शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

कोरोना व्हायरसनंतर आता भारतावर बर्ड फ्लू चं सावट; 'या' राज्यात शासनाचा सर्तकतेचा इशारा

By manali.bagul | Updated: January 5, 2021 14:11 IST

Health News in Marathi : हिमाचलच्या कांगडा जिल्ह्यातील पौंग बांध अभयारण्यात गेल्या एका आठवड्यात 1800 प्रवासी पक्ष्यांना मृत्यूचा सामना करावा लागल्याचे समोर आलं आहे. 

देशात कोरोना माहामारीच्या प्रसारात आता बर्ड फ्लू चा धोका वाढत आहे. राजस्थानच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात  252 कावळ्यांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे.  आता हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश आणि केरळमध्ये पक्ष्यांच्या रहस्यमय मृत्यूनं हाहाकार पसरवला आहे. हिमाचलच्या कांगडा जिल्ह्यातील पौंग बांध अभयारण्यात गेल्या एका आठवड्यात 1800 प्रवासी पक्ष्यांना मृत्यूचा सामना करावा लागल्याचे समोर आलं आहे. 

यामध्ये सोमवारी आढळलेल्या 505 मृत पक्ष्यांचा समावेश आहे. भोपाळ आणि बरेलीच्या नमुना अहवालात या पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू (एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस) असल्याची पुष्टी झाली आहे. कांगडा जिल्हा प्रशासनाने डेहरा, जावली, इंदोरा आणि फतेहपूर उपविभागातील कोंबडी, अंडी, मासे यासह पोल्ट्री उत्पादनांच्या विक्रीस बंदी घातली आहे.

या व्यतिरिक्त पोंग धरण व त्याच्या आसपासच्या भागात कुक्कुटपालन व शेती करण्यासारख्या कामांनाही बंदी घातली जाईल. आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल 5०,००० रुपये दंड आकारला जाईल. त्याचबरोबर केरळमधील कोट्टायम आणि अलाप्पुझामधील प्रकरणानंतर या भागातील एक किमीच्या परिसरात बदके, कोंबडीची व इतर पाळीव पक्ष्यांना मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आणखी बरीच राज्येही सावध झाली आहेत.

केरळ- 12 हजार बदकांचा मृत्यू,  36 हजार मारले जाणार

पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री के.आर. राजू म्हणाले की, ''दोन जिल्ह्यात बदकांमध्ये बर्ड फ्लूची पुष्टी झाल्यानंतर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या अंतर्गत, विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी हजारो बदकं मारले जातील. सरकार शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देईल. आतापर्यंत 12 हजार बदके मेली आहेत, तर 36 हजारांचा बळी घेतला जाणार आहे. लोकांना खबरदारी घेण्यास सांगितले आहे.''

 अलर्ट! आता भारतातही वेगानं होतोय बर्ड फ्लूचा प्रसार; जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

मध्यप्रदेश: इंदूरमध्ये  150 कावळ्यांच्या मृत्यूनं केला कहर

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये मृत आढळलेल्या कावळ्यांमध्ये बर्ड फ्लू विषाणूची पुष्टी झाली आहे. राज्याचे आरोग्य विभागाचे डॉ. अमित मालाकर म्हणाले की, ''आतापर्यंत 150 कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. कावळ्यांमधील संक्रमणाची पुष्टी झाल्यानंतर पोल्ट्री फॉर्मचीही चौकशी केली जात आहे. त्यांनी सांगितले की H5N8 विषाणूचा संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. तथापि, माणसांमध्ये या आजाराची उपस्थिती अद्याप व्यक्त झालेली नाही.

दिलासादायक! कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला वेगळं करणारा भारत जगातील पहिला देश; : ICMR

असा करा बचाव

इन्फ्लूएन्झा टाळण्यासाठी फ्लूची लस डॉक्टरांच्या सल्ल्यानं घेऊ शकता. या व्यतिरिक्त, आपण गर्दीच्या ठिकाणी बाजारात जाणे, संक्रमित पक्ष्यांच्या संपर्कात येणे टाळा, स्वच्छता राखून वेळोवेळी आपले हात धुवा. बहुतेक प्रकरणांमध्ये अँटीवायरल औषधांद्वारे त्यावर उपचार केले जातात. लक्षणं दर्शविल्यानंतर 48 तासांच्या आत औषधे घेणे आवश्यक आहे. बर्ड फ्लूची लागण झाल्याव्यतिरीक्त, त्याच्या संपर्कात आलेल्या घरातील इतर सदस्यांनाही या आजाराची लक्षणे नसतानाही औषधे घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यHimachal Pradeshहिमाचल प्रदेश