शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

कोरोना व्हायरसनंतर आता भारतावर बर्ड फ्लू चं सावट; 'या' राज्यात शासनाचा सर्तकतेचा इशारा

By manali.bagul | Updated: January 5, 2021 14:11 IST

Health News in Marathi : हिमाचलच्या कांगडा जिल्ह्यातील पौंग बांध अभयारण्यात गेल्या एका आठवड्यात 1800 प्रवासी पक्ष्यांना मृत्यूचा सामना करावा लागल्याचे समोर आलं आहे. 

देशात कोरोना माहामारीच्या प्रसारात आता बर्ड फ्लू चा धोका वाढत आहे. राजस्थानच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात  252 कावळ्यांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे.  आता हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश आणि केरळमध्ये पक्ष्यांच्या रहस्यमय मृत्यूनं हाहाकार पसरवला आहे. हिमाचलच्या कांगडा जिल्ह्यातील पौंग बांध अभयारण्यात गेल्या एका आठवड्यात 1800 प्रवासी पक्ष्यांना मृत्यूचा सामना करावा लागल्याचे समोर आलं आहे. 

यामध्ये सोमवारी आढळलेल्या 505 मृत पक्ष्यांचा समावेश आहे. भोपाळ आणि बरेलीच्या नमुना अहवालात या पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू (एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस) असल्याची पुष्टी झाली आहे. कांगडा जिल्हा प्रशासनाने डेहरा, जावली, इंदोरा आणि फतेहपूर उपविभागातील कोंबडी, अंडी, मासे यासह पोल्ट्री उत्पादनांच्या विक्रीस बंदी घातली आहे.

या व्यतिरिक्त पोंग धरण व त्याच्या आसपासच्या भागात कुक्कुटपालन व शेती करण्यासारख्या कामांनाही बंदी घातली जाईल. आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल 5०,००० रुपये दंड आकारला जाईल. त्याचबरोबर केरळमधील कोट्टायम आणि अलाप्पुझामधील प्रकरणानंतर या भागातील एक किमीच्या परिसरात बदके, कोंबडीची व इतर पाळीव पक्ष्यांना मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आणखी बरीच राज्येही सावध झाली आहेत.

केरळ- 12 हजार बदकांचा मृत्यू,  36 हजार मारले जाणार

पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री के.आर. राजू म्हणाले की, ''दोन जिल्ह्यात बदकांमध्ये बर्ड फ्लूची पुष्टी झाल्यानंतर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या अंतर्गत, विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी हजारो बदकं मारले जातील. सरकार शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देईल. आतापर्यंत 12 हजार बदके मेली आहेत, तर 36 हजारांचा बळी घेतला जाणार आहे. लोकांना खबरदारी घेण्यास सांगितले आहे.''

 अलर्ट! आता भारतातही वेगानं होतोय बर्ड फ्लूचा प्रसार; जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

मध्यप्रदेश: इंदूरमध्ये  150 कावळ्यांच्या मृत्यूनं केला कहर

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये मृत आढळलेल्या कावळ्यांमध्ये बर्ड फ्लू विषाणूची पुष्टी झाली आहे. राज्याचे आरोग्य विभागाचे डॉ. अमित मालाकर म्हणाले की, ''आतापर्यंत 150 कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. कावळ्यांमधील संक्रमणाची पुष्टी झाल्यानंतर पोल्ट्री फॉर्मचीही चौकशी केली जात आहे. त्यांनी सांगितले की H5N8 विषाणूचा संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. तथापि, माणसांमध्ये या आजाराची उपस्थिती अद्याप व्यक्त झालेली नाही.

दिलासादायक! कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला वेगळं करणारा भारत जगातील पहिला देश; : ICMR

असा करा बचाव

इन्फ्लूएन्झा टाळण्यासाठी फ्लूची लस डॉक्टरांच्या सल्ल्यानं घेऊ शकता. या व्यतिरिक्त, आपण गर्दीच्या ठिकाणी बाजारात जाणे, संक्रमित पक्ष्यांच्या संपर्कात येणे टाळा, स्वच्छता राखून वेळोवेळी आपले हात धुवा. बहुतेक प्रकरणांमध्ये अँटीवायरल औषधांद्वारे त्यावर उपचार केले जातात. लक्षणं दर्शविल्यानंतर 48 तासांच्या आत औषधे घेणे आवश्यक आहे. बर्ड फ्लूची लागण झाल्याव्यतिरीक्त, त्याच्या संपर्कात आलेल्या घरातील इतर सदस्यांनाही या आजाराची लक्षणे नसतानाही औषधे घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यHimachal Pradeshहिमाचल प्रदेश