शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! भारतीय तरुणांमध्ये झपाट्याने वाढतंय कॅन्सरचं प्रमाण; 'असा' करा बचाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 12:02 IST

भारतात ब्रेस्ट कॅन्सर, प्रोटेस्ट कॅन्सर यासारख्या कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे. त्यात असंही आढळून आले की, केवळ ३० वर्षांत, जागतिक स्तरावर ५० वर्षांखालील लोकांमध्ये कॅन्सरच्या नवीन प्रकरणांमध्ये ७९ टक्के वाढ झाली आहे.

कॅन्सर हा आजार केवळ वृद्ध लोकांनाच होतो असं आधी मानलं जात होतं. परंतु आता तरुणांमध्येही कॅन्सरची अनेक प्रकरणं दिसून येत आहेत. अनेक संशोधनांमध्ये असं दिसून आलं आहे की भारतातील तरुणांमध्ये कॅन्सरचं प्रमाण हळूहळू वाढत आहे. ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये २०२३ साली प्रकाशित झालेल्या एका रिसर्चमध्ये असं सांगण्यात आलं होतं की, भारतात ब्रेस्ट कॅन्सर, प्रोटेस्ट कॅन्सर यासारख्या कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे. त्यात असंही आढळून आले की, केवळ ३० वर्षांत, जागतिक स्तरावर ५० वर्षांखालील लोकांमध्ये कॅन्सरच्या नवीन प्रकरणांमध्ये ७९ टक्के वाढ झाली आहे.

तरुणांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढण्याचं कारण काय?

लाईफस्टाइल - कॅन्सरच्या वाढत्या घटनांमागे एक प्रमुख कारण म्हणजे आपली आधुनिक लाईफस्टाईल. लठ्ठपणा ही भारतातील तरुणांमध्ये वाढणारी समस्या आहे आणि १५ प्रकारच्या कॅन्सरचं कारण आहे. धुम्रपान आणि अति मद्यपानामुळेही कॅन्सर होतो.

अनुवांशिक कारण - कुटुंबातील एखाद्याला कॅन्सर झाला असला तरी तरुणपणात कॅन्सरचा धोका असतो. ५-१०% तरुणांमध्ये कॅन्सर होण्याचे कारण अनुवांशिक आहे.

अन्नामध्ये पौष्टिकतेचा अभाव - आजकाल बहुतेक तरुण प्रक्रिया केलेले अन्न खातात ज्यामध्ये पोषक तत्वांचा अभाव असतो. शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

तरुणांमध्ये कॅन्सरचं वाढतं चिंताजनक 

तरुणांमध्ये कॅन्सरचं वाढतं प्रमाण हे अनेक कारणांमुळे चिंतेचं कारण बनत आहे. बऱ्याच प्रकरणांमध्ये असं घडतं की कॅन्सरची पारंपारिक लक्षणं तरुणांमध्ये दिसून येत नाहीत ज्यामुळे कॅन्सर झालाय हे लवकर समजत नाही.

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना अपोलो हॉस्पिटलच्या डॉ पाखी अग्रवाल म्हणतात की, तरुणांध्ये कॅन्सर अधिक आक्रमक असतो आणि त्याचा पॅटर्न समजत नाही, ज्यामुळे त्याच्यावर उपचार करणं अधिक आव्हानात्मक असतं. 

प्रक्रिया केलेले अन्न आणि रेड मीट जास्त प्रमाणात खाल्ल्याने कोलोन कॅन्सरचा धोका वाढतो. त्यामुळे फळं, भाज्या आणि प्रथिने पुरेशा प्रमाणात असलेले अन्न खा. जर आपण शारीरिक हालचाली कमी केल्या तर दोन्ही गोष्टी मिळून कॅन्सरचा धोका वाढतो. हे टाळण्यासाठी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा आणि नियमित व्यायाम करा. धुम्रपान आणि मद्यपान टाळा.

टॅग्स :cancerकर्करोगCancer Awarenessकॅन्सर जनजागृतीHealthआरोग्य