शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

Corornavirus: कोरोना...डर के आगे जीत है; कोविडची भीती वाटत असेल तर 'या' सात टिप्स पडतील उपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 10:16 IST

Corornavirus: मला कोरोना झाला म्हणजे मी संपलो, आता कसे होईल, सगळे संपले या भावना व अवास्तव भीती रुग्णाला अधिक धोकादयक ठरू शकते

लोकमत न्यूज नेटवर्क

एकीकडे कोरोनाचे आकडे नियमित वाढत आहेत. नियमित होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत वाढ होत असतानाच चिंता, भीती, नैराश्य, नकारात्मक अशा वातावरणात व या समस्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भीतीपोटी अनेकांना मोठा धक्का बसून त्यांना जीव गमवावा लागत असल्याची काही उदाहरणे समोर येत आहेत. अशा स्थितीत अतिकाळजी किंवा निष्काळजीपणा यातील मध्य साधून आणि सकारात्मकता शोधून आपले मानसिक आरोग्य चांगले ठेवा, असा सल्ला शहरातील काही मानसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे.

निष्काळजीपणा धोकादायक

काही जण अगदीच बिनधास्त व कुठलेच नियम न पाळता मुक्त संचार करीत असल्याने अशा लोकांमुळे कोरोनाचा संसर्ग अधिक वाढत आहे. आम्हाला काही होणार नाही, आम्हाला का कोरोना झालाय का? अशा अनेक गैरसमजातून त्यांचा बिनधास्तपणा वाढतो, तो आताच्या स्थितीत अधिक धोकादायक आहे.

अतिकाळजी धोकादायक

कोरोनाचे वेळीच निदान झाल्यास वेळीच उपचार सुरू झाल्यास पुढील धोके टळतात, हे वारंवार समोर आले आहे. त्यामुळे मला कोरोना झाला म्हणजे मी संपलो, आता कसे होईल, सगळे संपले या भावना व अवास्तव भीती रुग्णाला अधिक धोकादायक ठरू शकते, यामुळे चिंता, नैराश्य अशा भावना वाढू शकतात. झोप न येणे, नकारात्मकता वाढणे या गोष्टी होऊ शकतात. या गोष्टी नंतर तुमच्या शारीरिक आरोग्यावर घातक परिणाम करू शकतात.

भीती वाटतेय तर हे करा

कोरोनाची लक्षणे सर्वश्रुत आहेत. यातील लक्षणे जाणवल्यानंतर घाबरून न जाता थेट तपासणी करून घ्या. जे असेल ते एकदाचे स्पष्ट झाले म्हणजे मनातील भीती तात्काळ निघू शकते. आणि बाधित आढळून आलाच तरी न घाबरता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेतल्यास काहीच होणार नाही, ही सकारात्मकता ठेवा. कोरानात मृत्यूदर हा कमी आहे. पण यासाठी वेळीच उपचार हवे.

या आहेत काही टीप्स

वारंवार कोरोनाबाबतच विचार करू नका

एखाद्या चांगल्या छंदात स्वत:ला गुंतवून ठेवा

मन, विचार नेहमी प्रसन्न ठेवा

ताणतणावावर मात करीत सक्षमपणे मार्ग काढता येतो, हा विचार नेहमी मनात ठेवा

कोरोनाच्या वारंवारच्या आकडेवारीपासून लांब रहा

पुरेशी काळजी घ्या, पुरेसी झोप घ्या, प्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर द्या, योग्य पौष्टिक आहार घ्या.

गरजूंना मदत करा, याने तुमचा आत्मविश्वासही वाढेल.

...........................

सध्या कोरोनाचे प्रमाण खूप वाढले आहे. यात असुरक्षितता आणि चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, निष्काळजीपणाने वागणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाचा संसर्ग अधिक वाढला आहे. अशा स्थितीत अवास्तव भीती न बाळगता स्वत:ची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. चिंता, नैराश्य वाटत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. सकारात्मका शोधा, नवी संधी शोधा, एखादा छंद जोपासा.

- डॉ. प्रदीप जोशी, मानसोपचारतज्ज्ञ

.........................

गैरसमज, बेधडकपणा ही कोरोनाच्या बाबतीत अक्षम्य चूक आहे. कोरोना झाल्यानंतर मग अनेक बाबींच्या बाबतीत तणाव घेतला जातो. त्यामुळे निष्काळजीपणा व अतिकाळजी यातील फरक ओळखून वर्तणूक ठेवल्यास आपले मानसिक स्वास्थ्य अशा परिस्थितीत निरोगी राहू शकते, जे आताच्या घडीला अत्यंत महत्त्वाचे आहे. ताणतणावावर मात करून सक्षमपणे मार्ग काढा. लक्षणे आल्यानंतर भीती वाटत असल्यास सर्वात आधी तपासणी करून घ्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सर्व काही करा, स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ नका.

- डॉ.दिलीप महाजन, मानसोपचारतज्ज्ञ

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या