शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तोंडातून शब्द निघत नाही; निघतात फक्त अश्रू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 05:00 IST

वाहनचालक प्रताप रहांगडाले हा नेहमीप्रमाणे वाहनाची किल्ली घेण्यासाठी मृत रेवचंद डोंगरु बिसेन (५१) यांच्या दारात आला तेव्हा त्याला या घरातील मृतदेह जागोजागी पडलेले दिसले. त्याने आरडाओरड केल्यावर घराजवळील लोक गोळा झाले.  चुरडी येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक रेवचंद डोंगरु बिसेन (५१) हे गळफास घेतलेल्या अवस्थेत तर पत्नी मालता रेवचंद्र बिसेन (४५), मुलगी पौर्णिमा रेवचंद बिसेन (२०) व मुलगा तेजस रेवचंद बिसेन (१७) यांच्या डोक्यावर ट्रॅक्टरच्या स्पेंडलने वार करून खून करण्यात आला होता.

नरेश रहिलेलोकमत न्युज नेटवर्कगोंदिया : घरात पाच सदस्य परंतु पाचपैकी चौघांची निर्घृण हत्या झाली. त्याच घरात एका खोलीत बंद दाराच्या आत पक्षाघाताच्या आजाराने खाटेवर पडून असलेल्या ९० वर्षांच्या केमनबाई डोंगरू बिसेन यांना या घटनेची माहिती झालीच नाही. घटनेमुळे घरात आरडाओरड झाली असेल तर तेसुद्धा त्या वृद्धेला सांगताच येत नाही. मागील अनेक वर्षांपासून आजारी असलेल्या केमनबाई बिसेन यांना स्वबळावर उठता येत नाही शिवाय बोलताही येत नाही. ज्या मुलाला जन्म दिला तो मुलगा, सून व ज्या नातवंडांना हातावर खेळविले त्यांनाही क्षणार्धात काळाने घाला घातला. पहाटेपासून मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना केमनबाई नेहमीसारख्याच आपल्या खाटेवर झोपूनच होत्या. वाहनचालक प्रताप रहांगडाले हा नेहमीप्रमाणे वाहनाची किल्ली घेण्यासाठी मृत रेवचंद डोंगरु बिसेन (५१) यांच्या दारात आला तेव्हा त्याला या घरातील मृतदेह जागोजागी पडलेले दिसले. त्याने आरडाओरड केल्यावर घराजवळील लोक गोळा झाले.  चुरडी येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक रेवचंद डोंगरु बिसेन (५१) हे गळफास घेतलेल्या अवस्थेत तर पत्नी मालता रेवचंद्र बिसेन (४५), मुलगी पौर्णिमा रेवचंद बिसेन (२०) व मुलगा तेजस रेवचंद बिसेन (१७) यांच्या डोक्यावर ट्रॅक्टरच्या स्पेंडलने वार करून खून करण्यात आला होता. घरभर रक्ताचा सडा पडलेला होता. लोकांनी गर्दी केल्यावर केमनबाई घरात जीवंत असल्याचे लोकांच्या लक्षात आले. त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला असला तरी पक्षाघातामुळे त्यांना उठता येत नाही व बोलताही येत नाही. घटनेमुळे फक्त ९० वर्षांची आजी अश्रू ढाळत आहेत.  

तीन गोष्टींमुळे रेवचंद यांचीही हत्याच- रेवचंद बिसेन यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला आढळला. आरोपींनी या घटनेला चुकीच्या पद्धतीने वळविण्यासाठी जणू रेवचंदनेच खून करून आत्महत्या केल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपींनी शेवटी काही पुरावे सोडलेच. रेवचंद यांचा मृतदेह लटकविण्यात आला त्या दोराला घरातून खिडकीपर्यंत नेऊन बांधण्यात आले. तिघांचा ज्या पेंडलने मारून खून करण्यात आला तो पेंडल घटनास्थळपासून १५ फूट अंतरावर वऱ्हांड्यात आढळला. रेवचंद यांनी हे कृत्य केले असते तर ९० वर्षांच्या म्हाताऱ्या आईला एकाकी सोडून हे कृत्य केले नसते. तिला भावांकडे सोडून दिले असते. गावातच चार भावंडे असताना त्यांच्याकडे तिला सोपविले असते. परंतु रेवचंदच्या घरात वाद नाही काहीच नाही अशातच रात्री जेवणकरून शांततेने झोपी गेलेले बिसेन कुटुंबीय सकाळचा दिवस पाहूच शकले नाही. या प्रकरणातील आरोपींपर्यंत पोलीस कधी पोहचतील याची उत्सुकता लोकांना लागली आहे.

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी