शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

साठवण बंधारा फाटकाविना

By admin | Updated: February 27, 2015 00:41 IST

स्थानिक जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उपविभागातर्फे तावशी-खुर्द येथील नाल्यावर बांधण्यात आलेल्या साठवण बंधाऱ्याला व्दार नाही.

अर्जुनी-मोरगाव : स्थानिक जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उपविभागातर्फे तावशी-खुर्द येथील नाल्यावर बांधण्यात आलेल्या साठवण बंधाऱ्याला व्दार नाही. त्यामुळे बांधकाम पूर्ण होऊनही पाणीच अडवले जात नाही. या विभागातर्फे पाणी अडवा, पाणी जिरवा या धोरणाची ऐशीतैशी होत आहे. प्राप्त माहितीनुसार, तावशी-खुर्द येथील नाल्यावर २०१३-१४ या वर्षात साठवण बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. यावर ७ लक्ष ५ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला. या साठवण बंधाऱ्याची जिवंत साठवण क्षमता ०.०२५ द.ल.घ.मी. आहे. यामुळे १०.५० हेक्टर शेतजमिनीला सिंचन होणार आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा या धोरणांतर्गत शासनाने विविध नाल्यांवर बंधाऱ्याचे बांधकाम करून पाणी अडविण्याचे धोरण स्विकारले आहे. मात्र प्रशासनाच्या भ्रष्ट कार्यप्रणाली व उदासीनतेमुळे शेतकऱ्यांची कुचंबना होत आहे. हा बंधारा २०१३-१४ या वर्षातील आहे. प्रशासनाकडून २०१४ मध्येच बांधकाम पूर्ण झाल्याचे दर्शविण्यात आले आहे. मात्र या बंधाऱ्यावर व्दार बसविण्यात आले नाही. याच वर्षात सायगाव-१, पांढरवाणी माल, गुढरी-३, तावशी, रांजीटोला, नवनितपूर २, गंधारी ३ येथील नाल्यावर बंधाऱ्यांचे बांधकाम पूर्ण झाले. या बंधाऱ्यांच्या बांधकामावर सुध्दा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. इटियाडोह धरणाच्या कालव्यातून झिरपणारे पाणी तसेच इतर स्त्रोतातून तावशी नाल्यात पाणी जमा होता. पाणी अडविल्यामुळे परिसरातील शेतीला सिंचन होईल हा उदात्त हेतू होता. मात्र याठिकाणी व्दार का बसविण्यात आले नाही हे न उलगडणारे कोडे आहे. संबंधित विभागाच्या अभियंत्याशी चर्चा केली असता व्दार बसवायचे आहे. मात्र कंत्राटदाराने ते बसवून दिले नाही. मी त्यांच्याकडे ही मागणी केली. आठवडाभरात दार बसविण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र महिना लोटूनही व्दार बसविण्यात आले नाही.त्यामुळे या बंधाऱ्यातून वर्षभरापासून पाणी वाया जात आहे. ७ लक्ष रुपये खर्च करूनही नजीकच्या शेतजमिनीला सिंचन होत नाही. या बंधाऱ्यावर तातडीने व्दार बसवून शेतीला सिंचन व्हावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बंधाऱ्याच्या कडेला दगडांची पिचींग केलेली असते. या बंधाऱ्यावर पिचींग सुध्दा केलेली दिसून येत नाही. एकूणच या बंधाऱ्याच्या बांधकामाची गुणवत्ता कशी आहे याची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)