शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आला नवरात्रीचा सण, पण डायबिटीस पेशंटनी सावधान...उपवास करताना घ्या 'ही' काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 14:00 IST

नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपास करण्याची तयारी करत असणार्‍यांनी सर्वात आधी आपल्या आरोग्याची काळजी घेणे देखील तेवढेच आवश्यक आहे.  डायबिटीस असणार्‍या रुग्णांनी नवरात्री दरम्यान काय सावधगिरी बाळगली पाहिजे हे जाणून घेणे ही आवश्यक आहे.

नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपास करण्याची तयारी करत असणार्‍यांनी सर्वात आधी आपल्या आरोग्याची काळजी घेणे देखील तेवढेच आवश्यक आहे.  डायबिटीस असणार्‍या रुग्णांनी नवरात्री दरम्यान काय सावधगिरी बाळगली पाहिजे हे जाणून घेणे ही आवश्यक आहे.

टाइप २ डायबिटीस असणारे नवरात्रीचा उपवास ठेवू शकतात. परंतू त्याअगोदर त्यांनी डॉक्टराकडून आपल्या औषध संबंधी सल्ला घेतला पाहिजे. जर तुम्ही टाइप २ डायबिटीसचे रुग्ण आहात आणि नवरात्रीचा उपवास ठेवत असाल तर उपवास करण्यापूर्वी योग्य प्रमाणात गहू, डाळ, मेवा आणि प्रोटीनचे सेवन करणे आवश्यक आहे. आपण या सर्व गोष्टींचे योग्य प्रमाणात सेवन करत असल्यास शरीराला ऊर्जा मिळेल आणि आपल्यात उपवास करण्याची ताकद मिळेल. या व्यतिरिक्त निर्जला व्रत ठेवू इच्छित असणार्‍यांनी व्रतापूर्वी फळांचे रस, भाज्या यांचे भरपूर प्रमाणात सेवन करणे गरजेचे आहे.

जास्त वेळ उपाशी राहणे अशा रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे रक्तातील शुगर लेव्हल कमी जास्त होऊ शकते. अशात घाम फुटणे, कंपन येणे, हृदयाचे ठोके वाढणे अशा समस्या येऊ शकतात. डायबिटीस आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असणार्‍यांनी चुकूनही मिठाशिवाय उपवास ठेवू नका.

तसेच या दरम्यान तेलकट पदार्थ खाणे टाळा. जास्त प्रमाणात तेलाचे सेवन केल्याने इन्सुलिनमध्ये समस्या उद्भवू शकते. उपवास दरम्यान आपली शुगर लेवल तपासत राहा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सdiabetesमधुमेह