शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

नकली जिऱ्यामुळे होऊ शकतो स्टोन आणि कॅन्सरचा धोका, कशी पटवाल ओळख?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 10:58 IST

अलिकडे दुधापासून ते तांदळापर्यंत कितीतरी गोष्टींमध्ये भेसळ होताना बघायला मिळते. ही इतक्या हुशारीने केली जाती की, सहजासहजी लक्षातही येत नाही.

अलिकडे दुधापासून ते तांदळापर्यंत कितीतरी गोष्टींमध्ये भेसळ होताना बघायला मिळते. ही इतक्या हुशारीने केली जाती की, सहजासहजी लक्षातही येत नाही. आता तर राजस्थान आणि गुजरातमध्ये नकली जिऱ्याचा धंदा चांगलाच वाढला आहे. दिल्लीत पहिल्यांदाच पकडण्यात आलेल्या नकली जिऱ्याने मोठी चिंता वाढली आहे. हे जिरं जंगली गवत, गूळाचं पाणी आणि दगडांची पावडर मिळून तयार केलं जातं. जे आरोग्यासाठी चांगलंच नुकसानकारक आहे. नकली जिऱ्याच्या सेवनाने केवळ स्टोनचाच नाही तर याचं नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्तीही कमजोर होते. तसेच कॅन्सरचाही धोका होतो.

यावर डॉक्टरांचं मत आहे की, ही भेसळ फार घातक आहे आणि सामान्य लोकांच्या जीवनासोबत खेळणं झालं. हे लगेच थांबवलं पाहिजे. न्यूट्रिशननिस्ट डॉक्टर अनिता लांबा यांनी नवभारत टाइम्सला सांगितले की, ज्याप्रकारे हे जिरं तयार केलं जातंय किंवा त्यात ज्या गोष्टी मिश्रित केल्या जातात त्याने स्टोनचा धोका अधिक आहे. 

तसेच याने रोगांसोबत लढण्याची क्षमताही कमी होते. त्या म्हणाल्या की, मनुष्याचं शरीर भेसळयुक्त पदार्थ खाण्यासाठी तयार झालेलं नाही. तसेच एका दुसऱ्या डॉक्टरांनी याबाबत सांगितले की, या जिऱ्याने कॅन्सर होऊ शकतो किंवा त्वचेसंबंधी आजारही होऊ शकतात.

कसं तयार केलं जातं हे जिरं?

यासाठी एक खासप्रकारचं गवत वापरलं जातं. ते गुळाच्या पाण्यात मिश्रित करून सुकवलं जातं. याने गवताना रंग जिऱ्याच्या रंगासारखा होतो. नंतर जिऱ्याला चमक आणि ठोस करण्यासाठी त्यात दगडाची पावडर मिश्रित केली जाते. हे प्रामुख्याने गुजरात आणि राजस्थानमध्ये अनेक महिन्यांपासून सुरू आहे. इथून देशातील इतर भागांमध्ये जिरं पाठवलं जात आहे. 

कशी पटवाल ओळख?

नकली जिऱ्याची ओळख पटवण्यासाठी एका वाटीमधे पाणी घ्या. हे जिरं पाण्यात टाकल्यावर काही वेळाने विरघळू लागतं. त्याचा रंग जातो. तेच ओरिजनल जिरं पाण्यात टाकल्यानंतरही विरघळत नाही. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य