शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

CoronaVirus Live Updates : कोरोना पाठ सोडेना! रिकव्हरीनंतरही 50 टक्के लोकांमध्ये आढळून येतंय कमीत कमी एक लक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 15:31 IST

CoronaVirus Live Updates : कोरोना संसर्गातून बरं झाल्यानंतर दोन वर्षांनी देखील कोरोना रुग्णांची पाठ सोडत नसल्याचं समोर आलं आहे.

नवी दिल्ली - देशात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा चार कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 2,827 रुग्ण आढळून आले आहेत. तर 24 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,24,181 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान रिसर्चमधून धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. कोरोना संसर्गातून बरं झाल्यानंतर दोन वर्षांनी देखील कोरोना रुग्णांची पाठ सोडत नसल्याचं समोर आलं आहे. 

दोन वर्षांनंतरही जास्तीत जास्त लोकांमध्ये कमीतकमी एक तरी लक्षण आढळून येत आहे. सायन्स जर्नल लँसेटने केलेल्या रिसर्चमध्ये हे समोर आलं आहे. यामध्ये कोरोनातून बरं झाल्यानंतर दोन वर्षांनी 50 टक्के लोक असे आहेत ज्यांच्यामध्ये अद्याप एक तरी लक्षण दिसत असल्याचा दावा केला आहे. कोरोनातून ठीक झाल्यावरही शरीरावर त्याचा परिणाम होत आहे. लोक पुन्हा आपलं काम करत आहेत. पण लक्षणांचा सामना मात्र त्यांना करावाच लागत आहे. 

लाँग कोविडच्या परिणामांबाबतची माहिती जमा करण्याची सध्या गरज आहे. जेणेकरून त्याचा धोका आपण कमी करू शकतो. लँसेटने हा रिसर्च वुहानच्या जिन यान-तान रुग्णालयातून कोरोनातून ठीक झालेल्या 2,469 रुग्णांवर केला आहे. हे रुग्ण उपचारानंतर बरे झाले. पण त्यातील 1192 रुग्ण असे होते जे गेल्या दोन वर्षांपासून आपल्या काही तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे येत आहेत. 

रिसर्चनुसार, रुग्णांना थकवा, अशक्तपणा जाणवत आहे. तर काहींमध्ये एंग्जायटी आणि डिप्रेशनचं लक्षणं पाहायला मिळत आहे. कोरोनातून ठीक झाल्यावर देखील अस्वस्थता जाणवत असल्याचं काही लोकांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाचा वेग मंदावत असतानाच काही राज्यात पुन्हा रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य