शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
3
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
4
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
5
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
6
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
7
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
8
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
9
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
10
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
11
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
12
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
13
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
14
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
15
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
16
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
17
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
18
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
19
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरा आवासची कामे अर्धवट पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2016 01:57 IST

अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागविण्यासाठी शासन विविध उपक्रम आणि योजना राबवित असते. मात्र सरकारी यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करून ....

९.५ कोटी तत्काळ वाटप करा : दिलीप बन्सोड यांची मागणी, लाभार्थी चिंताग्रस्तकाचेवानी : अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागविण्यासाठी शासन विविध उपक्रम आणि योजना राबवित असते. मात्र सरकारी यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करून शासनाच्या बदनामीस कारणीभूत ठरते. हाच प्रकार इंदिरा आवास योजनेच्या बाबतीत जिल्ह्यात घडत आहे. य योजनेतील अनेक घरकूल निधीअभावी अर्धवट पडून आहेत. त्यासाठी लागणारा ९ कोटी ५ लक्ष रुपयांचा निधी तातडीने संबंधित लाभार्थ्यांना देऊन पावसात त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी केली आहे.इंदिरा आवास योजनेतंर्गत जिल्ह्यात हजारो घरकुल मंजूर करण्यात आले. काही हप्ते लाभार्थ्यांना देण्यात आले. त्यानंतर काही लाभार्थ्यांनी अर्धवट कामे केली, परंतू निधीअभावी पुढील कामे करू शकले नाही. लाभार्थ्यांनी बांधकामाचा पाया तयार करून ठेवला. काहींच्या अर्धवट भिंती तयार करण्यात आल्या तर काहींचे स्लॅब झालेले नाहीत. अशा परिस्थितीत शासनाने कामे पूर्ण झाले नसल्याची सबब सांगून उर्वरीत निधी लाभार्थ्यांना न देता परत मागविणे हे न्यायसंगत नाही. त्यांना तत्काळ निधी देण्यात यावी, अशी मागणी बन्सोड यांनी केली आहे. हवामानाच्या अंदाजानुसार यावर्षी भरपूर पाऊस येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशा परिस्थितीत नवीन घर तयार होण्याच्या आशेने आपले राहते घर तोडून त्या ठिकाणी इंदिरा आवासचे घरकुल तयार केले जात आहेत. पावसाचे दिवस तोंडावर असताना त्या लाभार्थ्यानी कुठे व कसे राहावे? ही भयावह स्थिती त्यांच्यासमोर निर्माण झाली असल्याने बंसोड यांनी याबाबत तीव्र आक्षेप नोंदविला आहे.इंदिरा आवास योजनेच्या लाभार्थ्यांना तत्काळ पुढील हप्ते देण्यात यावे यासाठी माजी आ.बन्सोड यांनी वारंवार जि.प.प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेवून व दूरध्वनीवर संपर्क साधून गरीब जनतेला वेळेपूर्वी निवाऱ्याची सोय उपलब्ध करण्याची विनंती केली. संपूर्ण जिल्ह्याचे ९ कोटी ५ लाख ८० हजार रुपयांचे काम बाकी असल्याने निधी परत पाठविण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे सर्व लाभार्थी चिंताग्रस्त झाले होते. मात्र आता परत जाणारा निधी ही लाभार्थ्यांना देण्यात येईल असे प्रशासनाने मान्य केल्याचे माजी आ. दिलीप बंसोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. संपूर्ण जिल्ह्यातील तालुकानिहाय इंदिरा आवास योजनेचा निधी जिल्हास्तरावर पडून असून तो लवकर लाभार्थ्यांना मिळावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत. (वार्ताहर)रमाई योजनेत बीपीएलची अट नाही रमाई घरकुल योजनेत लाभार्थ्यांना बीपीएलची अट नसून अधिकारी व शासकिय यंत्रणा नागरिकांची दिशाभूल करून गरजवंतांना लाभ घेण्यापासून वंचित ठेवतात, असेही बन्सोड यांनी सांगितले. शासन परिपत्रक बीपीएल/२००९/प्रक्र १५९/मावक-२ मंत्रालय मुंबई दि. २ डिसेंबर २०१० नुसार लाभार्थी बीपीएल असायला पाहिजे, असा कुठेही उल्लेख नाही असेही बन्सोड यांनी सांगितले. अधिकारी व कर्मचारी त्रास देण्याकरीता व लाभार्थ्यांना लाभ देण्यापासून रोखण्याकरीता आपल्या मर्जीने ही अट स्वत:हून घालत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अशी आहे तालुकानिहाय निधीची गरजआमगाव तालुक्याकरीता २७ लक्ष ५३ हजार, अर्जुनी-मोरगाव २२ लक्ष, देवरी २ कोटी ६२ लक्ष ५४ हजार, गोंदिया ५ कोटी २३ लक्ष २७ हजार, गोरेगाव २ लक्ष ४६ हजार, सडक-अर्जुनी ४९ लक्ष २५ हजार, सालेकसा १४ लक्ष ३२ हजार आणि तिरोडा ३ लक्ष ७१ हजार रुपयांचा निधी संबंधित तालुक्यात पडून आहे. काम अपूर्ण असल्याचे सांगून लाभार्थ्यांना तो वाटप करण्यात आलेला नाही. त्यामुळे हा निधी लाभार्थ्यांना तत्काळ देण्यात यावा आणि त्या परिवारांना निवाऱ्याची सोय वेळेत उपलब्ध व्हावी, यासाठी माजी आ.दिलीप बंसोड यांचा पाठपुरावा सुरू आहे.इंदिरा आवास योजनेचे थांबविण्यात आलेली रक्कम आता परत पाठविण्यात येणार नसून लाभार्थ्यांना त्वरीत देण्यात येणार असल्याचे जि.प. प्रशानाने मान्य केले असल्याचे माजी आ. दिलीप बंसोड यांनी सांगितले.