शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

चुरडीच्या तलावावर जि.प.चा अधिकारच नाही !

By admin | Updated: August 26, 2016 01:27 IST

तिरोडा शहरापासून ४ कि.मी.वर चुरडी-गराडा परिसरात असलेला नवीन तलाव (भुताया तलाव) अदानी प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने

वनविभागाची मालकी : अदानी प्रकल्पाला तीन महिन्यांपूर्वीच हस्तांतरिततिरोडा : तिरोडा शहरापासून ४ कि.मी.वर चुरडी-गराडा परिसरात असलेला नवीन तलाव (भुताया तलाव) अदानी प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने आपल्या कामासाठी फोडल्याने त्या तलावात मासेमारी करणाऱ्या संस्थेसह काही शेतकऱ्यांनी तसेच जिल्हा परिषदेने त्यावर आक्षेप घेतला आहे. मात्र वनविभागाच्या मालकीची ती जागा तीन महिन्यांपूर्वीच अदानी व्यवस्थापनाला हस्तांतरित केली असल्याने जिल्हा परिषदेचा त्यावरील अधिकारच संपुष्टात आला असल्याचे स्पष्ट दिसत आहे.त्या जागेवर जिल्हा परिषदेची मालकी नसताना जि.प.ने संबंधित मच्छीमार संस्था व शेतकऱ्यांना अंधारात ठेवल्याचे दिसून येत आहे. तिरोड्यात गुरूवारी उपविभागीय अधिकाऱ्यांनी बोलविलेल्या बैठकीत उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी व तहसीलदार चव्हाण यांनी गटविकास अधिकाऱ्यांना त्या तलावाच्या मालकी हक्कासंदर्भात जिल्हा परिषदेकडे काय कागदपत्रे आहेत? असा प्रश्न केला. मात्र बिडीओंनी त्यासंदर्भात अनभिज्ञता दर्शवित केवळ परंपरेने जिल्हा परिषदेकडून त्या तलावाचा लिलाव केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.हा तलाव आदर्श मत्स्यपालन संस्थेला जि.प.ने लिलावात दिला होता. त्यानंतर अलिकडे तर प्रत्यक्ष लिलाव न करताच केवळ ‘वाटाघाटी’ करून आदर्श मत्स्यपालन संस्थेच्या परवान्याचे नुतनीकरण जिल्हा परिषदेकडून केले जात होते. मात्र प्रत्यक्षात या तलावाच्या जागेवर झुडूपी जंगल होते तेव्हापासून त्याची मालकी वनविभागाची आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील या वनविभागाने तीन महिन्यांपूर्वीच ती जागा अदानी व्यवस्थापनाला हस्तांतरित केली आहे. त्यामुळे त्या जागेवरील जिल्हा परिषदेचा अधिकार संपुष्टात आला आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात अदानी व्यवस्थापनाच्या वतीने त्या तलावाची पाळ फोडल्यामुळे त्यातील पाणी वाहून गेले. यामुळे मत्स्यपालन संस्थेच्या संचालकांनी व काही शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला. चुरडी येथील शेतकरी जनजीवन जांभुळकर यांनी सांगितले की, त्या तलावात राख टाकून दुषित पाणी मिळेल ते नको आहे. सरपंच सचिन कराडे यांनी शेतकऱ्यांना त्या तलावातून नियमित पाणी मिळाले पाहिजे असे सांगितले. पाणी गेल्याने शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले. दुसरीकडे मासोळ्या सुद्धा गेल्याने संबंधित मत्स्यपालन संस्थेचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. परंतू तलाव आम्हाला हस्तांतरित झाल्यामुळे त्या नुकसानासाठी आम्ही जबाबदार नाही, असे अदानी व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. गुरूवारी जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी तलावाला भेट दिली व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी सामजिक कार्यकर्ता शामराव झरारीया, मोहन ग्यानचंदानी, देवेंद्र तिवारी, चुरडीचे सरपंच सचिन कराडे व परिसरातील बरेच शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)- कागदपत्रे पहा, मग ठरवायासंदर्भात अदानी व्यवस्थापनाचे अधिकारी डी.जे. नागपुरे यांनी सांगितले की, ती जागा केंद्र सरकारकडून अदानी व्यवस्थापनाला मिळाली आहे. त्याचे सर्व कागदपत्र आमच्याकडे आहेत. आम्ही ते संबंधितांना दाखवून संभ्रम दूर केला आहे. त्यामुळे मत्स्यपालन संस्थेने आमच्याकडे येण्याऐवजी त्यांना कंत्राट देणाऱ्या जिल्हा परिषदेकडे दाद मागावी.जर वन विभागाने या तलावाची जागा अदानीला हस्तांतरित केली आहे तर जि.प. ने मासोळ्यांसाठी कंत्राट कसे दिले? शेतकऱ्यांना कित्येक वर्षापासून पाणी मिळत होते त्यांना न कळविता जिल्हा परिषदेने त्यांना अंधारात का ठेवले? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.दंडात्मक कारवाई करू-मेंढेया प्रकरणी अदानी प्लान्टने केलेल्या नुकसानीसाठी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी संबंधित तलाव पाहणी केल्यानंतर गराडा-चुरडी येथील शेतकऱ्यांसमोर बोलताना सांगितले. मात्र तो तलाव जिल्हा परिषदेच्या मालकीचा नसताना जिल्हा परिषदेला दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार आहे का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.