शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

चुरडीच्या तलावावर जि.प.चा अधिकारच नाही !

By admin | Updated: August 26, 2016 01:27 IST

तिरोडा शहरापासून ४ कि.मी.वर चुरडी-गराडा परिसरात असलेला नवीन तलाव (भुताया तलाव) अदानी प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने

वनविभागाची मालकी : अदानी प्रकल्पाला तीन महिन्यांपूर्वीच हस्तांतरिततिरोडा : तिरोडा शहरापासून ४ कि.मी.वर चुरडी-गराडा परिसरात असलेला नवीन तलाव (भुताया तलाव) अदानी प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने आपल्या कामासाठी फोडल्याने त्या तलावात मासेमारी करणाऱ्या संस्थेसह काही शेतकऱ्यांनी तसेच जिल्हा परिषदेने त्यावर आक्षेप घेतला आहे. मात्र वनविभागाच्या मालकीची ती जागा तीन महिन्यांपूर्वीच अदानी व्यवस्थापनाला हस्तांतरित केली असल्याने जिल्हा परिषदेचा त्यावरील अधिकारच संपुष्टात आला असल्याचे स्पष्ट दिसत आहे.त्या जागेवर जिल्हा परिषदेची मालकी नसताना जि.प.ने संबंधित मच्छीमार संस्था व शेतकऱ्यांना अंधारात ठेवल्याचे दिसून येत आहे. तिरोड्यात गुरूवारी उपविभागीय अधिकाऱ्यांनी बोलविलेल्या बैठकीत उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी व तहसीलदार चव्हाण यांनी गटविकास अधिकाऱ्यांना त्या तलावाच्या मालकी हक्कासंदर्भात जिल्हा परिषदेकडे काय कागदपत्रे आहेत? असा प्रश्न केला. मात्र बिडीओंनी त्यासंदर्भात अनभिज्ञता दर्शवित केवळ परंपरेने जिल्हा परिषदेकडून त्या तलावाचा लिलाव केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.हा तलाव आदर्श मत्स्यपालन संस्थेला जि.प.ने लिलावात दिला होता. त्यानंतर अलिकडे तर प्रत्यक्ष लिलाव न करताच केवळ ‘वाटाघाटी’ करून आदर्श मत्स्यपालन संस्थेच्या परवान्याचे नुतनीकरण जिल्हा परिषदेकडून केले जात होते. मात्र प्रत्यक्षात या तलावाच्या जागेवर झुडूपी जंगल होते तेव्हापासून त्याची मालकी वनविभागाची आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील या वनविभागाने तीन महिन्यांपूर्वीच ती जागा अदानी व्यवस्थापनाला हस्तांतरित केली आहे. त्यामुळे त्या जागेवरील जिल्हा परिषदेचा अधिकार संपुष्टात आला आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात अदानी व्यवस्थापनाच्या वतीने त्या तलावाची पाळ फोडल्यामुळे त्यातील पाणी वाहून गेले. यामुळे मत्स्यपालन संस्थेच्या संचालकांनी व काही शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला. चुरडी येथील शेतकरी जनजीवन जांभुळकर यांनी सांगितले की, त्या तलावात राख टाकून दुषित पाणी मिळेल ते नको आहे. सरपंच सचिन कराडे यांनी शेतकऱ्यांना त्या तलावातून नियमित पाणी मिळाले पाहिजे असे सांगितले. पाणी गेल्याने शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले. दुसरीकडे मासोळ्या सुद्धा गेल्याने संबंधित मत्स्यपालन संस्थेचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. परंतू तलाव आम्हाला हस्तांतरित झाल्यामुळे त्या नुकसानासाठी आम्ही जबाबदार नाही, असे अदानी व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. गुरूवारी जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी तलावाला भेट दिली व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी सामजिक कार्यकर्ता शामराव झरारीया, मोहन ग्यानचंदानी, देवेंद्र तिवारी, चुरडीचे सरपंच सचिन कराडे व परिसरातील बरेच शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)- कागदपत्रे पहा, मग ठरवायासंदर्भात अदानी व्यवस्थापनाचे अधिकारी डी.जे. नागपुरे यांनी सांगितले की, ती जागा केंद्र सरकारकडून अदानी व्यवस्थापनाला मिळाली आहे. त्याचे सर्व कागदपत्र आमच्याकडे आहेत. आम्ही ते संबंधितांना दाखवून संभ्रम दूर केला आहे. त्यामुळे मत्स्यपालन संस्थेने आमच्याकडे येण्याऐवजी त्यांना कंत्राट देणाऱ्या जिल्हा परिषदेकडे दाद मागावी.जर वन विभागाने या तलावाची जागा अदानीला हस्तांतरित केली आहे तर जि.प. ने मासोळ्यांसाठी कंत्राट कसे दिले? शेतकऱ्यांना कित्येक वर्षापासून पाणी मिळत होते त्यांना न कळविता जिल्हा परिषदेने त्यांना अंधारात का ठेवले? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.दंडात्मक कारवाई करू-मेंढेया प्रकरणी अदानी प्लान्टने केलेल्या नुकसानीसाठी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी संबंधित तलाव पाहणी केल्यानंतर गराडा-चुरडी येथील शेतकऱ्यांसमोर बोलताना सांगितले. मात्र तो तलाव जिल्हा परिषदेच्या मालकीचा नसताना जिल्हा परिषदेला दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार आहे का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.