शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

Intermittent Fasting केल्यानं होतात 'हे' गंभीर आजार कायमचे बरे, संशोधतानून नवा खुलास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 17:34 IST

एका नवीन अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, ठराविक वेळेत खाण्याचा उपवास (Intermittent fasting) केल्याने काही गंभीर आजारांचा धोकाही कमी होण्यास मदत होते.

भारतीय जीवनशैलीमध्ये उपवासाला विशेष महत्त्व आहे. उपवास हा केवळ श्रद्धा आणि भक्तीशी संबंधित नाही, तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. त्यामुळे वजन संतुलित राहते, पचन यंत्रणेला आराम मिळतो, कॉलेस्टेरॉल कमी होते आणि मानसिक शांती मिळते. उपवासाने देखील मन शांत राहण्यास मदत मिळते. एका नवीन अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, ठराविक वेळेत खाण्याचा उपवास (Intermittent fasting) केल्याने काही गंभीर आजारांचा धोकाही कमी होण्यास मदत होते.

संशोधकांच्या मते, उपवासाची ही पद्धती आपण जीवनशैलीत समाविष्ट केली तर त्यामुळे डायबिटीस आणि उच्च रक्तदाबापासून आराम मिळू शकतो. या अभ्यासाचे निष्कर्ष एंडोक्राइन रिव्ह्यूज जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत, जे सायन्स डेलीने देखील प्रकाशित केले आहे.

कॅलिफोर्नियामधील साल्क इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल स्टडीजचे प्राध्यापक सच्चिदानंद पांडा म्हणाले, “ठराविक वेळेत जेवून (Intermittent fasting) उपवास करण्याचे अनेक फायदे आहेत. वजन कमी करण्यासाठी प्रयत्नशील असलेले आणि निरोगी जीवनशैली जगण्यासाठी जागृक असलेल्यांनी ते काय खातात यासोबतच त्यांनी काय आणि कधी खावे याकडेही लक्ष दिले पाहिजे. उपवासाची ही पद्धत लठ्ठपणा कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

ठराविक वेळात खाणे ही उपवास किंवा आहाराची एक पद्धत आहे. ज्यामध्ये एका विशिष्ट वेळापर्यंत काहीह न खाता त्यानंतर अन्न खाल्ले जाते. याचा प्रत्येकाचा कालावधी वेगवेगळा असू शकतो. बराच वेळ उपाशी राहिल्यानंतर अन्न खाल्ले जाते. कोणत्या वेळी अन्न खावे आणि कोणत्या वेळी नाही, हे ठरवले जाते. काही लोक १२ तासांच्या उपवासानंतर अन्न खातात. काही १४ ते १८ तास काहीही खात नाहीत, पण जेव्हा ते अन्न खातात तेव्हा ते कमी कार्बोहायड्रेट आणि अधिक प्रथिने आणि फायबर घेतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स