आहेत. परिणामी त्यातील काहींचे हृदयविकाराने निधन झाल्याचे समोर आले आहे, अशी माहिती सरकारने स्थापन केलेल्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी लोकमतला दिली.

यासाठी अ‍ॅलोपॅथीसोबतच फिजिओथेरपी देखील महत्त्वाची आहे. श्वसनाचे वेगवेगळे व्यायाम आवश्यक असल्याचेही डॉ. ओक यांनी स्पष्ट केले. आपण सगळे कोविडमध्ये गुंतून पडलो, पण त्यामुळे नंतर होणाऱ्या परिणामांकडे दुर्लक्ष झाले आहे. कोविड झालेल्या व्यक्तीची काळजी नंतरचे ४० दिवस ते ४ महिने घेणे आवश्यक आहे, असे आता वेगवेगळ्या निष्कर्षातून समोर आले आहे. त्यासाठी शासनाने ‘पोस्ट सिंड्रोम ओपीडी‘ तयार करावी, त्यात तज्ज्ञ डॉक्टर असावेत, त्यात रक्ताच्या चाचण्या व्हाव्यात, सिटीस्कॅनसह पल्मनरी फंक्शन टेस्ट केली जावी, अशा सूचना टास्क फोर्सने सरकारला केल्याचे डॉ. ओक यांनी सांगितले.

हृदयविकाराचा धोकाअनेक रुग्ण बरे होऊन घरी गेले, पण दहा दिवसानंतर त्यांचे हृदयविकाराने निधन झाल्याच्या बातम्या येत आहेत. त्याचे कारण रक्ताच्या गुठळ्या तयार होणे हे आहे. या गुठळ्या शरीरात दूरवर पसरलेल्या रक्तवाहिन्यांमध्ये देखील होत आहेत. काही रुग्णांमध्ये पायाच्या रक्तवाहिन्यांत अशा गुठळ्या होतात, असे दिसून आले आहे. त्यामुळे पायाच्या पोटºया दुखणे, विलक्षण थकवा येणे असे परिणाम दिसत आहेत. त्यापेक्षाही भयंकर म्हणजे, मेंदूकडे जाणाºया रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ््या झाल्याने पक्षाघात होण्याचे प्रमाणही वाढल्याचे दिसत आहे, असे डॉ. ओक म्हणाले.

श्वसनाचे व्यायाम कराअ‍ॅलोपॅथीमध्ये रक्त पातळ होण्यासाठीचे औषध रुग्णाला दिले जाते. सुरुवातीच्या काळात अशी औषधे दिलेली नव्हती. मी स्वत: आजारी पडलो, त्यानंतर म्हणजे मे-जून नंतर दहा दिवसांच्या औषधांचा कोर्स दिला जात आहे. आता मात्र ज्यांना रक्त आणि हृदयाचे त्रास आहेत अशांना सरसकट रक्त पातळ होणारी औषधे दिली जात आहेत. मात्र त्याला मर्यादा असल्याचे सांगून डॉ. ओक म्हणाले, अशी औषधे फार काळासाठी अशा रुग्णांना देता येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या यकृ तावर त्याचा परिणाम होऊ शकतो. रेमडेसीविर हे औषध देखील अशा रुग्णांच्या यकृ तावर परिणाम करते, हे ज्ञात आहे. अशा परिस्थितीत अ‍ॅलोपॅथीला मर्यादा पडत आहेत, असे सांगून डॉक्टर ओक म्हणाले, आता फिजिओथेरपीला पर्याय नाही. दुर्दैवाने आपण त्याकडे लक्ष दिलेले नाही. अशा रुग्णांची फुप्फुस व्यवस्थित होण्यासाठी ८ ते १२ आठवडे लागतात. त्यासाठी रोज ४५ मिनिट श्वसनाचे व्यायाम करणे आवश्यक असल्याचेही डॉ. ओक म्हणाले.स्वत: डॉक्टर बनू नकाआयुर्वेदामध्ये असंख्य वनस्पती अशा आहेत ज्यांचा श्वसन प्रक्रियेवर परिणाम होतो. लेंडीपिंपळी वनस्पतीचा दुधातून काढा मी स्वत: घेत आहे. दालचिनी, लवंग पाण्यात भिजवून त्याचे सेवन करत आहे. यामुळे प्रतिकार शक्ती वाढायला मदत होते. मात्र अशा औषधांची, त्याच्या खरेपणाची तपासणी करूनच ती घ्यावी, त्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरना विचारा. त्यांच्या सल्ल्याने काढे, औषधे घेतली पाहिजेत.स्वत: परस्पर डॉक्टर होऊ नका आणि आयुर्वेदिक काढे मनाने घेऊ नका, असा सल्लाही डॉ. ओक यांनी दिला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या