शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

चुरडीच्या तलावावर जि.प.चा अधिकारच नाही !

By admin | Updated: August 26, 2016 01:27 IST

तिरोडा शहरापासून ४ कि.मी.वर चुरडी-गराडा परिसरात असलेला नवीन तलाव (भुताया तलाव) अदानी प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने

वनविभागाची मालकी : अदानी प्रकल्पाला तीन महिन्यांपूर्वीच हस्तांतरिततिरोडा : तिरोडा शहरापासून ४ कि.मी.वर चुरडी-गराडा परिसरात असलेला नवीन तलाव (भुताया तलाव) अदानी प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने आपल्या कामासाठी फोडल्याने त्या तलावात मासेमारी करणाऱ्या संस्थेसह काही शेतकऱ्यांनी तसेच जिल्हा परिषदेने त्यावर आक्षेप घेतला आहे. मात्र वनविभागाच्या मालकीची ती जागा तीन महिन्यांपूर्वीच अदानी व्यवस्थापनाला हस्तांतरित केली असल्याने जिल्हा परिषदेचा त्यावरील अधिकारच संपुष्टात आला असल्याचे स्पष्ट दिसत आहे.त्या जागेवर जिल्हा परिषदेची मालकी नसताना जि.प.ने संबंधित मच्छीमार संस्था व शेतकऱ्यांना अंधारात ठेवल्याचे दिसून येत आहे. तिरोड्यात गुरूवारी उपविभागीय अधिकाऱ्यांनी बोलविलेल्या बैठकीत उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी व तहसीलदार चव्हाण यांनी गटविकास अधिकाऱ्यांना त्या तलावाच्या मालकी हक्कासंदर्भात जिल्हा परिषदेकडे काय कागदपत्रे आहेत? असा प्रश्न केला. मात्र बिडीओंनी त्यासंदर्भात अनभिज्ञता दर्शवित केवळ परंपरेने जिल्हा परिषदेकडून त्या तलावाचा लिलाव केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.हा तलाव आदर्श मत्स्यपालन संस्थेला जि.प.ने लिलावात दिला होता. त्यानंतर अलिकडे तर प्रत्यक्ष लिलाव न करताच केवळ ‘वाटाघाटी’ करून आदर्श मत्स्यपालन संस्थेच्या परवान्याचे नुतनीकरण जिल्हा परिषदेकडून केले जात होते. मात्र प्रत्यक्षात या तलावाच्या जागेवर झुडूपी जंगल होते तेव्हापासून त्याची मालकी वनविभागाची आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील या वनविभागाने तीन महिन्यांपूर्वीच ती जागा अदानी व्यवस्थापनाला हस्तांतरित केली आहे. त्यामुळे त्या जागेवरील जिल्हा परिषदेचा अधिकार संपुष्टात आला आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात अदानी व्यवस्थापनाच्या वतीने त्या तलावाची पाळ फोडल्यामुळे त्यातील पाणी वाहून गेले. यामुळे मत्स्यपालन संस्थेच्या संचालकांनी व काही शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला. चुरडी येथील शेतकरी जनजीवन जांभुळकर यांनी सांगितले की, त्या तलावात राख टाकून दुषित पाणी मिळेल ते नको आहे. सरपंच सचिन कराडे यांनी शेतकऱ्यांना त्या तलावातून नियमित पाणी मिळाले पाहिजे असे सांगितले. पाणी गेल्याने शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले. दुसरीकडे मासोळ्या सुद्धा गेल्याने संबंधित मत्स्यपालन संस्थेचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. परंतू तलाव आम्हाला हस्तांतरित झाल्यामुळे त्या नुकसानासाठी आम्ही जबाबदार नाही, असे अदानी व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. गुरूवारी जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी तलावाला भेट दिली व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी सामजिक कार्यकर्ता शामराव झरारीया, मोहन ग्यानचंदानी, देवेंद्र तिवारी, चुरडीचे सरपंच सचिन कराडे व परिसरातील बरेच शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)- कागदपत्रे पहा, मग ठरवायासंदर्भात अदानी व्यवस्थापनाचे अधिकारी डी.जे. नागपुरे यांनी सांगितले की, ती जागा केंद्र सरकारकडून अदानी व्यवस्थापनाला मिळाली आहे. त्याचे सर्व कागदपत्र आमच्याकडे आहेत. आम्ही ते संबंधितांना दाखवून संभ्रम दूर केला आहे. त्यामुळे मत्स्यपालन संस्थेने आमच्याकडे येण्याऐवजी त्यांना कंत्राट देणाऱ्या जिल्हा परिषदेकडे दाद मागावी.जर वन विभागाने या तलावाची जागा अदानीला हस्तांतरित केली आहे तर जि.प. ने मासोळ्यांसाठी कंत्राट कसे दिले? शेतकऱ्यांना कित्येक वर्षापासून पाणी मिळत होते त्यांना न कळविता जिल्हा परिषदेने त्यांना अंधारात का ठेवले? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.दंडात्मक कारवाई करू-मेंढेया प्रकरणी अदानी प्लान्टने केलेल्या नुकसानीसाठी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी संबंधित तलाव पाहणी केल्यानंतर गराडा-चुरडी येथील शेतकऱ्यांसमोर बोलताना सांगितले. मात्र तो तलाव जिल्हा परिषदेच्या मालकीचा नसताना जिल्हा परिषदेला दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार आहे का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.