शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

जिल्ह्यात लसीकरणासह दुसरा डोस टोलविणाऱ्यांतही तरुणाईच अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 4:15 PM

लसीकरण सुरळीत सुरू असतानाच, आजही कित्येक नागरिक लसीकरण टाळत असून, यामध्ये मुदत निघून गेल्यानंतरही दुसरा डोस टोलविणाऱ्यांची संख्या २,१७,०७८ एवढी आहे.

ठळक मुद्दे१,०६,५२७ तरुणांनी टोलवला दुसरा डोस : वृद्धांमध्ये तेवढेच गांभीर्य

कपिल केकत

गोंदिया : शंभर टक्के लसीकरणासाठी शासन-प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असतानाच, जिल्ह्यात लसीकरणात अव्वल असलेली तरुणाई मुदत निघून गेल्यानंतर दुसरा डोस टोलविण्यातही अव्वल दिसून येत आहे.

जिल्ह्यात १८-४४ गटात तब्बल १,०६,५२७ तरुण-युवांनी दुसरा डोस टोलविल्याचे बुधवारपर्यंतच्या (दि.१३) आकडेवारीतून दिसून येत आहे, तर दुसरीकडेच वृद्धांमध्ये कोरोनाला घेऊन जास्त गांभीर्य दिसून येत असतानाच, ३९,२७१ वृद्धांनी दुसरा डोस टोलविल्याचे दिसत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने केलेला कहर आजही डोक्यात घर करून बसला आहे. कोरोनामुळे वृद्धांना सर्वाधिक धोका असल्याचे बोलले जात असतानाच, दुसऱ्या लाटेने तरुणांना सर्वाधिक लक्ष्य बनविल्याचे दिसून आले. अवघ्या देशात निर्माण झालेली ही स्थिती आता पुढे कधीच येऊ नये, यासाठी शासनाकडून कोरोना लसीकरणावर जोर दिला जात आहे. जिल्ह्यात त्यानुसार प्रत्येकाच्या लसीकरणासाठी नवनवे प्रयोग केले जात आहेत. हेच कारण आहे की, जिल्ह्यात १२,५७,८४६ डोसेस लावण्यात आले आहेत.

लसीकरण सुरळीत सुरू असतानाच, आजही कित्येक नागरिक लसीकरण टाळत असून, यामध्ये मुदत निघून गेल्यानंतरही दुसरा डोस टोलविणाऱ्यांची संख्या २,१७,०७८ एवढी आहे. गंभीर बाब म्हणजे, जिल्ह्यात लसीकरणाला घेऊन सर्वाधिक उत्सुक असलेल्या व लसीकरणात आघाडीवर असलेल्या १८-४४ गटांतील तरुणाईच दुसरा डोस टोलवण्यातही अव्वल आहे. या गटात बुधवारपर्यंत तब्बल १,०६,५२७ तरुण-युवांनी दुसरा डोस घेतला नसल्याचे दिसून येत आहे. यावरून सुरुवातीला लसीकरणाची मागणी करणारा हा गट आता कोरोना नियंत्रणात असल्याने लसीकरणाकडे दुर्लक्ष करीत आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

सुटकेचा श्वास घेण्यासाठी लसीकरण हाच पर्याय

कोरोनाची लस घेतल्यानंतर आपल्यापासून संपर्कातील व्यक्तीला कोरोना होत नाही, शिवाय आपण कोरोनाची लागण होऊनही त्याच्या गंभीर परिणामांपासून वाचून राहतो. अशात लस घेऊनच आपण सुरक्षित राहून अन्य लोकांना बाधित करणार नसल्याने, यातूनच कोरोनाचा नायनाट होणार आहे. यामुळे सुटकेचा श्वास घेण्यासाठी लसीकरण हाच एकमात्र पर्याय आहे.

दुर्लक्षितपणाच दुसऱ्या लाटेला कारणीभूत

कोरोनाचा शिरकाव झाला, तेव्हा आपल्या हाती लस नव्हती व कोरोनाने पाहिजे तेवढी क्षती केली. मात्र, दुसरी लाट आली, तेव्हा देशात लसीकरण सुरू झाले होते. मात्र, पाहिजे त्या प्रमाणात लसीकरण न झाल्याने दुसऱ्या लाटेने आपला डाव साधून पहिल्या लाटेपेक्षा जास्त गंभीर हानी केली व सर्वाधिक तरुणांना गिळले. मात्र, त्यानंतर आता लस टाळून तोच दुर्लक्षितपणा केला जात असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसHealthआरोग्य