शहरं
Join us  
Trending Stories
1
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
2
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
3
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
4
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
5
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
6
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
7
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
8
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
9
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
10
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
11
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
12
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
13
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
14
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
15
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
16
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
17
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
18
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
19
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
20
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध

दुधीच्या रसाचे धोके सांगतेय खुद्द ताहिरा कश्यप म्हणजेच आयुष्मान खुरानाची पत्नी, शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 16:57 IST

आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिराने तिच्या चाहत्यांसाठी दुधी भोपळ्याबद्दल जागृती करणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या सर्व प्रकरणानंतर सामान्य नागरिकांच्या मनात देखील अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे दुधी भोपळा जीवघेणा ठरण्याआधीच तो कसा ओळखायचा याविषयी जाणून घेणार आहे.

अभिनेता आयुष्मान खुरानाची (Ayushyaman Khurana) पत्नी(Wife) ताहिरा कश्यपला(Tahira Kashyap) फूड पॉयझींनीग झाल्यामुळे नुकतंच आयसीयु ICU मध्ये दाखल करण्यात आलं होतं. ताहिराला दुधी भोपळ्यामुळे फूड पॉयझींनिंग झालं होतं. ताहिराने देखील वेळेत उपचार घेतल्याने ती आता ठणठणीत आहे. यानंतर आता ताहिराने तिच्या चाहत्यांसाठी दुधी भोपळ्याबद्दल जागृती करणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या सर्व प्रकरणानंतर सामान्य नागरिकांच्या मनात देखील अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे दुधी भोपळा जीवघेणा ठरण्याआधीच तो कसा ओळखायचा याविषयी जाणून घेणार आहे.

दुधी भोपळ खाण्यायोग्य की आयोग्य कसा ओळखायचा ?दुधी, काकडी, भोपळा अशा भाज्यांचा आहारात थेट समावेश करण्यापूर्वी त्याचा लहानसा तुकडा चावून बघणे गरजेचे आहे. भाजीचा तुकडा कडवट चवीचा जाणवल्यास त्याचा आहारात समावेश करणं टाळा. वरून भोपळा ओळखणे शक्य नसते त्यावेळी हा उपाय चांगला आहे. तसेच प्रामुख्याने दूधी भोपळ्यासारख्या फळभाज्या नीट शिजवून खाणंच आरोग्याला अधिक फायदेशीर आहेत. यासोबत बाजारात मिळणारा विकतचा रस पिणं टाळा कारण तो कधी बनवला आहे याची माहिती नसते. त्याऐवजी घरच्या घरी ताजा रस बनवून प्यावा. मात्र हे सर्व करण्यापूर्वी चव तपासून पाहायला विसरू नका.

विषारी दुधी भोपळ्याची लक्षणे काय आहेत ?विषारी दुधी भोपळ्याचा रस पोटात गेल्यास अवघ्या काही मिनिटात उलटी, डायरीया, खूप प्रमाणात घाम येणे, अस्वस्थ वाटणं अशी लक्षणं आढळतात. या लक्षणांनंतर रूग्णाला तात्काळ वैद्यकीय मदत मिळणं गरजेचे आहे. अशाप्रकारच्या विषारी घटकांच्या उतारावर ठोस औषध नसल्याने जगभरात अशाप्रकारे विषारी घटक पोटात जाणं हे काही मिनिटात जीववर बेतण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे रूग्णालयात वेळेत जाणे व डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

दुधी भोपळ्याचा रस कधी ठरतो घातक आणि कशामुळे?प्रत्येक दुधी भोपळ्याचा रस हा जीवघेणा नसतो. मात्र दुधी ही फळभाजी Cucurbitaceae प्रकारातील असते. जेव्हा फळभाजीमध्ये cucurbitacin हे विषारी द्रव्य वाढते तेव्हा त्याची चव बदलते. कडवट बीयांमुळेही हे फळ कडू होते. अशाप्रकारची भाजी थेट शरीरात गेल्यास आरोग्याला धोका निर्माण होतो. दुधीप्रमाणेच या वर्गतील इतर फळभांज्याच्या बाबतीत देखील हे घडू शकते. त्यामुळे या फळभाजीपैकी कोणतेही भाजी घेताना त्याची चव घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स