शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात दही आणि इतर आंबट पदार्थ खावीत का? वाचा काय सांगतं आयुर्वेद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 10:56 IST

Ayurveda Tips for Monsoon Food: आयुर्वेदात आजारी न पडण्यासाठी काय करावं किंवा कोणती औषधं घ्यावी हे सांगितलं जातं. या हिशेबाने आयुर्वेद आपल्याला शरीर फीट ठेवण्यासाठी आणि उपाचाराचे उपाय सांगतं.

Ayurveda Tips for Monsoon Food: पावसाळा सुरू होताच अनेकांना खोकला, सर्दी, गळा खऱाब होणे, कफ किंवा ताप अशा समस्या सुरू होतात. अनेकांच्या लक्षात येत नसेल की, असं का होत आहे. याचं कारण वातावरण नाही तर तुमचा आहार असतो. आयुर्वेदानुसार, वातावरण बदलताच आपल्याला आहारातही बदल करायला हवा. असं केलं नाही तर त्या आहाराचे गुण बदलतात आणि त्यांचे फायदे होण्याऐवजी नुकसान अधिक होतात.

आयुर्वेदात आजारी न पडण्यासाठी काय करावं किंवा कोणती औषधं घ्यावी हे सांगितलं जातं. या हिशेबाने आयुर्वेद आपल्याला शरीर फीट ठेवण्यासाठी आणि उपाचाराचे उपाय सांगतं. आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे की, पावसाळ्यात  पोटातील पचन अग्नि कमजोर होते. अशात आहारात बदल करणं गरजेचं असतं. जे आपल्या शरीराला उष्णता देतील आणि पचनक्रियेत मदत करतील असेच पदार्थ खायला हवेत.

पावळ्यात आंबट पदार्थ खावेत का?

हेच कारण आहे की,  पावसाळ्यात दही, लोणचं किंवा इतर आंबट पदार्थ खाण्यास मनाई केली जाते. अशाप्रकारचे चिकट पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. या पदार्थांमुळे पावसाळ्यात कफ तयार होतो, ज्यामुळे खोकला येतो. सोबतच पचनक्रियाही योग्यप्रकारे होत नाही. पावसाळ्यात या पदार्थांचं सेवन केलं तर घसा खराब होतो, पोटात गडबड होते आणि तापही येऊ शकतो. 

गरम मसाल्यांचा जास्त वापर

आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे की, पावसाळ्यात शरीराचं तापमान योग्य ठेवण्यासाठी आलं, सुंठ, हींग, काळे मिरे आणि गव्हाचं सेवन करावं. पावसाळ्यात शरीरातील दोष दूर करण्यासाठी चटकदार आणि गोड पदार्थ खावेत. गव्हाच्या चपात्या खाव्यात. ज्याने शरीराला आतून उष्णता मिळते.

आलं, लवंग, वेलचीचे फायदे

पावसाळ्यात अनेक सण-उत्सव असतात. या दरम्यान तयार केलेल्या मिठायांमध्ये मखाना, चिरंजी, कलिंगडाच्या बीया, खोबरं आणि कमळाच्या बियांच्या वापर केला जातो. या दिवसांमध्ये आलं, लवंगसहीत इतरही गरम मसाल्यांचं सेवन वाढवलं जातं. ज्यामुळे आपल्या शरीराला या दिवसात पोषण मिळतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सMonsoon Specialमानसून स्पेशल