शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! तरुणांमध्ये वाढतोय कॅन्सरचा धोका; रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा, 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 11:11 IST

गेल्या तीन दशकांमध्ये जागतिक स्तरावर 50 वर्षांखालील लोकांमध्ये कॅन्सरच्या नवीन प्रकरणांमध्ये 79% वाढ झाली आहे.

कॅन्सरबाबत एका अभ्यासात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. ब्रिटिश मेडिकल जर्नल (BMJ ऑन्कोलॉजी) मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की गेल्या तीन दशकांमध्ये जागतिक स्तरावर 50 वर्षांखालील लोकांमध्ये कॅन्सरच्या नवीन प्रकरणांमध्ये 79% वाढ झाली आहे. अशा रुग्णांची संख्या 1990 मध्ये 18.2 लाखांवरून 2019 मध्ये 38.2 लाख झाली. याच कालावधीत 28% वाढ झाल्याचे संशोधकांना आढळले

TOI च्या मते, हा अभ्यास ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज 2019 च्या अहवालातील डेटाच्या विश्लेषणावर आधारित आहे, ज्यामध्ये भारतासह 204 देश आणि प्रदेशांमध्ये 29 प्रकारच्या कॅन्सर समाविष्ट आहेत. नारायण हेल्थचे अध्यक्ष डॉ. देवी शेट्टी यांनी सांगितले की, भारतासारख्या देशांमध्ये कॅन्सरच्या घटनांमध्ये वाढ होण्यामागे वाढती जागरूकता आणि निदान उपकरणांची उपलब्धता हे प्रमुख कारण आहे. तथापि, ते पुढे म्हणाले की, प्रकरणांमध्ये वाढ होण्यामागे प्रदूषण, आहाराच्या सवयी आणि कमी शारीरिक हालचाली यासारख्या पर्यावरणीय घटकांची भूमिका नाकारता येत नाही.

BMJ (ऑन्कॉलॉजी) अभ्यासात, संशोधकांना असे आढळून आले की, 2019 मध्ये 50 वर्षांखालील वयोगटातील सुरुवातीच्या काळात स्तनाच्या कॅन्सरचे सर्वाधिक प्रमाण आढळले, परंतु 1990 नंतर नाकाचा कॅन्सर (नासोफरीनक्स) आणि प्रोस्टेटचा कॅन्सर सर्वाधिक वाढला. 

डॉ. रणधीर सूद, अध्यक्ष, मेदांता इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह अँड हेपॅटोबिलरी सायन्सेस, म्हणाले, लसीकरण कार्यक्रमात हेपेटायटीस बी लसीकरणाचा लिव्हर कॅन्सर कमी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. पण मला असं वाटतं की, नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजचे प्रमाण वाढल्यामुळे त्याचे फायदे रद्द होऊ शकतात, ज्यामुळे लिव्हर कॅन्सर होऊ शकतो. पचनसंस्थेचे कॅन्सरही वाढले आहेत, असेही ते पुढे म्हणाले.

गेल्या तीन दशकांमध्ये आढळलेल्या ट्रेंडच्या आधारे, संशोधकांनी असा अंदाज लावला आहे की कॅन्सरच्या नवीन प्रकरणांची आणि संबंधित मृत्यूंची जागतिक संख्या 31% आणि 21% ने वाढू शकते. 2030 पर्यंत, 40 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना सर्वाधिक धोका असेल.

अल्कोहोल सेवन आणि तंबाखूचा वापर 50 वर्षाखालील लोकांमध्ये कॅन्सरसाठी मुख्य जोखीम घटक आहेत. 2022 मध्ये भारतात सुमारे 14.6 लाख कॅन्सरच्या रुग्णांची नोंद झाली. 2025 पर्यंत ही संख्या 15.7 लाखांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Healthआरोग्यcancerकर्करोग