शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

रोहयोच्या मजुरांना मिळणार रेशीम लागवडीचे काम

By admin | Updated: October 21, 2014 22:53 IST

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे कार्य करणाऱ्या मजुरांना आता रेशीम उत्पादनासाठी रोपट्यांच्या (तुती) लागवडीचे काम देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे रेशीम उत्पादनात वाढ होईल.

गोंदिया : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे कार्य करणाऱ्या मजुरांना आता रेशीम उत्पादनासाठी रोपट्यांच्या (तुती) लागवडीचे काम देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे रेशीम उत्पादनात वाढ होईल. या लागवडीच्या कार्याच्या माध्यमातून शासनाद्वारे गोंदिया जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या तालुक्यातील ग्रामीण भागातील भूमिहीन, अल्पभूधारक, मागास वर्गातील मजूर व शेतमजुरांना रोजगार मिळणार आहे.रोहयोचे काम करणाऱ्या मजुरांचे हित व रेशीम उत्पादन करण्याच्या उद्देशाने शासनाने रोहयोच्या मजुरांना रेशीमसाठी रोपटे लागवडीचे कार्य देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांच्या ग्रामीण भागातील भूमिहीन व अल्पभूधारकांना रोजगार मिळेल व त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होवू शकेल. या प्रकारे रेशीम उत्पादकांच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांची मजुरी शासनाच्या माध्यमातून मिळेल. त्यामुळे आता विनाखर्च कोस उत्पादन मिळेल. याशिवाय झाडे लावा झाडे जगवा या नितीच्या माध्यमातून पर्यावरण संतुलित ठेवण्यास मदतच होणार आहे. रेशीमची शेती कृषी आधारित रोजगार निर्मित करणारा व्यवसाय आहे. रेशीम उत्पादकांना एक एकर जागेत लागवड करण्यासाठी २८० ते ३०० मजुरांची आवश्यकता असते. शेतकऱ्यास एक एकर तूती बागेतून ४० ते ५० हजार रूपयांचा लाभ मिळतो. परंतु शासनाच्या नवीन धोरणानुसार, ग्रामीण भागातील मागास वर्गातील मजूर, शेतमजूर, अल्प व अत्यल्प भूधारक लाभार्थ्यांना रोहयोच्या अंतर्गत गावातच रोजगार मिळेल.पूर्वी रोहयोअंतर्गत नाले, नवीन रस्ते, लहान-मोठे तलाव, फळबाग योजना आदी काम होत असल्यामुळे कृषी कामासाठी मजुरांचा अभाव निर्माण होत होता. त्यामुळे शेतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. आता ही समस्या दूर होईल. आता कृषी कामासाठी मजुरांचा तुटवडा निर्माण होणार नाही व जिल्ह्यात रेशीम उत्पादनात वाढ होईल. (प्रतिनिधी)