शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

जिल्ह्यात लसीकरणासह दुसरा डोस टोलविणाऱ्यांतही तरुणाईच अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2021 16:33 IST

लसीकरण सुरळीत सुरू असतानाच, आजही कित्येक नागरिक लसीकरण टाळत असून, यामध्ये मुदत निघून गेल्यानंतरही दुसरा डोस टोलविणाऱ्यांची संख्या २,१७,०७८ एवढी आहे.

ठळक मुद्दे१,०६,५२७ तरुणांनी टोलवला दुसरा डोस : वृद्धांमध्ये तेवढेच गांभीर्य

कपिल केकत

गोंदिया : शंभर टक्के लसीकरणासाठी शासन-प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असतानाच, जिल्ह्यात लसीकरणात अव्वल असलेली तरुणाई मुदत निघून गेल्यानंतर दुसरा डोस टोलविण्यातही अव्वल दिसून येत आहे.

जिल्ह्यात १८-४४ गटात तब्बल १,०६,५२७ तरुण-युवांनी दुसरा डोस टोलविल्याचे बुधवारपर्यंतच्या (दि.१३) आकडेवारीतून दिसून येत आहे, तर दुसरीकडेच वृद्धांमध्ये कोरोनाला घेऊन जास्त गांभीर्य दिसून येत असतानाच, ३९,२७१ वृद्धांनी दुसरा डोस टोलविल्याचे दिसत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने केलेला कहर आजही डोक्यात घर करून बसला आहे. कोरोनामुळे वृद्धांना सर्वाधिक धोका असल्याचे बोलले जात असतानाच, दुसऱ्या लाटेने तरुणांना सर्वाधिक लक्ष्य बनविल्याचे दिसून आले. अवघ्या देशात निर्माण झालेली ही स्थिती आता पुढे कधीच येऊ नये, यासाठी शासनाकडून कोरोना लसीकरणावर जोर दिला जात आहे. जिल्ह्यात त्यानुसार प्रत्येकाच्या लसीकरणासाठी नवनवे प्रयोग केले जात आहेत. हेच कारण आहे की, जिल्ह्यात १२,५७,८४६ डोसेस लावण्यात आले आहेत.

लसीकरण सुरळीत सुरू असतानाच, आजही कित्येक नागरिक लसीकरण टाळत असून, यामध्ये मुदत निघून गेल्यानंतरही दुसरा डोस टोलविणाऱ्यांची संख्या २,१७,०७८ एवढी आहे. गंभीर बाब म्हणजे, जिल्ह्यात लसीकरणाला घेऊन सर्वाधिक उत्सुक असलेल्या व लसीकरणात आघाडीवर असलेल्या १८-४४ गटांतील तरुणाईच दुसरा डोस टोलवण्यातही अव्वल आहे. या गटात बुधवारपर्यंत तब्बल १,०६,५२७ तरुण-युवांनी दुसरा डोस घेतला नसल्याचे दिसून येत आहे. यावरून सुरुवातीला लसीकरणाची मागणी करणारा हा गट आता कोरोना नियंत्रणात असल्याने लसीकरणाकडे दुर्लक्ष करीत आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

सुटकेचा श्वास घेण्यासाठी लसीकरण हाच पर्याय

कोरोनाची लस घेतल्यानंतर आपल्यापासून संपर्कातील व्यक्तीला कोरोना होत नाही, शिवाय आपण कोरोनाची लागण होऊनही त्याच्या गंभीर परिणामांपासून वाचून राहतो. अशात लस घेऊनच आपण सुरक्षित राहून अन्य लोकांना बाधित करणार नसल्याने, यातूनच कोरोनाचा नायनाट होणार आहे. यामुळे सुटकेचा श्वास घेण्यासाठी लसीकरण हाच एकमात्र पर्याय आहे.

दुर्लक्षितपणाच दुसऱ्या लाटेला कारणीभूत

कोरोनाचा शिरकाव झाला, तेव्हा आपल्या हाती लस नव्हती व कोरोनाने पाहिजे तेवढी क्षती केली. मात्र, दुसरी लाट आली, तेव्हा देशात लसीकरण सुरू झाले होते. मात्र, पाहिजे त्या प्रमाणात लसीकरण न झाल्याने दुसऱ्या लाटेने आपला डाव साधून पहिल्या लाटेपेक्षा जास्त गंभीर हानी केली व सर्वाधिक तरुणांना गिळले. मात्र, त्यानंतर आता लस टाळून तोच दुर्लक्षितपणा केला जात असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसHealthआरोग्य