शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

केशोरी-वडेगाव रस्त्याचे काम त्वरित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2022 05:00 IST

केशोरी ते वडेगाव (बंध्या) आणि केशोरी ते महागाव या दोन्ही जिल्हा मार्गाचे डांबरीकरण उखडून मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्या कंत्राटदाराने डांबरीकरण केले, त्या कंत्राटदाराची देखभाल करण्याची जबाबदारी पुढील पाच वर्षांपर्यंत स्वीकारली आहे. परंतु त्या कंत्राटदाराचे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष नाही. त्यामुळे सदर रस्त्याची दुरवस्था अनेक महिन्यांपासून कायम आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा केशोरी ते वडेगाव (बंध्या), केशोरी ते महागाव ही दोन्ही जिल्हा मार्ग अत्यंत खराब झाला आहे. केशोरी येथील तीन वर्षांपासून मंजूर असलेला बायपास रस्ता प्रशासनाच्या व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे प्रलंबित पडला आहे. त्यामुळे जड वाहने गावातून जात आहेत. या प्रकारामुळे येथील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा लागण्यापूर्वी केशोरी ते वडेगाव (बंध्या) आणि केशोरी ते महागाव या दोन्ही रस्त्यांसह केशोरी बायपास रस्त्याची कामे सुरू करावी, अन्यथा शिवसेना शाखा केशोरीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा चेतन दहीकर यांनी दिला आहे. केशोरी ते वडेगाव (बंध्या) आणि केशोरी ते महागाव या दोन्ही जिल्हा मार्गाचे डांबरीकरण उखडून मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्या कंत्राटदाराने डांबरीकरण केले, त्या कंत्राटदाराची देखभाल करण्याची जबाबदारी पुढील पाच वर्षांपर्यंत स्वीकारली आहे. परंतु त्या कंत्राटदाराचे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष नाही. त्यामुळे सदर रस्त्याची दुरवस्था अनेक महिन्यांपासून कायम आहे. संबंधित कंत्राटदार, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या रस्ता दुरुस्तीसाठी एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहत आहेत काय? असा संतप्त सवाल शिवसेना शाखा केशोरीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. दोन्ही रस्त्यांना पडलेली खड्डे चुकविताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी तर या मार्गाने प्रवास करणे अधिकच जीवघेणे ठरू पाहात आहे. मात्र, या रस्ता दुरुस्तीकडे सातत्याने अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे.

 अपघातांच्या संख्येत वाढ 

- या रस्त्याच्या प्रवासादरम्यान लहान-मोठी अपघात घडून अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, अजूनही प्रशासनाला जाग आली नाही. केशोरी बायपास रस्ता मंजुरीला तीन वर्षे लोटूनही रस्ता निर्मितीच्या कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे सर्व वाहने गावाच्या अरुंद असलेल्या रस्त्याने मध्य भागातून जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. या रस्त्याने रात्रंदिवस वाहने धावत असल्यामुळे येथील नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. शिवसेना आंदोलनाच्या पवित्र्यात- केशोरी ते वडेगाव (बंध्या), केशोरी ते महागाव या दोन्ही रस्त्यांबरोबर केशोरी बायपास रस्ता निर्मितीची कामे करावी, अन्यथा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित कंत्राटदाराच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना शाखा केशोरीच्या वतीने माजी शिवसेना तालुका प्रमुख चेतन दहीकर यांनी दिला आहे.

 

टॅग्स :highwayमहामार्ग