शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शेतीत उत्पन्न नाही, गावात रोजगार नाही; शेतकऱ्यांच्या मुलांची शहराकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2021 13:47 IST

गावाकडे धंदा नाही, शेतीत पीक नाही आणि कुठल्याही व्यवसायाला चालना नाही. मग उपजीविकेच्या शोधात शेतकऱ्यांची तरुण पोरं शहराकडे धाव घेतात.

ठळक मुद्देशेतीकडे पाठ फिरविण्याचे वाढले प्रमाणशेती करण्यापेक्षा मोलमजुरी निवडली

गोंदिया : शेतीवर होणारा खर्च जास्त आणि उत्पादन कमी होत असल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. शेतकऱ्यांचे होणारे हाल बघता शेतकऱ्यांच्या पोरांनी शेतीकडे पूर्णतः पाठ फिरविली असून कामाच्या शोधात मोठमोठ्या शहरांकडे धाव घेतली असल्याचे चित्र देवरी तालुक्यातील ग्रामीण भागात दिसत आहे.

देवरी तालुक्यातील शेतकरी सावकारांच्या विविध कर्जाच्या बोझ्यात भरडला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे खाली डोके वर पाय असून व्याजाच्या चक्रव्यूहात शेतकरी अडकलेला आहे. अवकाळी पावसाने झालेले धान पिकाचे नुकसान व वाढत्या कर्जाच्या डोंगरामुळे किंवा शेतकऱ्यांच्या धान पिकाला हमीभावाची हमी नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. म्हणूनच शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडल्याने सावकारी कर्ज काढण्याच्या भानगडीत पडतो. याला शासनाचे धोरणच कारणीभूत ठरत असल्याचे शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांना वेळेवर जमिनीची मशागत, धान पेरणीपासून तर धान काढणीपर्यंत खतांचा वापर, धान पिकावर लागलेल्या रोगावर वेळेवर औषधीचा वापर करावा लागत आहे. हे सर्व काही करण्यासाठी शेतकऱ्यांकडे वेळेवर पैसा असणेही आवश्यक आहे, परंतु शेतकऱ्यांना विविध माध्यमातून लुबाडल्याचे चित्र समोर येत आहे.

निकृष्ट बिजाई तर काही कृषी केंद्रांकडून १३० ते १४० दिवसात निघणाऱ्या धान पिकाचे वाण दिले जाते; मात्र प्रत्यक्षात तसे न होता ते धान कमी कालावधीत निघून ते शेतकऱ्यांच्या माथी बसते याला कारणीभूत कोण ? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांच्या पोरांकडून होत आहे. याला शासनाचे धोरण कारणीभूत म्हणावे की अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष ! हे कळेनासे झाले आहे. 

गावाकडे कामच नाही

शेतकऱ्यांच्या शेतात पिकणारे धान्य हेच शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असते. त्याचे भवितव्य हे पूर्णत: निसर्गाच्या लहरी स्वभावावर अवलंबून असते. पुरेशा पावसाअभावी शेतकरी पेरण्या करू शकत नाहीत. रोज दिवस उगवला की मावळेपर्यंत बळीराजा पावसाची अक्षरश: चातकासारखी वाट बघत असतो. तर कधी अवकाळी पाऊस झोडपून काढतो व त्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते.

गावाकडे धंदा नाही, शेतीत पीक नाही आणि कुठल्याही व्यवसायाला चालना नाही. मग उपजीविकेच्या शोधात शेतकऱ्यांची तरुण पोरं शहराकडे धाव घेतात. भूमिहीन लोकांवर उपासमारीची वेळ येते. उदरनिर्वाहाचे साधन नसल्यामुळे व उपासमारीला कंटाळल्यामुळे ग्रामीण भागातील लोक सुद्धा शहरांकडे धाव घेतात. कृषीप्रधान देश म्हणून भारत देशात कृषीकरिता बजेटमध्ये ४ टक्के निधी निर्धारित केला जातो. ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. शेतमालाला भाव नाही, वाढती शेतमजुरी, रासायनिक खते, कीटकनाशक व औषधांच्या भाववाढीने शेतकऱ्याला फटका बसतो.

संबंधित विभागाचे दुर्लक्ष

सावकारांनी ढीगभर अटी समोर ठेवल्या तरी त्या मान्य करून शेतकरी कर्ज घेतो आणि शेतीच्या कामाला लागतो. यामुळेच शेतकरी अडचणीत सापडला आहे व याचा फायदा सावकार घेत असून लावेल त्या व्याजाने शेतकरी परतफेड करत आला आहे. अशाप्रकारे शेतकऱ्यांची लुबाडणूक सुरू आहे. यात शेतकरी फसत चालला असूनही याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे.

टॅग्स :jobनोकरीFarmerशेतकरीSocialसामाजिक