शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

साठवण बंधारा फाटकाविना

By admin | Updated: February 27, 2015 00:41 IST

स्थानिक जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उपविभागातर्फे तावशी-खुर्द येथील नाल्यावर बांधण्यात आलेल्या साठवण बंधाऱ्याला व्दार नाही.

अर्जुनी-मोरगाव : स्थानिक जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उपविभागातर्फे तावशी-खुर्द येथील नाल्यावर बांधण्यात आलेल्या साठवण बंधाऱ्याला व्दार नाही. त्यामुळे बांधकाम पूर्ण होऊनही पाणीच अडवले जात नाही. या विभागातर्फे पाणी अडवा, पाणी जिरवा या धोरणाची ऐशीतैशी होत आहे. प्राप्त माहितीनुसार, तावशी-खुर्द येथील नाल्यावर २०१३-१४ या वर्षात साठवण बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. यावर ७ लक्ष ५ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला. या साठवण बंधाऱ्याची जिवंत साठवण क्षमता ०.०२५ द.ल.घ.मी. आहे. यामुळे १०.५० हेक्टर शेतजमिनीला सिंचन होणार आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा या धोरणांतर्गत शासनाने विविध नाल्यांवर बंधाऱ्याचे बांधकाम करून पाणी अडविण्याचे धोरण स्विकारले आहे. मात्र प्रशासनाच्या भ्रष्ट कार्यप्रणाली व उदासीनतेमुळे शेतकऱ्यांची कुचंबना होत आहे. हा बंधारा २०१३-१४ या वर्षातील आहे. प्रशासनाकडून २०१४ मध्येच बांधकाम पूर्ण झाल्याचे दर्शविण्यात आले आहे. मात्र या बंधाऱ्यावर व्दार बसविण्यात आले नाही. याच वर्षात सायगाव-१, पांढरवाणी माल, गुढरी-३, तावशी, रांजीटोला, नवनितपूर २, गंधारी ३ येथील नाल्यावर बंधाऱ्यांचे बांधकाम पूर्ण झाले. या बंधाऱ्यांच्या बांधकामावर सुध्दा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. इटियाडोह धरणाच्या कालव्यातून झिरपणारे पाणी तसेच इतर स्त्रोतातून तावशी नाल्यात पाणी जमा होता. पाणी अडविल्यामुळे परिसरातील शेतीला सिंचन होईल हा उदात्त हेतू होता. मात्र याठिकाणी व्दार का बसविण्यात आले नाही हे न उलगडणारे कोडे आहे. संबंधित विभागाच्या अभियंत्याशी चर्चा केली असता व्दार बसवायचे आहे. मात्र कंत्राटदाराने ते बसवून दिले नाही. मी त्यांच्याकडे ही मागणी केली. आठवडाभरात दार बसविण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र महिना लोटूनही व्दार बसविण्यात आले नाही.त्यामुळे या बंधाऱ्यातून वर्षभरापासून पाणी वाया जात आहे. ७ लक्ष रुपये खर्च करूनही नजीकच्या शेतजमिनीला सिंचन होत नाही. या बंधाऱ्यावर तातडीने व्दार बसवून शेतीला सिंचन व्हावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बंधाऱ्याच्या कडेला दगडांची पिचींग केलेली असते. या बंधाऱ्यावर पिचींग सुध्दा केलेली दिसून येत नाही. एकूणच या बंधाऱ्याच्या बांधकामाची गुणवत्ता कशी आहे याची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)