शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

श्रावणात 'या' डाळींचं सेवन पडू शकतं महागात, तब्येत चांगली ठेवण्यासाठी 'ही' पद्धत वापरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 13:56 IST

Pulses In Shravan : श्रावणात कोणत्या डाळींचं सेवन करू नये हे जाणून घेणंही तेवढंच महत्वाचं आहे.

Pulses In Shravan : डाळींचं सेवन आरोग्यासाठी खूप महत्वाचं असतं. याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. डाळींमध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, आयर्न भरपूर असतं. डाळींच्या सेवनाने शरीराची कमजोरी दूर होण्यास मदत मिळते. पण वातावरण बदलानुसार आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपल्या आहारात बदल केला पाहिजे. श्रावणात कोणत्या डाळींचं सेवन करू नये हे जाणून घेणंही तेवढंच महत्वाचं आहे.

पावसाळ्यात आपली पचनक्रियां कमजोर होत असते. आपण जे खातो ते पचवण्यासाठी शरीराला खूप मेहनत करावी लागते. त्यामुळे आहाराची काळजी घेतली पाहिजे. काही डाळी पचनास जड असतात. व्यवस्थित न शिजवल्याने गॅस, अॅसिडिटी, छातीत जळजळ, ब्लोटिंग, पोटदुखी अशा समस्या होतात. ज्या लोकांना आधीच या समस्या आहेत त्यांनी खालील डाळींचं सेवन करू नये.

कोणत्या डाळी खाऊ नये

पावसाळ्यात पचन तंत्र कमजोर झाल्यामुळे मसूरची डाळ, चणा डाळ, उडीद डाळ, तुरीची डाळ, राजमा यांचं सेवन कमी करावं.

काय कराल उपाय?

जर तुम्हाला या दिवसांमध्ये या डाळींचं सेवन करायचं असेल तर त्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत असली पाहिजे. या डाळी शिजवण्याआधी पाण्यात भिजवून ठेवाव्या. भाजी करताना त्यात आलं, काळी मिरे, जिरं, हींग टाकावा. याने तुमची पचनक्रिया चांगली होते.

वजन कमी करण्यास मदत

डाळी आणि राजमा एका कॅटेगरीमध्ये येतात. अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, यांच्या सेवनाने फॅट आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतं. यात भरपूर फायबर आणि प्रोटीन असतं. ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलं राहतं. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.

एनर्जी मिळेल

डाळींमध्ये हेल्दी कार्ब्स भरपूर असतात. यातील अॅंटी-ऑक्सिडेंट्समुळे सेल्स डॅमेज होण्याचा धोका टाळला जातो. डाळींमधील आयर्नमुळे हीमोग्लोबिन वाढण्यास मदत मिळते. ज्यामुळे शरीराची ताकद वाढते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य