शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

शरीराला सकस आहाराची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 02:50 IST

ज्याप्रमाणे एखाद्या कारला धावण्यासाठी अत्युच्च प्रतीच्या इंधनाची आवश्यकता असते त्याप्रमाणे आपल्याला शरीराला सकस आहाराची गरज असते.

 - डॉ. अभिषेक काटकवारज्याप्रमाणे एखाद्या कारला धावण्यासाठी अत्युच्च प्रतीच्या इंधनाची आवश्यकता असते त्याप्रमाणे आपल्याला शरीराला सकस आहाराची गरज असते. आरोग्यवर्धक आणि सर्वोत्कृष्ट अन्न ज्यात योग्य प्रथिने आणि जीवनसत्त्वांचा समावेश आहे, अशा आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे. आपल्या शरीर आणि बुद्धीचे आॅक्सिटेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण करणे गरजेचे आहे. शुद्ध साखर आणि संरक्षकांचे अतिप्रमाणातील सेवन शरीराला हानिकारक आहे. आज चिंता आणि नैराश्याचे प्रमाण वाढत असल्याचे आपण पाहत आहोत. आपल्या आतड्याच्या आतील आवरणामध्ये सिरोटीन हे रसायन तयार होते. हे केवळ आपल्याला चयापचयास मदत करीत नाही, तर आपले विचार आणि भावना संतुलित ठेवण्यास, तसेच आपली झोप, मूड, भूक, वेदना ग्रहण क्षमता यास नियमित करण्यास मदत करते. लोक तणावात असताना खाण्याकडे का वळतात, यावर अनेक वेळा चिंतन करण्यात आले आहे. आपण जेव्हा दु:खी असतो तेव्हा आपल्याला जास्त आवडणाऱ्या आहाराकडे आपण वळतो.सिरोटीनमुळे तात्पुरता आनंद मिळतो आणि त्यामुळेच असंख्य लोक अन्नाकडे वळतात व त्यांना आलेल्या तणावापासून काही क्षणासाठी सुटका झाल्यासारखी वाटते. बरेच लोक अन्न सहज उपलब्ध असल्याने तणावमुक्तीसाठी जेवण करण्यावर भर देतात. मात्र, यामुळे अ‍ॅनोरेक्झियासारखी समस्या उद्भवू शकते. आपण ग्रहण करीत असलेल्या आहाराकडे आपण किती प्रमाणात आकर्षित आहोत यावर खूप विचार करणे आवश्यक आहे. आपण जे अन्न खातो ते केवळ जिभेचे चोचले पुरविण्यासाठी खातो की, गरज म्हणून हे ठरविणे महत्त्वाचे आहे. तथापि, शरीराला पोषक नसणाºया अन्नाकडे आकर्षित होणे आणि त्याचे नेहमी सेवन करणे हे आपली बुद्धी, मन, अस्मिता यांच्यासाठी अतिशय हानिकारक आहे.आरोग्यासाठी घातक असलेल्या अन्नाचे सेवन करणे म्हणजे थकवा, चिडचिडेपणा, चिंता, नैराश्य आणि तणाव यांसारख्या विकारांना स्नेहपूर्वक आमंत्रित करणे हे आहे. याउलट प्रथिने, जीवनसत्त्वे, कार्बोहायड्रेट, तसेच भाजीपाल्यासारखा संतुलित आरोग्यदायी आहार आपल्याला ताजेतवाणे तसेच निरोगी ठेवतो आणि शाश्वत निरोगी तथा आनंददायी जीवन जगणे सुकर करते.

टॅग्स :Healthआरोग्यfoodअन्न