शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
5
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
6
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
7
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
8
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
9
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
10
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
11
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
12
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
13
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
14
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
15
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
16
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
17
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
18
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
19
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
20
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे

शरीराला सकस आहाराची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 02:50 IST

ज्याप्रमाणे एखाद्या कारला धावण्यासाठी अत्युच्च प्रतीच्या इंधनाची आवश्यकता असते त्याप्रमाणे आपल्याला शरीराला सकस आहाराची गरज असते.

 - डॉ. अभिषेक काटकवारज्याप्रमाणे एखाद्या कारला धावण्यासाठी अत्युच्च प्रतीच्या इंधनाची आवश्यकता असते त्याप्रमाणे आपल्याला शरीराला सकस आहाराची गरज असते. आरोग्यवर्धक आणि सर्वोत्कृष्ट अन्न ज्यात योग्य प्रथिने आणि जीवनसत्त्वांचा समावेश आहे, अशा आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे. आपल्या शरीर आणि बुद्धीचे आॅक्सिटेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण करणे गरजेचे आहे. शुद्ध साखर आणि संरक्षकांचे अतिप्रमाणातील सेवन शरीराला हानिकारक आहे. आज चिंता आणि नैराश्याचे प्रमाण वाढत असल्याचे आपण पाहत आहोत. आपल्या आतड्याच्या आतील आवरणामध्ये सिरोटीन हे रसायन तयार होते. हे केवळ आपल्याला चयापचयास मदत करीत नाही, तर आपले विचार आणि भावना संतुलित ठेवण्यास, तसेच आपली झोप, मूड, भूक, वेदना ग्रहण क्षमता यास नियमित करण्यास मदत करते. लोक तणावात असताना खाण्याकडे का वळतात, यावर अनेक वेळा चिंतन करण्यात आले आहे. आपण जेव्हा दु:खी असतो तेव्हा आपल्याला जास्त आवडणाऱ्या आहाराकडे आपण वळतो.सिरोटीनमुळे तात्पुरता आनंद मिळतो आणि त्यामुळेच असंख्य लोक अन्नाकडे वळतात व त्यांना आलेल्या तणावापासून काही क्षणासाठी सुटका झाल्यासारखी वाटते. बरेच लोक अन्न सहज उपलब्ध असल्याने तणावमुक्तीसाठी जेवण करण्यावर भर देतात. मात्र, यामुळे अ‍ॅनोरेक्झियासारखी समस्या उद्भवू शकते. आपण ग्रहण करीत असलेल्या आहाराकडे आपण किती प्रमाणात आकर्षित आहोत यावर खूप विचार करणे आवश्यक आहे. आपण जे अन्न खातो ते केवळ जिभेचे चोचले पुरविण्यासाठी खातो की, गरज म्हणून हे ठरविणे महत्त्वाचे आहे. तथापि, शरीराला पोषक नसणाºया अन्नाकडे आकर्षित होणे आणि त्याचे नेहमी सेवन करणे हे आपली बुद्धी, मन, अस्मिता यांच्यासाठी अतिशय हानिकारक आहे.आरोग्यासाठी घातक असलेल्या अन्नाचे सेवन करणे म्हणजे थकवा, चिडचिडेपणा, चिंता, नैराश्य आणि तणाव यांसारख्या विकारांना स्नेहपूर्वक आमंत्रित करणे हे आहे. याउलट प्रथिने, जीवनसत्त्वे, कार्बोहायड्रेट, तसेच भाजीपाल्यासारखा संतुलित आरोग्यदायी आहार आपल्याला ताजेतवाणे तसेच निरोगी ठेवतो आणि शाश्वत निरोगी तथा आनंददायी जीवन जगणे सुकर करते.

टॅग्स :Healthआरोग्यfoodअन्न