शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

शरीराला सकस आहाराची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 02:50 IST

ज्याप्रमाणे एखाद्या कारला धावण्यासाठी अत्युच्च प्रतीच्या इंधनाची आवश्यकता असते त्याप्रमाणे आपल्याला शरीराला सकस आहाराची गरज असते.

 - डॉ. अभिषेक काटकवारज्याप्रमाणे एखाद्या कारला धावण्यासाठी अत्युच्च प्रतीच्या इंधनाची आवश्यकता असते त्याप्रमाणे आपल्याला शरीराला सकस आहाराची गरज असते. आरोग्यवर्धक आणि सर्वोत्कृष्ट अन्न ज्यात योग्य प्रथिने आणि जीवनसत्त्वांचा समावेश आहे, अशा आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे. आपल्या शरीर आणि बुद्धीचे आॅक्सिटेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण करणे गरजेचे आहे. शुद्ध साखर आणि संरक्षकांचे अतिप्रमाणातील सेवन शरीराला हानिकारक आहे. आज चिंता आणि नैराश्याचे प्रमाण वाढत असल्याचे आपण पाहत आहोत. आपल्या आतड्याच्या आतील आवरणामध्ये सिरोटीन हे रसायन तयार होते. हे केवळ आपल्याला चयापचयास मदत करीत नाही, तर आपले विचार आणि भावना संतुलित ठेवण्यास, तसेच आपली झोप, मूड, भूक, वेदना ग्रहण क्षमता यास नियमित करण्यास मदत करते. लोक तणावात असताना खाण्याकडे का वळतात, यावर अनेक वेळा चिंतन करण्यात आले आहे. आपण जेव्हा दु:खी असतो तेव्हा आपल्याला जास्त आवडणाऱ्या आहाराकडे आपण वळतो.सिरोटीनमुळे तात्पुरता आनंद मिळतो आणि त्यामुळेच असंख्य लोक अन्नाकडे वळतात व त्यांना आलेल्या तणावापासून काही क्षणासाठी सुटका झाल्यासारखी वाटते. बरेच लोक अन्न सहज उपलब्ध असल्याने तणावमुक्तीसाठी जेवण करण्यावर भर देतात. मात्र, यामुळे अ‍ॅनोरेक्झियासारखी समस्या उद्भवू शकते. आपण ग्रहण करीत असलेल्या आहाराकडे आपण किती प्रमाणात आकर्षित आहोत यावर खूप विचार करणे आवश्यक आहे. आपण जे अन्न खातो ते केवळ जिभेचे चोचले पुरविण्यासाठी खातो की, गरज म्हणून हे ठरविणे महत्त्वाचे आहे. तथापि, शरीराला पोषक नसणाºया अन्नाकडे आकर्षित होणे आणि त्याचे नेहमी सेवन करणे हे आपली बुद्धी, मन, अस्मिता यांच्यासाठी अतिशय हानिकारक आहे.आरोग्यासाठी घातक असलेल्या अन्नाचे सेवन करणे म्हणजे थकवा, चिडचिडेपणा, चिंता, नैराश्य आणि तणाव यांसारख्या विकारांना स्नेहपूर्वक आमंत्रित करणे हे आहे. याउलट प्रथिने, जीवनसत्त्वे, कार्बोहायड्रेट, तसेच भाजीपाल्यासारखा संतुलित आरोग्यदायी आहार आपल्याला ताजेतवाणे तसेच निरोगी ठेवतो आणि शाश्वत निरोगी तथा आनंददायी जीवन जगणे सुकर करते.

टॅग्स :Healthआरोग्यfoodअन्न