शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
4
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
5
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
6
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
7
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
8
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
9
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
10
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
12
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
13
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
14
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
15
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
16
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
17
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
18
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
19
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कोरोनामुक्त झाल्यानंतरचे सहा महिने धोक्याचे, इतरांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांना मृत्यूचा धोका ६० टक्क्यांनी अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 10:55 IST

coronavirus News : कोरोनाची लागण झालेल्यांनाच नाही तर कोरोनामुक्त झालेल्या लोकांनाही संसर्ग झाल्यापासून पुढचे सहा महिने मृत्यूचा धोका अधिक असतो. असे नेचर या नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनामध्ये संशोधकांनी सांगितले आहे. 

नवी दिल्ली - सध्या देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. (Coronavirus in India) दररोज लाखो लोकांना संसर्ग होत आहे. दरम्यान, कोरोनाची लागण झालेल्यांनाच नाही तर कोरोनामुक्त झालेल्या लोकांनाही संसर्ग झाल्यापासून पुढचे सहा महिने मृत्यूचा धोका अधिक असतो. यामध्ये कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करावे न लागलेल्यांचाही समावेश आहे. ही माहिती कोरोनाबाबतच्या व्यापक संशोधनामधून समोर आली आहे. कोरोनाच्या साथीचा येणाऱ्या काळात जगभरातील लोकसंख्येवर मोठा प्रभाव पडणार आहे, असे नेचर या नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनामध्ये संशोधकांनी सांगितले आहे. (Coronavirus patients 60% higher risk of death than others, research reveals shocking information)

अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मेडिसिनमधील संशोधकांनी कोविड-१९ शी संबंधित विविध आजारांची एक यादीसुद्धा उपलब्ध केली आहे. त्यामधून या साथीमुळे दीर्घकाळात उदभवणाऱ्या त्रासाचे एक व्यापक चित्र समोर आले आहे. सुरुवातीला केवळ श्वसनाशी संबंधित आजाराचे कारण ठरलेला विषाणू पुढच्या काळात शरीरातील जवळपास प्रत्येक अवयवाला बाधि करू शकतो. 

या संशोधनामध्ये आजारपणातून सावरलेल्या तब्बल ८७ हजार कोरोनाबाधित रुग्ण आणि सुमारे ५० लाख अन्य रुग्णांचा अभ्यास केला गेला. या संशोधनाबाबत वरिष्ठ लेखक आणि मेडिसिनचे सहाय्यक प्राध्यापक जियाद अल-अली यांनी सांगितले की, कोरोनाचे निदान झाल्याच्या सहा महिन्यांनंतरही कोविड-१९ ची सौम्य लागण झालेल्यांमध्येही मृत्यूचा धोका कमी नसतो. तसेच आजाराचे गांभीर्यही वाढत जाते, असे आमच्या संशोधनामध्ये दिसून आले आहे.  

संशोधकांच्या म्हणण्यानुसार सुरुवातीच्या संसर्गातून बरे झाल्यानंतर आजाराच्या पहिल्या ३० दिवसांनंतर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये पुढच्या सहा महिन्यांपर्यंत इतर लोकांच्या तुलनेत मृत्यचा धोका ६० टक्के अधिक असतो. या सहा महिन्यांपर्यंतच्या काळात कोरोनामुक्त झालेल्या सर्व लोकांमध्ये दर एक हजार रुग्णांमागे आठ मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसेच कोरोनाच्या गंभीर रुग्णांमध्ये ज्यांना रुग्णालयात भरती करण्याची गरज भासते आणि जे निदान झाल्यानंतर ३० दिवसांमध्ये बरे होतात. अशा रुग्णांमध्ये दर एक हजार रुग्णांमागे २९ मृत्यू अधिक होतात, असे दिसून आले आहे. 

अल अली यांनी सांगितले की, कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांनी जागरुक राहिले पाहिजे. या रुग्णांना एकीकृत आणि व्यापक देखभालीची गरज आहे.  

संशोधकांनी रुग्णांकडून घेतलेल्या माहितीमधून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांवर या आजारामुळे झालेले विविध दुष्परिणाम समोर आले आहेत. या दुष्परिणामांमध्ये श्वसनाची समस्या, हृदयाच्या ठोक्यांमधील अनियमितता मानसिक आरोग्याच्या समस्या आणि केसगळती यांचा समावेश आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यInternationalआंतरराष्ट्रीय