शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

सावधान! हे आहेत तुळशीची पाने खाण्याचे 5 साईड इफेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 12:15 IST

अनेक गोष्टींसाठी फायद्याची ठरणारी तुळशी सर्वांसाठीच फायद्याची नसते. चला जाणून घेऊया तुळशी कुणी खाऊ नये आणि त्याने काय नुकसान होतं. 

तुळशीच्या पानांचे आरोग्यदायी फायदे सर्वांनाच माहीत आहेत. आयुर्वेदातही याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. प्रत्येकाच्या घरात एक तुळशीचं रोप असतंच. आणि घरातील वयोवृध्द लोक नेहमीच तुळशीची पाने खाण्याचा सल्ला देतात. पण तुम्हालाही माहीत नसेल की, तुळशीचे काही साईड इफेक्टही आहेत. अनेक गोष्टींसाठी फायद्याची ठरणारी तुळशी सर्वांसाठीच फायद्याची नसते. चला जाणून घेऊया तुळशी कुणी खाऊ नये आणि त्याने काय नुकसान होतं. 

1) गर्भवती महिलांना नुकसानदायक

तुळशीची पाने गर्भवती महिलांसोबतच त्यांच्या पोटात वाढत असलेल्या बाळासाठीही नुकसानदायक ठरु शकतात. इतकंच नाहीतर गंभीर परिस्थीतीत गर्भपाताचीही भीती असते. कारण तुळशीमध्ये अॅस्ट्रागॉल असतं. जे गर्भाशयात आकुंचन निर्माण करतं. हे गर्भावस्थेत घातक ठरु शकतं. 

2) डायबिटीज रुग्णांनी खाऊ नये तुळशी

अनेक अभ्यासातून खुलासा झाला आहे की, तुळशीची पाने खाल्ल्याने ब्लड शुगरची लेव्हल कमी होते. अशात जर एखादा डायबिटीजचा रुग्ण आधीच औषधं घेत असताना तुळशीची पाने खात असेल तर शरीरातील शुगर लेव्हल प्रमाणापेक्षा जास्त कमी होऊ शकते. हे रुग्णासाठी हानिकारक ठरु शकतं. 

3) तुळशीमुळे रक्त होतं पातळ

तुळशीची पाने रक्त पातळ करण्यासाठीही ओळखली जातात. अशात जे रक्त पातळ करण्यासाठी औषधांचा वापर करतात त्यांच्यासाठी तुळशी हा सुध्दा एक चांगला घरगुती पर्याय आहे. पण जे आधीपासूनच रक्त पातळ करण्यासाठी औषधं घेताहेत, त्यांनी तुळशीची पाने खाऊ नये. त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

4) लिव्हरला होऊ शकतं नुकसान

WHO नुसार जे लोक एस्टामिनोफेन सारखी औषधं घेत आहेत. त्यांनी तुळशीची पाने नियमीत खाल्ल्यास नुकसान होऊ शकतं. त्यांच्या लिव्हरवर परिणाम होऊ शकतो. असे असण्याचे कारण म्हणजे दोन्हीही दुखण्यापासून सुटका करणा-या गोष्टी आहेत. अशात दोन्ही गोष्टी एकाचवेळी शरीरात गेल्यास तर त्याचा लिव्हरवर परिणाम होतो. 

5) दातांवर डाग

तुम्ही कधीतरी हे नक्की ऐकलं असेल की, तुळशीची पाने कधीही चावून खाऊ नये थेट गीळंकृत करावी. याचं वैज्ञानिक कारण म्हणजे तुळशीच्या पानांमध्ये असलेल्या आयर्नमुळे दातांवर डाग निर्माण होऊ शकतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स