शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
5
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
6
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
7
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
8
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
9
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
10
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
11
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
12
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
13
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
14
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
15
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
16
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
17
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
18
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
19
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
20
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

शेतीत उत्पन्न नाही, गावात रोजगार नाही; शेतकऱ्यांच्या मुलांची शहराकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2021 13:47 IST

गावाकडे धंदा नाही, शेतीत पीक नाही आणि कुठल्याही व्यवसायाला चालना नाही. मग उपजीविकेच्या शोधात शेतकऱ्यांची तरुण पोरं शहराकडे धाव घेतात.

ठळक मुद्देशेतीकडे पाठ फिरविण्याचे वाढले प्रमाणशेती करण्यापेक्षा मोलमजुरी निवडली

गोंदिया : शेतीवर होणारा खर्च जास्त आणि उत्पादन कमी होत असल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. शेतकऱ्यांचे होणारे हाल बघता शेतकऱ्यांच्या पोरांनी शेतीकडे पूर्णतः पाठ फिरविली असून कामाच्या शोधात मोठमोठ्या शहरांकडे धाव घेतली असल्याचे चित्र देवरी तालुक्यातील ग्रामीण भागात दिसत आहे.

देवरी तालुक्यातील शेतकरी सावकारांच्या विविध कर्जाच्या बोझ्यात भरडला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे खाली डोके वर पाय असून व्याजाच्या चक्रव्यूहात शेतकरी अडकलेला आहे. अवकाळी पावसाने झालेले धान पिकाचे नुकसान व वाढत्या कर्जाच्या डोंगरामुळे किंवा शेतकऱ्यांच्या धान पिकाला हमीभावाची हमी नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. म्हणूनच शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडल्याने सावकारी कर्ज काढण्याच्या भानगडीत पडतो. याला शासनाचे धोरणच कारणीभूत ठरत असल्याचे शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांना वेळेवर जमिनीची मशागत, धान पेरणीपासून तर धान काढणीपर्यंत खतांचा वापर, धान पिकावर लागलेल्या रोगावर वेळेवर औषधीचा वापर करावा लागत आहे. हे सर्व काही करण्यासाठी शेतकऱ्यांकडे वेळेवर पैसा असणेही आवश्यक आहे, परंतु शेतकऱ्यांना विविध माध्यमातून लुबाडल्याचे चित्र समोर येत आहे.

निकृष्ट बिजाई तर काही कृषी केंद्रांकडून १३० ते १४० दिवसात निघणाऱ्या धान पिकाचे वाण दिले जाते; मात्र प्रत्यक्षात तसे न होता ते धान कमी कालावधीत निघून ते शेतकऱ्यांच्या माथी बसते याला कारणीभूत कोण ? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांच्या पोरांकडून होत आहे. याला शासनाचे धोरण कारणीभूत म्हणावे की अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष ! हे कळेनासे झाले आहे. 

गावाकडे कामच नाही

शेतकऱ्यांच्या शेतात पिकणारे धान्य हेच शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असते. त्याचे भवितव्य हे पूर्णत: निसर्गाच्या लहरी स्वभावावर अवलंबून असते. पुरेशा पावसाअभावी शेतकरी पेरण्या करू शकत नाहीत. रोज दिवस उगवला की मावळेपर्यंत बळीराजा पावसाची अक्षरश: चातकासारखी वाट बघत असतो. तर कधी अवकाळी पाऊस झोडपून काढतो व त्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते.

गावाकडे धंदा नाही, शेतीत पीक नाही आणि कुठल्याही व्यवसायाला चालना नाही. मग उपजीविकेच्या शोधात शेतकऱ्यांची तरुण पोरं शहराकडे धाव घेतात. भूमिहीन लोकांवर उपासमारीची वेळ येते. उदरनिर्वाहाचे साधन नसल्यामुळे व उपासमारीला कंटाळल्यामुळे ग्रामीण भागातील लोक सुद्धा शहरांकडे धाव घेतात. कृषीप्रधान देश म्हणून भारत देशात कृषीकरिता बजेटमध्ये ४ टक्के निधी निर्धारित केला जातो. ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. शेतमालाला भाव नाही, वाढती शेतमजुरी, रासायनिक खते, कीटकनाशक व औषधांच्या भाववाढीने शेतकऱ्याला फटका बसतो.

संबंधित विभागाचे दुर्लक्ष

सावकारांनी ढीगभर अटी समोर ठेवल्या तरी त्या मान्य करून शेतकरी कर्ज घेतो आणि शेतीच्या कामाला लागतो. यामुळेच शेतकरी अडचणीत सापडला आहे व याचा फायदा सावकार घेत असून लावेल त्या व्याजाने शेतकरी परतफेड करत आला आहे. अशाप्रकारे शेतकऱ्यांची लुबाडणूक सुरू आहे. यात शेतकरी फसत चालला असूनही याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे.

टॅग्स :jobनोकरीFarmerशेतकरीSocialसामाजिक