शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

शेतीत उत्पन्न नाही, गावात रोजगार नाही; शेतकऱ्यांच्या मुलांची शहराकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2021 13:47 IST

गावाकडे धंदा नाही, शेतीत पीक नाही आणि कुठल्याही व्यवसायाला चालना नाही. मग उपजीविकेच्या शोधात शेतकऱ्यांची तरुण पोरं शहराकडे धाव घेतात.

ठळक मुद्देशेतीकडे पाठ फिरविण्याचे वाढले प्रमाणशेती करण्यापेक्षा मोलमजुरी निवडली

गोंदिया : शेतीवर होणारा खर्च जास्त आणि उत्पादन कमी होत असल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. शेतकऱ्यांचे होणारे हाल बघता शेतकऱ्यांच्या पोरांनी शेतीकडे पूर्णतः पाठ फिरविली असून कामाच्या शोधात मोठमोठ्या शहरांकडे धाव घेतली असल्याचे चित्र देवरी तालुक्यातील ग्रामीण भागात दिसत आहे.

देवरी तालुक्यातील शेतकरी सावकारांच्या विविध कर्जाच्या बोझ्यात भरडला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे खाली डोके वर पाय असून व्याजाच्या चक्रव्यूहात शेतकरी अडकलेला आहे. अवकाळी पावसाने झालेले धान पिकाचे नुकसान व वाढत्या कर्जाच्या डोंगरामुळे किंवा शेतकऱ्यांच्या धान पिकाला हमीभावाची हमी नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. म्हणूनच शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडल्याने सावकारी कर्ज काढण्याच्या भानगडीत पडतो. याला शासनाचे धोरणच कारणीभूत ठरत असल्याचे शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांना वेळेवर जमिनीची मशागत, धान पेरणीपासून तर धान काढणीपर्यंत खतांचा वापर, धान पिकावर लागलेल्या रोगावर वेळेवर औषधीचा वापर करावा लागत आहे. हे सर्व काही करण्यासाठी शेतकऱ्यांकडे वेळेवर पैसा असणेही आवश्यक आहे, परंतु शेतकऱ्यांना विविध माध्यमातून लुबाडल्याचे चित्र समोर येत आहे.

निकृष्ट बिजाई तर काही कृषी केंद्रांकडून १३० ते १४० दिवसात निघणाऱ्या धान पिकाचे वाण दिले जाते; मात्र प्रत्यक्षात तसे न होता ते धान कमी कालावधीत निघून ते शेतकऱ्यांच्या माथी बसते याला कारणीभूत कोण ? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांच्या पोरांकडून होत आहे. याला शासनाचे धोरण कारणीभूत म्हणावे की अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष ! हे कळेनासे झाले आहे. 

गावाकडे कामच नाही

शेतकऱ्यांच्या शेतात पिकणारे धान्य हेच शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असते. त्याचे भवितव्य हे पूर्णत: निसर्गाच्या लहरी स्वभावावर अवलंबून असते. पुरेशा पावसाअभावी शेतकरी पेरण्या करू शकत नाहीत. रोज दिवस उगवला की मावळेपर्यंत बळीराजा पावसाची अक्षरश: चातकासारखी वाट बघत असतो. तर कधी अवकाळी पाऊस झोडपून काढतो व त्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते.

गावाकडे धंदा नाही, शेतीत पीक नाही आणि कुठल्याही व्यवसायाला चालना नाही. मग उपजीविकेच्या शोधात शेतकऱ्यांची तरुण पोरं शहराकडे धाव घेतात. भूमिहीन लोकांवर उपासमारीची वेळ येते. उदरनिर्वाहाचे साधन नसल्यामुळे व उपासमारीला कंटाळल्यामुळे ग्रामीण भागातील लोक सुद्धा शहरांकडे धाव घेतात. कृषीप्रधान देश म्हणून भारत देशात कृषीकरिता बजेटमध्ये ४ टक्के निधी निर्धारित केला जातो. ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. शेतमालाला भाव नाही, वाढती शेतमजुरी, रासायनिक खते, कीटकनाशक व औषधांच्या भाववाढीने शेतकऱ्याला फटका बसतो.

संबंधित विभागाचे दुर्लक्ष

सावकारांनी ढीगभर अटी समोर ठेवल्या तरी त्या मान्य करून शेतकरी कर्ज घेतो आणि शेतीच्या कामाला लागतो. यामुळेच शेतकरी अडचणीत सापडला आहे व याचा फायदा सावकार घेत असून लावेल त्या व्याजाने शेतकरी परतफेड करत आला आहे. अशाप्रकारे शेतकऱ्यांची लुबाडणूक सुरू आहे. यात शेतकरी फसत चालला असूनही याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे.

टॅग्स :jobनोकरीFarmerशेतकरीSocialसामाजिक