शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सावधान! हे आहेत तुळशीची पाने खाण्याचे 5 साईड इफेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 12:15 IST

अनेक गोष्टींसाठी फायद्याची ठरणारी तुळशी सर्वांसाठीच फायद्याची नसते. चला जाणून घेऊया तुळशी कुणी खाऊ नये आणि त्याने काय नुकसान होतं. 

तुळशीच्या पानांचे आरोग्यदायी फायदे सर्वांनाच माहीत आहेत. आयुर्वेदातही याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. प्रत्येकाच्या घरात एक तुळशीचं रोप असतंच. आणि घरातील वयोवृध्द लोक नेहमीच तुळशीची पाने खाण्याचा सल्ला देतात. पण तुम्हालाही माहीत नसेल की, तुळशीचे काही साईड इफेक्टही आहेत. अनेक गोष्टींसाठी फायद्याची ठरणारी तुळशी सर्वांसाठीच फायद्याची नसते. चला जाणून घेऊया तुळशी कुणी खाऊ नये आणि त्याने काय नुकसान होतं. 

1) गर्भवती महिलांना नुकसानदायक

तुळशीची पाने गर्भवती महिलांसोबतच त्यांच्या पोटात वाढत असलेल्या बाळासाठीही नुकसानदायक ठरु शकतात. इतकंच नाहीतर गंभीर परिस्थीतीत गर्भपाताचीही भीती असते. कारण तुळशीमध्ये अॅस्ट्रागॉल असतं. जे गर्भाशयात आकुंचन निर्माण करतं. हे गर्भावस्थेत घातक ठरु शकतं. 

2) डायबिटीज रुग्णांनी खाऊ नये तुळशी

अनेक अभ्यासातून खुलासा झाला आहे की, तुळशीची पाने खाल्ल्याने ब्लड शुगरची लेव्हल कमी होते. अशात जर एखादा डायबिटीजचा रुग्ण आधीच औषधं घेत असताना तुळशीची पाने खात असेल तर शरीरातील शुगर लेव्हल प्रमाणापेक्षा जास्त कमी होऊ शकते. हे रुग्णासाठी हानिकारक ठरु शकतं. 

3) तुळशीमुळे रक्त होतं पातळ

तुळशीची पाने रक्त पातळ करण्यासाठीही ओळखली जातात. अशात जे रक्त पातळ करण्यासाठी औषधांचा वापर करतात त्यांच्यासाठी तुळशी हा सुध्दा एक चांगला घरगुती पर्याय आहे. पण जे आधीपासूनच रक्त पातळ करण्यासाठी औषधं घेताहेत, त्यांनी तुळशीची पाने खाऊ नये. त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

4) लिव्हरला होऊ शकतं नुकसान

WHO नुसार जे लोक एस्टामिनोफेन सारखी औषधं घेत आहेत. त्यांनी तुळशीची पाने नियमीत खाल्ल्यास नुकसान होऊ शकतं. त्यांच्या लिव्हरवर परिणाम होऊ शकतो. असे असण्याचे कारण म्हणजे दोन्हीही दुखण्यापासून सुटका करणा-या गोष्टी आहेत. अशात दोन्ही गोष्टी एकाचवेळी शरीरात गेल्यास तर त्याचा लिव्हरवर परिणाम होतो. 

5) दातांवर डाग

तुम्ही कधीतरी हे नक्की ऐकलं असेल की, तुळशीची पाने कधीही चावून खाऊ नये थेट गीळंकृत करावी. याचं वैज्ञानिक कारण म्हणजे तुळशीच्या पानांमध्ये असलेल्या आयर्नमुळे दातांवर डाग निर्माण होऊ शकतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स