शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
5
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
6
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
7
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
8
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
9
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
10
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
11
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
12
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
13
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
14
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
15
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
16
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
17
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
18
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
19
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
20
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांचा घेराव

By admin | Updated: June 25, 2014 00:31 IST

एप्रिल व मे महिन्याचे पगार काढण्यात यावे या मागणीला घेऊन येथील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने मंगळवारी (दि.२४) जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांना घेराव घातला.

गोंदिया : एप्रिल व मे महिन्याचे पगार काढण्यात यावे या मागणीला घेऊन येथील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने मंगळवारी (दि.२४) जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांना घेराव घातला. दरम्यान अध्यक्षांनी कोषागार अधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे लेखा व वित्त अधिकारी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावर शिक्षकांनी येत्या २८ जून पर्यंत पगार न निघाल्यास आंदोलन अधिक तिव्र करण्याचा इशारा दिला. शासनाने शिक्षकांच्या पगारासाठी शालार्थ वेतन प्रणाली सुरू के ली आहे. त्यांतर्गत शाळा मुख्याधिकाऱ्यांना शाळेतील संपूर्ण शिक्षकांची माहिती संगणकात फिड करून गटशिक्षणाधिकाऱ्यांना द्यावयाची होती. गटशिक्षणाधिकाऱ्यांना ती माहिती शिक्षणाधिकाऱ्यांना तर शिक्षणाधिकाऱ्यांना मुख्य लेखा वित्त अधिकाऱ्यांना द्यावयाची होती. त्यानुसार जिल्ह्यातील शाळा मुख्याधिकाऱ्यांनी इंटरनेट कॅफेवर प्रती शिक्षक ५० रूपये दराने संपूर्ण माहिती फिड करून गटशिक्षणाधिकाऱ्यांना, गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आली. मात्र शिक्षणाधिकारी व मुख्य लेखा वित्त अधिकारी यांच्या दुर्लक्षीतपणामुळे शिक्षकांचे एप्रिल व मे महिन्याचे पगार अद्याप निघालेले नाहीत. विशेष म्हणजे फक्त गोंदिया जिल्ह्यातच हा प्रकार घडला असून सुमारे चार हजार ५०० शिक्षकांचे पगार अडले आहेत. या विषयांवर ३० मे व १६ जून रोजी जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सभा घेऊनही फक्त आश्वासनच मिळाले. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांत चांगलाच रोष निर्माण झाला होता. तर एप्रिल व मे महिन्याचे पगार देण्यात यावे व प्रत्येक शाळेला संगणक, इंटरनेट, प्रिंटर सुविधा पुरविण्यात यावी. तसेच साहीत्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत शालार्थ वेतन आॅनलाईन पंचायत समिती स्तरावरून करण्यात यावे व प्रती शिक्षकाला लागणारा ५० रूपये खर्च थांबविण्यात यावा या मागण्यांसाठी मंगळवारी (दि.२४) घेराव घालणार असल्याचा इशारा प्राथमिक शिक्षक संघाने दिला होता. त्यानुसार मंगळवारी (दि.२४) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने सकाळी ११ वाजताच जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर ठिया आंदोलन करण्यात आले. तर जिल्हा परिषदेत दाखल होताच अध्यक्ष विजय शिवणकर व उपाध्यक्ष मदन पटले यांना घेराव घालण्यात आला. दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष शिवणकर यांच्या दालनात चर्चे दरम्यान त्यांनी फोनवरून कोषागार अधिकारी व जिल्हा परिषद लेखा व वित्त अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच लेखाधिकारी मुंबईत असल्याने त्यांच्या सही साठी बुधवारी (दि.२५) एक कर्मचारी मुंबईला पाठविणार असल्याचे शिक्षकांच्या प्रतिनिधी मंडळाला सांगीतले. यावर प्रतिनिधी मंडळाने २८ जून पर्यंतची मुदत दिली असून तोपर्यंत पगार न निघाल्यास आंदोलन तिव्र करणार असल्याचा इशारा दिला. या आंदोलनात मोठ्या संख्येत शिक्षक व शिक्षीकांनी भाग घेतला होता. (शहर प्रतिनिधी)