शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

रोहयोच्या मजुरांना मिळणार रेशीम लागवडीचे काम

By admin | Updated: October 21, 2014 22:53 IST

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे कार्य करणाऱ्या मजुरांना आता रेशीम उत्पादनासाठी रोपट्यांच्या (तुती) लागवडीचे काम देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे रेशीम उत्पादनात वाढ होईल.

गोंदिया : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे कार्य करणाऱ्या मजुरांना आता रेशीम उत्पादनासाठी रोपट्यांच्या (तुती) लागवडीचे काम देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे रेशीम उत्पादनात वाढ होईल. या लागवडीच्या कार्याच्या माध्यमातून शासनाद्वारे गोंदिया जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या तालुक्यातील ग्रामीण भागातील भूमिहीन, अल्पभूधारक, मागास वर्गातील मजूर व शेतमजुरांना रोजगार मिळणार आहे.रोहयोचे काम करणाऱ्या मजुरांचे हित व रेशीम उत्पादन करण्याच्या उद्देशाने शासनाने रोहयोच्या मजुरांना रेशीमसाठी रोपटे लागवडीचे कार्य देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांच्या ग्रामीण भागातील भूमिहीन व अल्पभूधारकांना रोजगार मिळेल व त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होवू शकेल. या प्रकारे रेशीम उत्पादकांच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांची मजुरी शासनाच्या माध्यमातून मिळेल. त्यामुळे आता विनाखर्च कोस उत्पादन मिळेल. याशिवाय झाडे लावा झाडे जगवा या नितीच्या माध्यमातून पर्यावरण संतुलित ठेवण्यास मदतच होणार आहे. रेशीमची शेती कृषी आधारित रोजगार निर्मित करणारा व्यवसाय आहे. रेशीम उत्पादकांना एक एकर जागेत लागवड करण्यासाठी २८० ते ३०० मजुरांची आवश्यकता असते. शेतकऱ्यास एक एकर तूती बागेतून ४० ते ५० हजार रूपयांचा लाभ मिळतो. परंतु शासनाच्या नवीन धोरणानुसार, ग्रामीण भागातील मागास वर्गातील मजूर, शेतमजूर, अल्प व अत्यल्प भूधारक लाभार्थ्यांना रोहयोच्या अंतर्गत गावातच रोजगार मिळेल.पूर्वी रोहयोअंतर्गत नाले, नवीन रस्ते, लहान-मोठे तलाव, फळबाग योजना आदी काम होत असल्यामुळे कृषी कामासाठी मजुरांचा अभाव निर्माण होत होता. त्यामुळे शेतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. आता ही समस्या दूर होईल. आता कृषी कामासाठी मजुरांचा तुटवडा निर्माण होणार नाही व जिल्ह्यात रेशीम उत्पादनात वाढ होईल. (प्रतिनिधी)