शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

जिल्ह्यात लसीकरणासह दुसरा डोस टोलविणाऱ्यांतही तरुणाईच अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2021 16:33 IST

लसीकरण सुरळीत सुरू असतानाच, आजही कित्येक नागरिक लसीकरण टाळत असून, यामध्ये मुदत निघून गेल्यानंतरही दुसरा डोस टोलविणाऱ्यांची संख्या २,१७,०७८ एवढी आहे.

ठळक मुद्दे१,०६,५२७ तरुणांनी टोलवला दुसरा डोस : वृद्धांमध्ये तेवढेच गांभीर्य

कपिल केकत

गोंदिया : शंभर टक्के लसीकरणासाठी शासन-प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असतानाच, जिल्ह्यात लसीकरणात अव्वल असलेली तरुणाई मुदत निघून गेल्यानंतर दुसरा डोस टोलविण्यातही अव्वल दिसून येत आहे.

जिल्ह्यात १८-४४ गटात तब्बल १,०६,५२७ तरुण-युवांनी दुसरा डोस टोलविल्याचे बुधवारपर्यंतच्या (दि.१३) आकडेवारीतून दिसून येत आहे, तर दुसरीकडेच वृद्धांमध्ये कोरोनाला घेऊन जास्त गांभीर्य दिसून येत असतानाच, ३९,२७१ वृद्धांनी दुसरा डोस टोलविल्याचे दिसत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने केलेला कहर आजही डोक्यात घर करून बसला आहे. कोरोनामुळे वृद्धांना सर्वाधिक धोका असल्याचे बोलले जात असतानाच, दुसऱ्या लाटेने तरुणांना सर्वाधिक लक्ष्य बनविल्याचे दिसून आले. अवघ्या देशात निर्माण झालेली ही स्थिती आता पुढे कधीच येऊ नये, यासाठी शासनाकडून कोरोना लसीकरणावर जोर दिला जात आहे. जिल्ह्यात त्यानुसार प्रत्येकाच्या लसीकरणासाठी नवनवे प्रयोग केले जात आहेत. हेच कारण आहे की, जिल्ह्यात १२,५७,८४६ डोसेस लावण्यात आले आहेत.

लसीकरण सुरळीत सुरू असतानाच, आजही कित्येक नागरिक लसीकरण टाळत असून, यामध्ये मुदत निघून गेल्यानंतरही दुसरा डोस टोलविणाऱ्यांची संख्या २,१७,०७८ एवढी आहे. गंभीर बाब म्हणजे, जिल्ह्यात लसीकरणाला घेऊन सर्वाधिक उत्सुक असलेल्या व लसीकरणात आघाडीवर असलेल्या १८-४४ गटांतील तरुणाईच दुसरा डोस टोलवण्यातही अव्वल आहे. या गटात बुधवारपर्यंत तब्बल १,०६,५२७ तरुण-युवांनी दुसरा डोस घेतला नसल्याचे दिसून येत आहे. यावरून सुरुवातीला लसीकरणाची मागणी करणारा हा गट आता कोरोना नियंत्रणात असल्याने लसीकरणाकडे दुर्लक्ष करीत आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

सुटकेचा श्वास घेण्यासाठी लसीकरण हाच पर्याय

कोरोनाची लस घेतल्यानंतर आपल्यापासून संपर्कातील व्यक्तीला कोरोना होत नाही, शिवाय आपण कोरोनाची लागण होऊनही त्याच्या गंभीर परिणामांपासून वाचून राहतो. अशात लस घेऊनच आपण सुरक्षित राहून अन्य लोकांना बाधित करणार नसल्याने, यातूनच कोरोनाचा नायनाट होणार आहे. यामुळे सुटकेचा श्वास घेण्यासाठी लसीकरण हाच एकमात्र पर्याय आहे.

दुर्लक्षितपणाच दुसऱ्या लाटेला कारणीभूत

कोरोनाचा शिरकाव झाला, तेव्हा आपल्या हाती लस नव्हती व कोरोनाने पाहिजे तेवढी क्षती केली. मात्र, दुसरी लाट आली, तेव्हा देशात लसीकरण सुरू झाले होते. मात्र, पाहिजे त्या प्रमाणात लसीकरण न झाल्याने दुसऱ्या लाटेने आपला डाव साधून पहिल्या लाटेपेक्षा जास्त गंभीर हानी केली व सर्वाधिक तरुणांना गिळले. मात्र, त्यानंतर आता लस टाळून तोच दुर्लक्षितपणा केला जात असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसHealthआरोग्य