शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरा आवासची कामे अर्धवट पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2016 01:57 IST

अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागविण्यासाठी शासन विविध उपक्रम आणि योजना राबवित असते. मात्र सरकारी यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करून ....

९.५ कोटी तत्काळ वाटप करा : दिलीप बन्सोड यांची मागणी, लाभार्थी चिंताग्रस्तकाचेवानी : अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागविण्यासाठी शासन विविध उपक्रम आणि योजना राबवित असते. मात्र सरकारी यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करून शासनाच्या बदनामीस कारणीभूत ठरते. हाच प्रकार इंदिरा आवास योजनेच्या बाबतीत जिल्ह्यात घडत आहे. य योजनेतील अनेक घरकूल निधीअभावी अर्धवट पडून आहेत. त्यासाठी लागणारा ९ कोटी ५ लक्ष रुपयांचा निधी तातडीने संबंधित लाभार्थ्यांना देऊन पावसात त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी केली आहे.इंदिरा आवास योजनेतंर्गत जिल्ह्यात हजारो घरकुल मंजूर करण्यात आले. काही हप्ते लाभार्थ्यांना देण्यात आले. त्यानंतर काही लाभार्थ्यांनी अर्धवट कामे केली, परंतू निधीअभावी पुढील कामे करू शकले नाही. लाभार्थ्यांनी बांधकामाचा पाया तयार करून ठेवला. काहींच्या अर्धवट भिंती तयार करण्यात आल्या तर काहींचे स्लॅब झालेले नाहीत. अशा परिस्थितीत शासनाने कामे पूर्ण झाले नसल्याची सबब सांगून उर्वरीत निधी लाभार्थ्यांना न देता परत मागविणे हे न्यायसंगत नाही. त्यांना तत्काळ निधी देण्यात यावी, अशी मागणी बन्सोड यांनी केली आहे. हवामानाच्या अंदाजानुसार यावर्षी भरपूर पाऊस येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशा परिस्थितीत नवीन घर तयार होण्याच्या आशेने आपले राहते घर तोडून त्या ठिकाणी इंदिरा आवासचे घरकुल तयार केले जात आहेत. पावसाचे दिवस तोंडावर असताना त्या लाभार्थ्यानी कुठे व कसे राहावे? ही भयावह स्थिती त्यांच्यासमोर निर्माण झाली असल्याने बंसोड यांनी याबाबत तीव्र आक्षेप नोंदविला आहे.इंदिरा आवास योजनेच्या लाभार्थ्यांना तत्काळ पुढील हप्ते देण्यात यावे यासाठी माजी आ.बन्सोड यांनी वारंवार जि.प.प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेवून व दूरध्वनीवर संपर्क साधून गरीब जनतेला वेळेपूर्वी निवाऱ्याची सोय उपलब्ध करण्याची विनंती केली. संपूर्ण जिल्ह्याचे ९ कोटी ५ लाख ८० हजार रुपयांचे काम बाकी असल्याने निधी परत पाठविण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे सर्व लाभार्थी चिंताग्रस्त झाले होते. मात्र आता परत जाणारा निधी ही लाभार्थ्यांना देण्यात येईल असे प्रशासनाने मान्य केल्याचे माजी आ. दिलीप बंसोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. संपूर्ण जिल्ह्यातील तालुकानिहाय इंदिरा आवास योजनेचा निधी जिल्हास्तरावर पडून असून तो लवकर लाभार्थ्यांना मिळावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत. (वार्ताहर)रमाई योजनेत बीपीएलची अट नाही रमाई घरकुल योजनेत लाभार्थ्यांना बीपीएलची अट नसून अधिकारी व शासकिय यंत्रणा नागरिकांची दिशाभूल करून गरजवंतांना लाभ घेण्यापासून वंचित ठेवतात, असेही बन्सोड यांनी सांगितले. शासन परिपत्रक बीपीएल/२००९/प्रक्र १५९/मावक-२ मंत्रालय मुंबई दि. २ डिसेंबर २०१० नुसार लाभार्थी बीपीएल असायला पाहिजे, असा कुठेही उल्लेख नाही असेही बन्सोड यांनी सांगितले. अधिकारी व कर्मचारी त्रास देण्याकरीता व लाभार्थ्यांना लाभ देण्यापासून रोखण्याकरीता आपल्या मर्जीने ही अट स्वत:हून घालत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अशी आहे तालुकानिहाय निधीची गरजआमगाव तालुक्याकरीता २७ लक्ष ५३ हजार, अर्जुनी-मोरगाव २२ लक्ष, देवरी २ कोटी ६२ लक्ष ५४ हजार, गोंदिया ५ कोटी २३ लक्ष २७ हजार, गोरेगाव २ लक्ष ४६ हजार, सडक-अर्जुनी ४९ लक्ष २५ हजार, सालेकसा १४ लक्ष ३२ हजार आणि तिरोडा ३ लक्ष ७१ हजार रुपयांचा निधी संबंधित तालुक्यात पडून आहे. काम अपूर्ण असल्याचे सांगून लाभार्थ्यांना तो वाटप करण्यात आलेला नाही. त्यामुळे हा निधी लाभार्थ्यांना तत्काळ देण्यात यावा आणि त्या परिवारांना निवाऱ्याची सोय वेळेत उपलब्ध व्हावी, यासाठी माजी आ.दिलीप बंसोड यांचा पाठपुरावा सुरू आहे.इंदिरा आवास योजनेचे थांबविण्यात आलेली रक्कम आता परत पाठविण्यात येणार नसून लाभार्थ्यांना त्वरीत देण्यात येणार असल्याचे जि.प. प्रशानाने मान्य केले असल्याचे माजी आ. दिलीप बंसोड यांनी सांगितले.