शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

धोका वाढला! आता भारतात ७ राज्यात बर्ड फ्लूचा कहर; हाय अलर्ट जारी

By manali.bagul | Updated: January 10, 2021 12:56 IST

Bird flu news & Latest Updates : राजधानी दिल्ली, छत्तीसगड आणि महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यात पक्ष्यांच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळांमध्ये पाठविण्यात आले आहेत.

देशातील बर्‍याच राज्यात बर्ड फ्लूचा प्रसार झालेला पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेश, केरळ आणि गुजरातमधून महाराष्ट्रात पक्षी मरत असल्याच्या बातम्या आहेत. हिमाचल प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, केरळ आणि उत्तर प्रदेश अशी सात राज्ये आहेत ज्यात बर्ड फ्लूची पुष्टी झाली आहे. राजधानी दिल्ली, छत्तीसगड आणि महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यात पक्ष्यांच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळांमध्ये पाठविण्यात आले आहेत.

कानपूरमधील चिमण्यांमध्ये बर्ड फ्लूचा विषाणू मिळाल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. चार पक्ष्यांच्या मृत्यूनंतर तपासणी अहवालात बर्ड फ्लूची पुष्टी झाली आहे. कानपूर आयुक्त राजशेखर यांच्या आदेशानुसार प्राणीसंग्रहालयाच्या सभोवतालचा परिसर रेड झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तेथील रहिवासीही याबाबत सतर्क झाले आहेत. कानपुर प्राणिसंग्रहालयात दोन दिवसांत दहा पक्ष्यांचा मृत्यू झाल्याने चार नमुने नमुने भोला प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. तिथून या अहवालात बर्ड फ्लूची लक्षणे चौघांमध्ये आढळली.

दिल्लीत बर्ड फ्लूची पुष्टी नसली तरी राजधानीच्या विविध भागात पक्षी मरत आहेत. दिल्लीतील एका पार्कमध्ये 17 कावळ्यांचा मृत्यू झाला तर द्वारकाच्या डीडीए पार्कमध्ये 2 कावळ्यांचा मृत्यू झाला. त्याच वेळी दिल्लीतील संजय लेकमध्ये 10 बदके मारले गेले आणि मयूर विहार फेज -3 च्या उद्यानात तीन ते चार दिवसांपासून मृत कावळे सापडले आहेत. 

जीवंत पक्ष्यांच्या आयातीवर सध्या बंदी आहे. दिल्लीतील प्रत्येक जिल्ह्यात देखरेखीसाठी पाळत ठेवण्याचे पथक तयार करण्यात आले असून पशुवैद्यकीय तज्ज्ञ निरंतर सर्वेक्षण करत असतात. संजय तलाव, भालास्वा तलाव आणि पोल्ट्री मार्केटवर लक्ष ठेवले जात आहे. मृत पक्ष्यांची माहिती देण्यासाठी 23890318 हेल्पलाईन क्रमांक देखील जारी करण्यात आला आहे. आता हार्ट बीटने ओळखता येणार कोरोना पॉझिटिव्ह आहात की नाही? ;जाणून घ्या कसं ते

केरळ- 12 हजार बदकांचा मृत्यू,  36 हजार मारले जाणार

पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री के.आर. राजू म्हणाले होते की, ''दोन जिल्ह्यात बदकांमध्ये बर्ड फ्लूची पुष्टी झाल्यानंतर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या अंतर्गत, विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी हजारो बदकं मारले जातील. सरकार शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देईल. आतापर्यंत 12 हजार बदके मेली आहेत, तर 36 हजारांचा बळी घेतला जाणार आहे. लोकांना खबरदारी घेण्यास सांगितले आहे.''

 अलर्ट! आता भारतातही वेगानं होतोय बर्ड फ्लूचा प्रसार; जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

मध्यप्रदेश: इंदूरमध्ये  150 कावळ्यांच्या मृत्यूनं केला कहर

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये मृत आढळलेल्या कावळ्यांमध्ये बर्ड फ्लू विषाणूची पुष्टी झाली आहे. राज्याचे आरोग्य विभागाचे डॉ. अमित मालाकर म्हणाले होते की, ''आतापर्यंत 150 कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. कावळ्यांमधील संक्रमणाची पुष्टी झाल्यानंतर पोल्ट्री फॉर्मचीही चौकशी केली जात आहे. त्यांनी सांगितले की H5N8 विषाणूचा संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. तथापि, माणसांमध्ये या आजाराची उपस्थिती अद्याप व्यक्त झालेली नाही.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सBird Fluबर्ड फ्लू